शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
2
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
3
हाफिज सईदने दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे नाव बदलले; आता 'अल-मुराबितुन' नावाने पैसे गोळा करणार
4
५०% सूट, ८०% सूट... कपडे आणि बुटांच्या दुकांनावर आता अशा ऑफर्स दिसणार नाहीत! GST कपातीशी संबंध काय?
5
शाहिद आफ्रिदीचं इरफान पठाणला आव्हान, म्हणाला, ‘’मर्द असशील तर…”, मिळालं असं प्रत्युत्तर
6
नागपूरमध्ये मनोज जायस्वाल यांना अटक, सीबीआयची हॉटेलमध्ये कारवाई; 4000 कोटींची केस काय?
7
मोलकरणीने मालकिणीच्या 'थप्पड'चा असा घेतला बदला, वाचून तुमच्याही भुवया उंचावतील!
8
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
9
'शिंदे, पवार अन् भाजपचे ९०% आमदार मते चोरुन निवडून आले', संजय राऊतांचे टीकास्त्र
10
IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय वंशाचा, अर्धे खेळाडू पाकिस्तानी वंशाचे निघाले
11
मारुतीनंतर महिंद्राचे GST रेट आले...! स्कॉर्पिओ एनपेक्षा XUV 700 स्वस्त झाली, बोलेरो निओ तर...
12
हृदयद्रावक! जुळ्या मुलांनी आईला मारलेली मिठी; ढिगाऱ्याखालील मृतदेह पाहून अख्खं गाव रडलं
13
VIRAL : सलाम तिच्या हिमतीला! 'मौत का कुआं'मध्ये बाईक चालवणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल
14
VIDEO: हार्दिक पांड्याने सीमारेषेवर धावत-पळत, कसरत करत घेतला भन्नाट झेल, पाहणारेही थक्क
15
भारत टेन्शन फ्री... ४ वर्षात जे झालं नव्हतं ते आता झालं, 'हा' कोणता साठा आता जमा झाला?
16
"त्या २४८ शेतकऱ्यांना तीन महिन्यांत कर्जमाफी द्या", उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले, आदेश काय?
17
घरची गरिबी, टोमणे सहन केले, पण मानली नाही हार, बनली बॉक्सिंगमध्ये वर्ल्ड चॅम्पियन, कोण आहे मीनाक्षी हुड्डा
18
हसत हसतच पाण्याच उतरलेला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जुबीन गर्गचा शेवटचा Video व्हायरल
19
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
20
Akshay Kumar : सातवीत नापास झाला होता अभिनेता अक्षय कुमार; लहानपणी पाहिलेलं 'हे' स्वप्न

खटले वेगाने निकाली काढण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे विभाजन करा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2019 04:50 IST

न्याय मिळण्यात होत असलेल्या विलंबाबद्दल उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांंनी तीव्र चिंता व्यक्त केली आहे.

नवी दिल्ली : न्याय मिळण्यात होत असलेल्या विलंबाबद्दल उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांंनी तीव्र चिंता व्यक्त केली आहे. घटनात्मक प्रकरणे व अपिलांच्या सुनावणीसाठी सर्वोच्च न्यायालयाचे विभाजन करण्याची सूचनाही त्यांनी केली. सर्वोच्च न्यायालयाची चार विभागीय खंडपीठे स्थापन करून खटले वेगाने निकाली काढावेत असेही नायडू यांनी म्हटले आहे.

दिवंगत कायदेतज्ज्ञ पी. पी. राव यांच्या लेखनावर आधारित पुस्तकाचे नायडू यांच्या हस्ते शनिवारी दिल्लीमध्ये प्रकाशन झाले. सर्वोच्च न्यायालय दिल्ली किंवा अन्यत्र कुठे भरवावे याचा निर्णय राष्ट्रपतींच्या संमतीने सरन्यायाधीशांनी घ्यायचा आहे असे राज्यघटनेच्या कलम १३०मध्ये म्हटले आहे. त्याचा संदर्भ देऊन नायडू म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाच्या स्वरुपामध्ये बदल करण्यासाठी राज्यघटनेमध्ये दुरुस्ती करावी लागेल. सर्वोच्च न्यायालयाची विभागीय खंडपीठे प्रायोगिक तत्त्वावर स्थापन करण्यात यावीत अशी शिफारस विधी व न्याय स्थायी समितीनेही केली होती.दिल्लीशिवाय अन्यत्र ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाची खंडपीठे स्थापन करण्याची आवश्यकता नाही असे या न्यायालयाच्या पूर्ण खंडपीठाने वेळोवेळी स्पष्ट केले आहे. उच्च न्यायालयाचे आदेश किंवा निकालांतून उद्भवणाऱ्या घटनात्मक वादांवर निर्णय देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे विभाजन करून दिल्ली (उत्तर भारत), चेन्नई/हैदराबाद (दक्षिण भारत), कोलकाता (पूर्व भारत), मुंबई (पश्चिम भारत) इथे विभागीय खंडपीठे स्थापन करावी ही शिफारस सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली होती.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय