शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
2
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
3
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
4
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
5
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
6
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
7
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
8
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
9
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
10
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
11
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
12
मस्तच! नवरात्रीत कन्या पूजनानंतर द्या 'हे' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकलींचे चेहरे
13
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
14
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
15
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!
16
समृद्धी महामार्गावर खरंच खिळे ठोकण्यात आले? MSRDC ने अखेर दिलं स्पष्टीकरण
17
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
18
३० हजार ते ३० लाखांपर्यंत फायदा; जीएसटी कपातीचा कार खरेदीदारांना मोठा लाभ, कोणती गाडी किती स्वस्त?
19
PNB ग्राहकांच्या खिशावरील ताण वाढणार! लॉकर ते ट्रान्झॅक्शनपर्यंतचं शुल्क वाढणार, कधीपासून वाढणार चार्जेस?
20
VIRAL : एकाने उचलली चप्पल तर, दुसराही कमी नाही! दिल्ली मेट्रोमध्ये तुफान हाणामारी

भारताचा धर्मांध पाकिस्तान होऊ देऊ नका - पाकिस्तानी कवयित्री फहमिदा रियाझ

By admin | Updated: October 10, 2015 13:21 IST

पाकिस्तानी कार्यकर्ती आणि कवयित्री फहमिदा रियाझ यांनी भारत आधी होता तसा होऊ दे, त्याचा पाकिस्तान होऊ देऊ नका अशी साद घातली आहे

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १० - मुझफ्फरनगर आणि दादरीमधल्या मुस्लीमांविरोधातील घटनांच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानी कार्यकर्ती आणि कवयित्री फहमिदा रियाझ यांनी भारत आधी होता तसा होऊ दे, त्याचा पाकिस्तान होऊ देऊ नका अशी साद घातली आहे. १९९६मध्ये ज्यावेळी भारतीय जनता पार्टी प्रथम सत्तेत आली त्यावेळी त्यांनी तुम बिलकूल हम जैसे निकले ही कविता लिहिली होती, आणि भारत हा पाकिस्तानप्रमाणे कसा कट्टर धार्मिक बनत आहे याची व्यथा मांडली होती. इंडियन एक्स्प्रेसने टेलीफोनच्या माध्यमातून रियाझ यांच्याशी संपर्क साधला असता, आत्ताएवढी १९९६ साली वाईट स्थिती नव्हती असे उद्गार त्यांनी काढले आहेत. भारतात जन्माला आलेल्या उदारमतवादी रियाझ यांचे धार्मिकदृष्ट्या कट्टर बनलेल्या पाकिस्तानात हाल झाले. झिया उल हक यांच्या काळात तर त्यांना मार्च १९८१ ते डिसेंबर १९८७ या कालावधीत भारताचा आसरा घ्यावा लागला. त्यावेळच्या म्हणजे १९९६ सालच्या भारताला संबोधणारी ही कविता असली तरी ती मूळात पाकिस्तानमधला धार्मिक कट्टरतावाद अधोरेखीत करते. धर्माशी नाळ जोडून पाकिस्तानने प्रचंड मोठी चूक केल्याचे रियाझ म्हणतात. जवळपास अर्धा शतक पाकिस्तान धार्मिक जोखडाखाली असून भारतही जवळपास तिथंच पोचत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे.
धार्मिक उन्मादाला आवर घाला, भारताचा पाकिस्तान होऊ देऊ नका अशी विनंती रियाझ यांनी केली आहे. धर्मद्वेषाचे जहर पसरवणा-यांना माझी कविता काही चांगली बुद्धी देईल अशी आशाही त्यांनी व्यक्त केली आहे. रियाझ यांनी याआधी मार्च २०१४मध्ये हम गुनहगार औरते या परिषदेमध्ये ही कविता भारतीय रसिकांना ऐकवली होती. 
 
फहमिदा रियाझ यांची मूळ कविता:
 
तुम बिल्‍कुल हम जैसे निकले
तुम बिल्‍कुल हम जैसे निकले
अब तक कहाँ छिपे थे भाई
वो मूरखता, वो घामड़पन
जिसमें हमने सदी गंवाई
आखिर पहुँची द्वार तुम्‍हारे
अरे बधाई, बहुत बधाई।
 
प्रेत धर्म का नाच रहा है
कायम हिंदू राज करोगे ?
सारे उल्‍टे काज करोगे !
अपना चमन ताराज़ करोगे !
 
तुम भी बैठे करोगे सोचा
पूरी है वैसी तैयारी
कौन है हिंदू, कौन नहीं है
तुम भी करोगे फ़तवे जारी
होगा कठिन वहाँ भी जीना
दाँतों आ जाएगा पसीना
जैसी तैसी कटा करेगी
वहाँ भी सब की साँस घुटेगी
माथे पर सिंदूर की रेखा
कुछ भी नहीं पड़ोस से सीखा!
 
क्‍या हमने दुर्दशा बनाई
कुछ भी तुमको नजर न आयी?
कल दुख से सोचा करती थी
सोच के बहुत हँसी आज आयी
तुम बिल्‍कुल हम जैसे निकले
हम दो कौम नहीं थे भाई।
मश्‍क करो तुम, आ जाएगा
उल्‍टे पाँव चलते जाना
ध्‍यान न मन में दूजा आए
बस पीछे ही नजर जमाना
भाड़ में जाए शिक्षा-विक्षा
अब जाहिलपन के गुन गाना।
 
आगे गड्ढा है यह मत देखो
लाओ वापस, गया ज़माना
एक जाप सा करते जाओ
बारम्बार यही दोहराओ
कैसा वीर महान था भारत
कैसा आलीशान था-भारत
फिर तुम लोग पहुँच जाओगे
बस परलोक पहुँच जाओगे
हम तो हैं पहले से वहाँ पर
तुम भी समय निकालते रहना
अब जिस नरक में जाओ वहाँ से
चिट्ठी-विठ्ठी डालते रहना।