शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
3
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
4
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
5
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
6
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
7
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
8
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
9
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
10
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
11
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
12
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
13
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
14
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
15
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
16
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
17
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
18
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
19
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
20
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS

ना खाऊंगा ना खाने दूंगा, जय शहाने भरपूर खाल्ले त्याबद्दल काहीतरी बोला मोदी - राहुल गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2017 16:22 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी तुम्ही म्हणाला होता ना खाऊंगा ना खाने दूंगा, जय शहाने भरपूर खाल्ले त्याबद्दल काहीतरी बोला.

ठळक मुद्देजय शहाच्या कंपनीने इतक्या वेगाने कशी प्रगती केली ? असा सवाल राहुल गांधींनी गांधीनगर येथील सभेत विचारला.

गांधीनगर - पंतप्रधान नरेंद्र मोदी तुम्ही म्हणाला होता ना खाऊंगा ना खाने दूंगा, जय शहाने भरपूर खाल्ले त्याबद्दल काहीतरी बोला. जय शहाबद्दल एक ओळ तरी बोला मोदी, अशा शब्दात काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्यावर हल्लाबोल केला. मेक इन इंडिया, स्टार्ट अप इंडिया या मोदी सरकारने सुरु केलेल्या योजना अपयशी ठरल्या पण एका कंपनीने रॉकेटच्या स्पीडने प्रगती केली. 

ती म्हणजे जय शहाची कंपनी. जय शहाच्या कंपनीने इतक्या वेगाने कशी प्रगती केली ? असा सवाल राहुल गांधींनी गांधीनगर येथील सभेत विचारला. वर्षअखेरीस होणा-या विधानसभा निवडणुकीआधी गुजरातमध्ये राजकीय रण पेटले असून, भाजपा आणि काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोपाचा खेळ रंगला आहे. अल्पेश ठाकोर, जिगनेश मेवानी, हार्दिक पटेल यांनी दाखवून दिले गुजरात शांत बसणार नाही. 

तुम्ही गुजरातचा आवाज दाबू शकत नाही तसेच तो खरेदीही करु शकत नाही असे राहुल गांधी म्हणाले. महात्मा गांधी, सरदार पटेल या गुजरातच्या आवाजाने महासत्तेला देशातून पळवून लावले आहे हे लक्षात ठेवा. मागच्या 22 वर्षांपासून गुजरातमध्ये लोकांचे सरकार नव्हते. पाच ते दहा उद्योगपतींचे सरकार होते असा आरोप राहुल यांनी केला. गुजरातच्या जनतेला नोकरी, चांगले शिक्षण हवे आहे. पण भाजपा सरकार या गोष्टी जनतेला देण्यात अपयशी ठरली आहे असे राहुल गांधी म्हणाले. जेव्हा तुम्ही सेल्फी घेण्यासाठी बटण क्लिक करता तेव्हा चीनमधल्या युवकाला रोजगार मिळतो असे राहुल म्हणाले. 

मुख्यमंत्री असताना गुजरातच्या विकासासाठी किती संघर्ष करावा लागला ते मलाच माहित मोदींनी रविवारी भावनगरमध्ये रो-रो सेवेचे उदघाटन करताना  काँग्रेसवर जोरदार टीका केली. 2014 च्या आधी केंद्रात सतेवर असलेल्या काँग्रेसने गुजरातचा विकास रोखण्याचे शक्य ते सर्व प्रयत्न केला असा आरोप केला.  वापी ते कच्छच्या मांडवीपर्यंत विकास रोखण्यात आला. उद्योग पर्यावरणाच्या नावाखाली बंद करण्याची धमकी दिली. विकासाला टाळ लावण्याची धमकी दिली. मी मुख्यमंत्री असताना गुजरातच्या विकासासाठी मला किती संघर्ष करावा लागला ते मलाच माहित आहे असे मोदी म्हणाले. 

टॅग्स :GujaratगुजरातRahul Gandhiराहुल गांधी