शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
2
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
3
तुमचा पुण्यातील रोजचा प्रवास ३५ किमी आहे, तर तुम्ही कोणती स्कूटर, मोटरसायकल घ्यावी? 
4
ट्रम्प यांच्या एका निर्णयाने अमेरिकेतील भारतीयांची धाकधूक वाढली; मायक्रोसॉफ्टने कर्मचाऱ्यांना पाठवला तातडीचा ईमेल
5
परदेशी पाहुण्यांशी असलं वागणं शोभतं का? 'टपोरी' मुलाच्या Viral Video वर नेटकरी संतापले
6
निलेश साबळेनेच मला बाईचं कॅरेक्टर करायला सांगितलं होतं, भाऊ कदमचा खुलासा
7
भूपतीचा शस्त्रसंधीचा प्रस्ताव, जगन म्हणतो शस्त्र ठेवणार नाही ! माओवादी संघटनेतील वाद चव्हाट्यावर
8
१०० वर्षांनी शुभ योगात सर्वपित्री अमावास्या २०२५: ६ मूलांकांचे ग्रहण सुटेल; पैसा-लाभ-वरदान!
9
अमेरिकेत करिअरचे दार उघडणारा H-1B व्हिसा काय आहे? कोणाला मिळतो? जाणून घ्या संपूर्ण माहिती...
10
पुढच्या आठवड्यात येणार IPO चा पाऊस, २२ आयपीओंमध्ये मिळणार गुंतवणूकीची संधी; कोणत्या आहेत कंपन्या?
11
हृदयस्पर्शी! "आई-वडिलांना सोडून मुलगी गेली लंडनला"; ८० वर्षांचे आजोबा ट्रेनमध्ये विकतात पदार्थ
12
हाफिज सईदने दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे नाव बदलले; आता 'अल-मुराबितुन' नावाने पैसे गोळा करणार
13
GST Rate Cut: ५०% सूट, ८०% सूट... कपडे आणि बुटांच्या दुकांनावर आता अशा ऑफर्स दिसणार नाहीत! GST कपातीशी संबंध काय?
14
Hanuman Temple: 'या' मंदिरात हनुमान निद्रावस्थेत, तरीही केवळ दर्शनाने पूर्ण होते भक्तांची प्रत्येक इच्छा 
15
Vivo Y50i: झटक्यात चार्ज होणार आणि दिर्घकाळ चालणार; विवोचा बजेट स्मार्टफोन बाजारात!
16
शाहिद आफ्रिदीचं इरफान पठाणला आव्हान, म्हणाला, ‘’मर्द असशील तर…”, मिळालं असं प्रत्युत्तर
17
मोलकरणीने मालकिणीच्या 'थप्पड'चा असा घेतला बदला, वाचून तुमच्याही भुवया उंचावतील!
18
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
19
'शिंदे, पवार अन् भाजपचे ९०% आमदार मते चोरुन निवडून आले', संजय राऊतांचे टीकास्त्र
20
VIDEO: हार्दिक पांड्याने सीमारेषेवर धावत-पळत, कसरत करत घेतला भन्नाट झेल, पाहणारेही थक्क

बाळाला मांडीवर घेऊन स्वयंपाक करू नका; अहवालातून धक्कादायक माहिती समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2024 11:39 IST

धुराच्या संपर्कात आल्याने १,००० मुलांपैकी २७ बाळांचा होतोय मृत्यू

वॉशिंग्टन :केंद्र सरकार स्वयंपाकासाठी वापरण्यात येत असलेली चूल बंद करून त्याजागी गॅस देण्याचा प्रयत्न करीत असतानाही यात अद्याप अपेक्षित यश हाती आलेले दिसत नाही. त्यामुळे देशात मोठ्या प्रमाणात स्वयंपाकासाठी लाकूड, शेणखत या इंधनाचा वापर होत आहे. धुराच्या संपर्कात आल्याने देशात १,००० मुलांपैकी २७ मुलांचा मृत्यू होत असल्याचे धक्कादायक वास्तव अमेरिकेतील एका प्रतिष्ठित विद्यापीठाने जारी केलेल्या अहवालातून समोर आले आहे.

कॉर्नेल विद्यापीठातील चार्ल्स एच. डायसन स्कूल ऑफ अप्लाइड इकॉनॉमिक्स अॅण्ड मॅनेजमेंटचे प्राध्यापक अर्णब बसू यांनी 'भारतातील स्वयंपाकासाठीच्या इंधन निवडी आणि बालमृत्यू' या शीर्षकाच्या अहवालात १९९२ ते २०१६ दरम्यान करण्यात आलेल्या अनेक सर्वेक्षण डेटाचा वापर केला आहे. या प्रदूषणकारी इंधनांचा मानवी आरोग्यावर काय परिणाम होतो हे शोधण्यासाठी या डेटाचा वापर केला. एका महिन्यापर्यंतच्या बालकांवर याचा सर्वाधिक परिणाम झाल्याचे अभ्यासात आढळून आले. यात बदल होणे लगेच शक्य नाही. सध्या बहुतेक लक्ष बाहेरील वायुप्रदूषण आणि पिकाचा कचरा जाळण्यावर केंद्रित आहे. सरकारने घरातील प्रदूषणाकडे लक्ष देणे तितकेच महत्त्वाचे आहे, असे अहवालात म्हटले आहे.

आईवर असते स्वयंपाकाची जबाबदारी

लहान मुलांची फुप्फुसे पूर्णपणे विकसित झालेली नसतात, ही मुले त्यांचा बहुतेक वेळ त्यांच्या आईच्या मांडीवर घालवतात. मात्र, या मुलांच्या आईवर घरातील सर्वांचा स्वयंपाक करण्याची सर्व जबाबदारी असते.

त्यामुळे मुलांच्या श्वासावाटे धूर शरीरात जातो. या धुरामुळे १ हजार लहान मुलांपैकी २७ बालकांचा मृत्यू होत असल्याचे बसू यांनी म्हटले आहे.३२ लाख लोकांचा धुरामुळे मृत्यू होतो

उपचारातही मुलगाच महत्त्वाचा

स्वयंपाकासाठी धूर निर्माण करणारे इंधन वापरल्याने भारतामध्ये मृत्यू होण्यामध्ये मुलांपेक्षा मुलींचा अधिक समावेश आहे.

मुली अधिक नाजूक असतात किवा प्रदूषणाशी संबंधित श्वसनाच्या आजारांना बळी पडतात हे त्याचे कारण नसून, भारतात मुलांना जास्त प्राधान्य दिले जाते आणि मुलगी आजारी पडते किंवा खोकला होतो, तेव्हा कुटुंबीय त्याकडे दुर्लक्ष करतात. 

जगातील सुमारे एक तृतीयांश लोक चुलीवर किंवा स्टोव्हवर जेवण बनवतात. यात लाकूड, शेणखत, काडीकचरा यांचाही वापर करण्यात येतो, असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. स्वच्छ इंधनाचा वापर केल्याने मुलांच्या आरोग्यावर चांगला परिणाम होईलच; शिवाय मुलींकडे होणारे दुर्लक्षही कमी होईल - अर्णब बसू, प्राध्यापक  

टॅग्स :Healthआरोग्यCentral Governmentकेंद्र सरकार