शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

केंद्रीय कर्मचाऱ्यांची दिवाळी जोरात; १० हजार फेस्टिव्हल अ‍ॅडव्हान्स, खरेदीसाठी कॅश व्हाउचर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2020 07:01 IST

Nirmala Sitaraman News: अर्थमंत्र्यांची घोषणा : मागणीला चालना देण्यास ७३ हजार कोटींचे उपाय

नवी दिल्ली : मंदावलेल्या अर्थव्यवस्थेत चैतन्य भरण्यासाठी ७३ हजार कोटी रुपयांची मागणी निर्माण करणाऱ्या उपाययोजनांची घोषणा केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोमवारी केली. त्यानुसार, केंद्रीय कर्मचाऱ्यांना १0 हजार रुपयांचा फेस्टिव्हल अ‍ॅडव्हान्स देण्यात येईल, तसेच ‘प्रवास रजा सवलती’च्या (एलटीसी) जागी कॅश व्हाउचर दिले जातील. याशिवाय, राज्यांना १२ हजार कोटी रुपयांचे व्याजमुक्त कर्ज दिले जाईल.

सीतारामन यांनी सांगितले की, एलटीसीच्या बदल्यातील व्हाउचर योजना (२८ हजार कोटी रुपये) आणि फेस्टिव्हल अ‍ॅडव्हान्स योजना (८ हजार कोटी रुपये) यातून ३६ हजार कोटी रुपयांची अतिरिक्त मागणी अर्थव्यवस्थेत तयार होईल. याशिवाय, केंद्र आणि राज्य सरकारांचा अतिरिक्त भांडवली खर्च ३७ हजार कोटी रुपयांचा होईल. अशा प्रकारे ३१ मार्च २0२१ पूर्वी अर्थव्यवस्थेतील एकूण मागणी प्रोत्साहन ७३ हजार कोटी रुपयांचे असेल. 2,000 कोटी पूर्वनिर्धारित सुधारणा करणाºया राज्यांना देणार.

एलटीसीऐवजी कॅश व्हाउचर, पण त्यासाठी ‘या’ आहेत अटीकेंद्रीय कर्मचाऱ्यांना चार वर्षांतून एकदा आवडीच्या ठिकाणी जाण्यासाठी रजा व प्रवास खर्च अशी एलटीसी सवलत मिळते. याशिवाय, गावी जाण्याची सवलतही त्यांना दिली जाते. महामारीच्या काळात प्रवास करणे अशक्य असल्यामुळे सरकार कर्मचाऱ्यांना कॅश व्हाउचर देईल. कर्मचारी त्यावर ३१ मार्च २0२१ पूर्वी वस्तू खरेदी करू शकतील. ही खरेदी डिजिटल पद्धतीने व जीएसटी नोंदणी असलेल्या दुकानांतूनच करावी लागेल. १२ टक्के व त्यापेक्षा जास्त जीएसटी लागणाºया बिगरखाद्य वस्तूंचीच खरेदी यावर करता येईल. कॅश व्हाउचरसाठी केंद्राच्या तिजोरीतून ५,६७५ कोटी खर्च होतील. याशिवाय, सार्वजनिक उपक्रम व सार्वजनिक क्षेत्रातील बँका आपल्या कर्मचाºयांना १,९00 कोटी रुपयांचा असाच लाभ देतील.12,000 कोटींची व्याजमुक्त कर्जे भांडवली प्रकल्पांसाठी राज्यांना ५0 वर्षांसाठी, 25,000 कोटी कोटींचा अतिरिक्त भांडवली खर्च रस्ते, संरक्षण क्षेत्रातील पायाभूत प्रकल्प, पाणीपुरवठा आणि नगर विकास यावर खर्च करणार.कसा मिळेल फेस्टिव्हल अ‍ॅडव्हान्स, कधीपर्यंत करावा लागेल खर्च?सहाव्या वेतन आयोगापासून केंद्रीय कर्मचाऱ्यांना फेस्टिव्हल अ‍ॅडव्हान्स देणे बंद करण्यात आले होते. यंदा मात्र अर्थव्यवस्थेला बूस्टर देण्यासाठी उपाय म्हणून फेस्टिव्हल अ‍ॅडव्हान्स दिला जात आहे. हा अ‍ॅडव्हान्स प्री-पेड रुपे कार्डच्या स्वरूपात मिळेल. ३१ मार्च २0२१ पूर्वी तो खर्च करावा लागेल. त्याची परतफेड १0 महिन्यांत होईल. या योजनेवर चार हजार कोटी रुपये खर्च होतील. राज्यांची ५0 टक्के स्वीकारार्हता लक्षात घेतल्यास आणखी चार हजार कोटींचा फेस्टिव्हल अ‍ॅडव्हान्स वितरित होऊ शकेल.

टॅग्स :Nirmala Sitaramanनिर्मला सीतारामनDiwaliदिवाळी