शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
3
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
4
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
5
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
6
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
7
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
8
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
9
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
10
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
11
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
12
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
13
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
14
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
15
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
16
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
17
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
18
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
19
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
20
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!

नोव्हेंबरमध्ये विजेची दिवाळी! सलग तिसरा महिना

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2020 05:25 IST

५० हजार अब्ज युनिटचा वापर, मागील वर्षापेक्षा आठ टक्के वाढ

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : दीपोत्सवाच्या उत्साहाने गर्दीने भरलेल्या बाजारपेठा आणि त्यामुळे झालेली मोठी आर्थिक उलाढाल यामुळे अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर येत असल्याचे निश्चित झाले असतानाच आता विजेच्या मागणीतही मोठी वाढ झाल्याचे आढळून आले आहे. निम्मा नोव्हेंबर संपला तोपर्यंत देशभरातून ५० हजार १५९ अब्ज युनिट (बीयू) एवढी वीज पुरवली गेली. गेल्या वर्षापेक्षा यंदा ८ टक्क्यांनी विजेची मागणी वाढल्याची नोंद झाली आहे. विजेच्या वापरात वाढ होण्याचा हा सलग तिसरा महिना आहे.

सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार १५ नोव्हेंबरपर्यंत देशभरात ५० हजार अब्ज युनिटहून अधिक प्रमाणात वीज पुरविण्यात आली. गेल्या वर्षी हेच प्रमाण ७.८ टक्क्यांनी कमी होते. कोरोनामुळे निर्माण झालेली अभूतपूर्व परिस्थिती आणि देशभरात लागू झालेली टाळेबंदी यांमुळे विजेच्या वापरात कमालीची घट झाली होती. मात्र, सप्टेंबरपासून विजेच्या मागणीत वाढ नोंदवली गेली. सप्टेंबरमध्ये ११२.४ बीयू वीज वापरली गेली. तर ऑक्टोबरमध्ये हेच प्रमाण ११२ बीयू होते. नोव्हेंबरमध्ये तर पहिल्या १५ दिवसांतच १५० बीयूहून अधिक प्रमाणात विजेचा वापर झाला. टाळेबंदी शिथील केल्यानंतर सुरू झालेले उद्योग-व्यवसाय, उत्पादन क्षेत्रात सुरू झालेल्या हालचाली इत्यादींमुळे विजेचा वापर वाढल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.  

टॅग्स :electricityवीज