शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

बाळाला मांडीवर घेऊन स्वयंपाक करू नका; अहवालातून धक्कादायक माहिती समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2024 11:39 IST

धुराच्या संपर्कात आल्याने १,००० मुलांपैकी २७ बाळांचा होतोय मृत्यू

वॉशिंग्टन :केंद्र सरकार स्वयंपाकासाठी वापरण्यात येत असलेली चूल बंद करून त्याजागी गॅस देण्याचा प्रयत्न करीत असतानाही यात अद्याप अपेक्षित यश हाती आलेले दिसत नाही. त्यामुळे देशात मोठ्या प्रमाणात स्वयंपाकासाठी लाकूड, शेणखत या इंधनाचा वापर होत आहे. धुराच्या संपर्कात आल्याने देशात १,००० मुलांपैकी २७ मुलांचा मृत्यू होत असल्याचे धक्कादायक वास्तव अमेरिकेतील एका प्रतिष्ठित विद्यापीठाने जारी केलेल्या अहवालातून समोर आले आहे.

कॉर्नेल विद्यापीठातील चार्ल्स एच. डायसन स्कूल ऑफ अप्लाइड इकॉनॉमिक्स अॅण्ड मॅनेजमेंटचे प्राध्यापक अर्णब बसू यांनी 'भारतातील स्वयंपाकासाठीच्या इंधन निवडी आणि बालमृत्यू' या शीर्षकाच्या अहवालात १९९२ ते २०१६ दरम्यान करण्यात आलेल्या अनेक सर्वेक्षण डेटाचा वापर केला आहे. या प्रदूषणकारी इंधनांचा मानवी आरोग्यावर काय परिणाम होतो हे शोधण्यासाठी या डेटाचा वापर केला. एका महिन्यापर्यंतच्या बालकांवर याचा सर्वाधिक परिणाम झाल्याचे अभ्यासात आढळून आले. यात बदल होणे लगेच शक्य नाही. सध्या बहुतेक लक्ष बाहेरील वायुप्रदूषण आणि पिकाचा कचरा जाळण्यावर केंद्रित आहे. सरकारने घरातील प्रदूषणाकडे लक्ष देणे तितकेच महत्त्वाचे आहे, असे अहवालात म्हटले आहे.

आईवर असते स्वयंपाकाची जबाबदारी

लहान मुलांची फुप्फुसे पूर्णपणे विकसित झालेली नसतात, ही मुले त्यांचा बहुतेक वेळ त्यांच्या आईच्या मांडीवर घालवतात. मात्र, या मुलांच्या आईवर घरातील सर्वांचा स्वयंपाक करण्याची सर्व जबाबदारी असते.

त्यामुळे मुलांच्या श्वासावाटे धूर शरीरात जातो. या धुरामुळे १ हजार लहान मुलांपैकी २७ बालकांचा मृत्यू होत असल्याचे बसू यांनी म्हटले आहे.३२ लाख लोकांचा धुरामुळे मृत्यू होतो

उपचारातही मुलगाच महत्त्वाचा

स्वयंपाकासाठी धूर निर्माण करणारे इंधन वापरल्याने भारतामध्ये मृत्यू होण्यामध्ये मुलांपेक्षा मुलींचा अधिक समावेश आहे.

मुली अधिक नाजूक असतात किवा प्रदूषणाशी संबंधित श्वसनाच्या आजारांना बळी पडतात हे त्याचे कारण नसून, भारतात मुलांना जास्त प्राधान्य दिले जाते आणि मुलगी आजारी पडते किंवा खोकला होतो, तेव्हा कुटुंबीय त्याकडे दुर्लक्ष करतात. 

जगातील सुमारे एक तृतीयांश लोक चुलीवर किंवा स्टोव्हवर जेवण बनवतात. यात लाकूड, शेणखत, काडीकचरा यांचाही वापर करण्यात येतो, असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. स्वच्छ इंधनाचा वापर केल्याने मुलांच्या आरोग्यावर चांगला परिणाम होईलच; शिवाय मुलींकडे होणारे दुर्लक्षही कमी होईल - अर्णब बसू, प्राध्यापक  

टॅग्स :Healthआरोग्यCentral Governmentकेंद्र सरकार