शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे 'शिवतीर्थ'हून निघाले, कार थांबवली, काच खाली केली अन् म्हणाले, "मातोश्री'वर चाललोय...!"
2
राज्यातील महाराष्ट्रविरोधी सरकार घालवायला ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर स्वागत: वडेट्टीवार
3
Raja Raghuvanshi : सस्पेन्स वाढला! राजा आणि सोनमचं मेघालयमध्ये झालं भांडण? भावाला आल्या धमक्या
4
Fact Check: पाकिस्तानचा क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीचं निधन? व्हायरल व्हिडीओमागील सत्य समोर!
5
३० लाखांच्या होम लोनवर वाचतील ४.६३ लाख; आपली कर्जाची रक्कम टाका आणि पाहा किती होईल बचत?
6
Astrology: राहू दशा सुरु झाली हे कसं ओळखावं? राहूमुळे कोणकोणती हानी होते? वाचा!
7
'सुनील तटकरेंनी राजीनामा द्यायला पाहिजे, त्यांनी दिला तर मी नक्की देईन', आमदार महेंद्र थोरवेंचा घणाघात
8
स्कूटरवरून आले, सामान हॉटेलमध्ये ठेवलं अन्...; राजा आणि सोनम बेपत्ता होण्यापूर्वीच्या CCTV व्हिडीओमध्ये काय?
9
“२ तास गोंधळ, मतमोजणी हायजॅक, मोदींचा वाराणसीत जवळपास पराभवच झाला होता”; कुणाचा दावा?
10
एकटं राहायला आवडतं? उषा नाडकर्णी म्हणाल्या, "आमच्या इमारतीत राज ठाकरेंची मावशी..."
11
म्युच्युअल फंड गुंतवणूकदाराचा अचानक मृत्यू झाला तर पैशांचं काय होतं? पाहा महत्त्वाची माहिती आणि प्रक्रिया
12
Astrology: पत्रिका मंगळाची असेल तर सगळेच अमंगल होते का? काय आहे त्यावर उपाय? वाचा!
13
Rahul Gandhi: महाराष्ट्र विधानसभेत 'मॅच फिक्सिंग', राहुल गांधींचा आरोप; भाजपचा पलटवार!
14
Jyoti Malhotra : ज्योती मल्होत्राबाबत मोठा खुलासा; पाकिस्तानमधील रिटायर्ड सब-इन्स्पेक्टरच्या होती संपर्कात
15
COVID19: कोरोना वाढतोय, काळजी घ्या! २४ तासांत ४ मृत्यू, सक्रीय रुग्णांची संख्या ५००० च्या वर!
16
“२०१४, २०१७ ला काय घडले यात रस नाही, आम्ही मागे वळून पाहत नाही”; प्रस्तावावर राऊतांचे विधान
17
'उद्धव ठाकरेंना गर्दीचं मतांमध्ये परिवर्तन करण्यात यश', शरद पवार राज ठाकरेंबद्दल काय म्हणाले?
18
Vedashree Toraskar : जलपरी! समुद्रातील आव्हान पेललं, अटल सेतू ते गेटवेपर्यंत पोहून ११ व्या वर्षी रचला इतिहास
19
‘हमासचा खात्मा करण्याची इच्छा, पण अयशस्वी ठरले’; मौलाना अरशद मदनी म्हणाले, गाझातील एक लाख शहिदांनी...
20
संजय राऊतांचे RSSचे सरसंघचालक मोहन भागवतांना पत्र; म्हणाले, “विरोधकांचा आवाज दडपायला...”

भारताचा धर्मांध पाकिस्तान होऊ देऊ नका - पाकिस्तानी कवयित्री फहमिदा रियाझ

By admin | Updated: October 10, 2015 13:21 IST

पाकिस्तानी कार्यकर्ती आणि कवयित्री फहमिदा रियाझ यांनी भारत आधी होता तसा होऊ दे, त्याचा पाकिस्तान होऊ देऊ नका अशी साद घातली आहे

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १० - मुझफ्फरनगर आणि दादरीमधल्या मुस्लीमांविरोधातील घटनांच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानी कार्यकर्ती आणि कवयित्री फहमिदा रियाझ यांनी भारत आधी होता तसा होऊ दे, त्याचा पाकिस्तान होऊ देऊ नका अशी साद घातली आहे. १९९६मध्ये ज्यावेळी भारतीय जनता पार्टी प्रथम सत्तेत आली त्यावेळी त्यांनी तुम बिलकूल हम जैसे निकले ही कविता लिहिली होती, आणि भारत हा पाकिस्तानप्रमाणे कसा कट्टर धार्मिक बनत आहे याची व्यथा मांडली होती. इंडियन एक्स्प्रेसने टेलीफोनच्या माध्यमातून रियाझ यांच्याशी संपर्क साधला असता, आत्ताएवढी १९९६ साली वाईट स्थिती नव्हती असे उद्गार त्यांनी काढले आहेत. भारतात जन्माला आलेल्या उदारमतवादी रियाझ यांचे धार्मिकदृष्ट्या कट्टर बनलेल्या पाकिस्तानात हाल झाले. झिया उल हक यांच्या काळात तर त्यांना मार्च १९८१ ते डिसेंबर १९८७ या कालावधीत भारताचा आसरा घ्यावा लागला. त्यावेळच्या म्हणजे १९९६ सालच्या भारताला संबोधणारी ही कविता असली तरी ती मूळात पाकिस्तानमधला धार्मिक कट्टरतावाद अधोरेखीत करते. धर्माशी नाळ जोडून पाकिस्तानने प्रचंड मोठी चूक केल्याचे रियाझ म्हणतात. जवळपास अर्धा शतक पाकिस्तान धार्मिक जोखडाखाली असून भारतही जवळपास तिथंच पोचत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे.
धार्मिक उन्मादाला आवर घाला, भारताचा पाकिस्तान होऊ देऊ नका अशी विनंती रियाझ यांनी केली आहे. धर्मद्वेषाचे जहर पसरवणा-यांना माझी कविता काही चांगली बुद्धी देईल अशी आशाही त्यांनी व्यक्त केली आहे. रियाझ यांनी याआधी मार्च २०१४मध्ये हम गुनहगार औरते या परिषदेमध्ये ही कविता भारतीय रसिकांना ऐकवली होती. 
 
फहमिदा रियाझ यांची मूळ कविता:
 
तुम बिल्‍कुल हम जैसे निकले
तुम बिल्‍कुल हम जैसे निकले
अब तक कहाँ छिपे थे भाई
वो मूरखता, वो घामड़पन
जिसमें हमने सदी गंवाई
आखिर पहुँची द्वार तुम्‍हारे
अरे बधाई, बहुत बधाई।
 
प्रेत धर्म का नाच रहा है
कायम हिंदू राज करोगे ?
सारे उल्‍टे काज करोगे !
अपना चमन ताराज़ करोगे !
 
तुम भी बैठे करोगे सोचा
पूरी है वैसी तैयारी
कौन है हिंदू, कौन नहीं है
तुम भी करोगे फ़तवे जारी
होगा कठिन वहाँ भी जीना
दाँतों आ जाएगा पसीना
जैसी तैसी कटा करेगी
वहाँ भी सब की साँस घुटेगी
माथे पर सिंदूर की रेखा
कुछ भी नहीं पड़ोस से सीखा!
 
क्‍या हमने दुर्दशा बनाई
कुछ भी तुमको नजर न आयी?
कल दुख से सोचा करती थी
सोच के बहुत हँसी आज आयी
तुम बिल्‍कुल हम जैसे निकले
हम दो कौम नहीं थे भाई।
मश्‍क करो तुम, आ जाएगा
उल्‍टे पाँव चलते जाना
ध्‍यान न मन में दूजा आए
बस पीछे ही नजर जमाना
भाड़ में जाए शिक्षा-विक्षा
अब जाहिलपन के गुन गाना।
 
आगे गड्ढा है यह मत देखो
लाओ वापस, गया ज़माना
एक जाप सा करते जाओ
बारम्बार यही दोहराओ
कैसा वीर महान था भारत
कैसा आलीशान था-भारत
फिर तुम लोग पहुँच जाओगे
बस परलोक पहुँच जाओगे
हम तो हैं पहले से वहाँ पर
तुम भी समय निकालते रहना
अब जिस नरक में जाओ वहाँ से
चिट्ठी-विठ्ठी डालते रहना।