शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

पितृपक्षात तरी गुन्हे करू नका, बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांची गुन्हेगारांना हात जोडून विनवणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2018 05:25 IST

बिहारमधील गुन्हेगारीला आळा घालण्यात अपयश आल्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री व भाजपचे नेते सुशीलकुमार मोदी यांनी किमान पितृपक्षात तरी गुन्हे करू नका, अशी विनवणी

- ए. पी. सिन्हापाटणा  -  बिहारमधील गुन्हेगारीला आळा घालण्यात अपयश आल्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री व भाजपचे नेते सुशीलकुमार मोदी यांनी किमान पितृपक्षात तरी गुन्हे करू नका, अशी विनवणी राज्यातील गुन्हेगारांना करताना, त्यासाठी मी तुमच्यापुढे हात जोडतो, असे वक्तव्य केल्याने विरोधकांना टीकेसाठी आयतीच संधी मिळाली आहे.बिहारमधील गया येथे दरवर्षी पितृपक्ष मेळा भरतो. देशभरातील लाखो लोक त्यावेळी तिथे पिंडदानासाठी येतात. त्या मेळ्याच्या उद्घाटनासाठी सुशीलकुमार मोदी तिथे गेले होते. तिथे गुन्हेगारांना उद्देशून उपमुख्यमंत्री म्हणाले की, तुम्ही एरवी गुन्हे करीतच असता. आम्ही गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी प्रयत्न केले तरी तुमचे गुन्हे सुरूच राहतात. आता किमान पितृपक्षामध्ये तरी गुन्हे करू नका, अशी माझी तुम्हाला हात जोडून विनंतीआहे.गया येथे देशभरातून जे लोक पिंडदानासाठी येतात, त्यांना लुबाडणे, त्यांच्या वस्तू वा पैसा लुटणे, त्यांना धमकावणे असे प्रकार मोठ्या प्रमाणात होतात. बिहारचे नाव देशात आणखी बदनाम करू नका, असे सांगताना ते म्हणाले की, १५ दिवस चालणाऱ्या हिंदूंच्या या धार्मिक कार्यक्रमात तरी तुम्ही कृपाकरून काही करू नका. परराज्यांतून आलेल्या एकाही व्यक्तीकडून गुन्हेगारी, गुंडगिरीची तक्रार येऊ नये, अशी सरकारची इच्छा आहे.आता पायाही पडा : तेजस्वी यादवसुशीलकुमार मोदी यांच्या या विनवणीमुळे राष्ट्रीय जनता दल व काँग्रेसने नितीशकुमार सरकारवर टीकेची झोड उठवली आहे.बिहारमधील सत्ताधारी आता गुन्हेगारांनाच विनवण्या करू लागले आहेत, आता गुन्हेगारांच्या पाया पडणे तेवढे सरकारने बाकी ठेवले आहे, अशी टीका राजदचे नेते तेजस्वी यादव यांनी केली.गुन्हेगारांकडे याचना करणारे सरकार बिहारच्या जनतेने याआधी कधीही पाहिले नव्हते, असा टोला काँग्रेसनेही लगावला आहे.

टॅग्स :Biharबिहारnewsबातम्या