शहरं
Join us  
Trending Stories
1
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
2
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
3
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
4
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
5
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
6
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
7
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
8
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
9
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर
10
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
11
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
12
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
13
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
14
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
15
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
16
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
17
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
18
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
19
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
20
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!

एकाही स्थलांतरितास बाहेर जाऊ देऊ नका; केंद्राची राज्यांना सक्त ताकीद

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2020 06:20 IST

निर्देशांचे पालन करण्याची जबाबदारी व्यक्तिश: जिल्हाधिकारी व जिल्हा दंडाधिकाºयांवर टाकण्यात आली.

नवी दिल्ली : सर्व राज्यांनी आपापल्या सीमा परिणामकारकपणे सील कराव्यात आणि पोटासाठी परराज्यांतून आलेल्या एकाही स्थलांतरित मजूर वा कामगारास घरी परत जाण्यासाठी राज्याबाहेर जाऊ देऊ नका, अशी सक्त ताकीद केंद्र सरकारने रविवारी दिली.

दिल्लीतून घरी परत निघालेल्या हजारो स्थलांतरित कामगारांना दिल्ली सरकारने शेकडो बसने सीमेपर्यंत नेऊन सोडणे व त्यांना तेथून गावोगावी पोहोचविण्यासाठी उत्तर प्रदेशच्या योगी आदित्यनाथ सरकारने १२०० सरकारी बसची व्यवस्था करण्यामुळे शनिवारी राजधानीत ‘लॉकडाऊन’चा उघडपणे फियास्को झाला.

या प्रकारावर सर्वदूर टीका झाल्यानंतर कॅबिनेट सचिव राजीव गौबा व केंद्रीय गृहसचिव यांनी राज्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांची कानउघाडणी करून वरीलप्रमाणे सक्त तंबी दिली. २१ दिवसांचा देशव्यापी ‘लॉकडाऊन’ ऐनवेळी लागू केल्याने लाखो स्थलांतरित कामगारांचे गेले तीन दिवस जे अतोनात हाल झाले त्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘आकाशवाणी’वरील ‘मन की बात’मधून हात जोडून क्षमायाचना करीत असतानाच दुसरीकडे ही तंबी दिली गेली, हे लक्षणीय आहे. निर्देशांचे पालन करण्याची जबाबदारी व्यक्तिश: जिल्हाधिकारी व जिल्हा दंडाधिकाºयांवर टाकण्यात आली.

देशातील मृतांची संख्या २७ वर

च्देशभरातील कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या आता २७ वर पोहोचली आहे. भारतभरातील रुग्णांच्या संख्येने हजाराची संख्या ओलांडली आहे. आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी सांगितले की, आम्ही सर्व जण लॉकडाऊनमध्ये आहोत. या काळात मानसिक स्वास्थ्याबाबत काही समस्या निर्माण झाली तर याबाबत बंगळुरू येथील राष्टÑीय मानसिक आरोग्य संस्था व इतर संस्थांकडून मिळून मार्गदर्शन देऊ.

लष्करातील दोघांना लागण

भारतीय लष्करातील दोघांना कोरोनाची लागण झाल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले. यात कोलकाता येथील कर्नल डॉक्टर व डेहराडून येथील जेसीओ आहे. श्रीनगर येथे एका जवानाला लागण झाल्याचे वृत्त खोटे असल्याचेही सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCentral Governmentकेंद्र सरकार