शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

दिवाळीची उलाढाल ६० हजार कोटींची; आठ महिन्यांच्या खंडानंतर संचारला उत्साह

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2020 06:57 IST

व्यापाऱ्यांना अपेक्षा

नवी दिल्ली : फटाके, मिठाई, नवीन कपडे, घरगुती वापराच्या वस्तू, इलेक्ट्रॉनिक उपकरणे, टीव्ही, वॉशिंग मशीन अशा असंख्य वस्तूंनी बाजारपेठा फुलल्या असून, खरेदीसाठी ग्राहकांचीही झुंबड उडाली आहे. तब्बल आठ महिन्यांच्या खंडानंतर बाजारात उत्साहनिर्माण झाला असून, दिवाळीत तब्बल ६० हजार कोटी रुपयांची उलाढाल होण्याची अपेक्षा व्यापाऱ्यांना आहे.

कोरोना कहरामुळे ब्रेक लागलेली अर्थव्यवस्था ऑक्टोबरपासून पुन्हा सावरू लागली असून, हळूहळू बाजारात उत्साह संचारू लागला आहे. दिवाळीत उत्साहाने टोक गाठले असून, ग्राहकही मोठ्या संख्येने बाजाराकडे वळू लागले आहेत. दुकाने वस्तूंनी ओसंडून वाहत आहेत आणि ग्राहकही खरेदीचा उत्साह दाखवत आहेत.

गेल्या आठ महिन्यांत झालेला व्यापारातील तोटा भरून निघेल, अशी प्रतिक्रिया अखिल भारतीय व्यापारी महासंघाचे सरचिटणीस प्रवीण खंडेलवाल यांनी व्यक्त केली आहे. निदान ६० हजार कोटी रुपयांची उलाढाल दिवाळीच्या काळात  होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.  फटाक्यांपासून घरगुती वस्तूंपर्यंत सर्वच मालाला उठाव असल्याचे दिसून येत आहे.  चिनी वस्तूंची खरेदी करणे मात्र कटाक्षाने टाळले जात आहे. 

दिवाळीनिमित्त दिल्या जाणाऱ्या भेटवस्तूंची रेलचेलही बाजारात आहे. सुकामेवा, मिठाई, उंची चीजवस्तू, घड्याळे, दागिने इत्यादींच्या खरेदीकडे ग्राहकांचा कल असल्याचे निरीक्षण एका व्यापाराने नोंदवले. पंतप्रधानांनी स्वदेशी वस्तूंची  खरेदी करा, असे आवाहन  केल्याने अनेकजण स्वदेशी वस्तूंना प्राधान्य देत असल्याचे आढळून येत आहे. 

टॅग्स :Diwaliदिवाळी