शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

15 ऑगस्ट दिनी महाराष्ट्र कन्येला बहुमान, सेलमच्या जिल्हाधिकारी जगभर झळकणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2019 18:32 IST

सोलापूर जिल्ह्याच्या माढा तालुक्यातील कन्या आणि तामिळनाडूतील सेलमच्या जिल्हाधिकारी रोहिणी भाजीभाकरे

ठळक मुद्दे'द ग्रेट इंडियन इलेक्शन' या माहितीपटाद्वारे देशातील निवडणूक प्रक्रियेची माहिती जगाला दाखविण्यात येणार आहे.सोलापूर जिल्ह्याच्या माढा तालुक्यातील कन्या आणि तामिळनाडूतील सेलमच्या जिल्हाधिकारी रोहिणी भाजीभाकरे

मुंबई - 'नॅशनल जिओग्राफी' या वृत्तवाहिनीवरुन 15 ऑगस्ट रोजी भारतीय लोकशाहीच्या निवडणुक प्रक्रियेची माहिती जगाला दाखवण्यात येणार आहे. जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या देशातील निवडणूक प्रक्रिया आणि त्याची अंमलबजावणी कशी होते, याबाबतचा एक माहितीपट या वृत्तवाहिनीवरुन जगाला दाखवण्यात येणार आहे. 

'द ग्रेट इंडियन इलेक्शन' या माहितीपटाद्वारे देशातील निवडणूक प्रक्रियेची माहिती जगाला दाखविण्यात येणार आहे. या माहितीपटाद्वारे जगाला आपली निवडणूक प्रक्रिया समाजावून सांगण्यासाठी देशातून दोन आयएएस अधिकाऱ्यांची निवड करण्यात आली आहे. त्यामध्ये महाराष्ट्र कन्येला संधी मिळाली आहे. सोलापूर जिल्ह्याच्या माढा तालुक्यातील कन्या आणि तामिळनाडूतील सेलमच्या जिल्हाधिकारी रोहिणी भाजीभाकरे यांची या निवेदनासाठी निवड झाली आहे. तर, दुसरे आयएएस अधिकारी हे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाराणसी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सुरेंद्र सिंग असणार आहेत. 

सेलम जिल्ह्याच्या पहिल्या महिला जिल्हाधिकारी म्हणून रोहिणी भाजीभाकरे यांनी यंदाच्या लोकसभा निवडणुकीत निवडणूक निर्णय अधिकारी बनून काम पाहिलं. त्याचा आपणास अभिमान वाटतो, तर देशातील निवडणूक प्रक्रिया जगाला समाजावून सांगण्याची संधी मिळणे ही सेलम जिल्ह्यातील कामाची पावती असल्याचे रोहिणी भाजीभाकरे यांनी म्हटले आहे. भारतात नुकतेच 17 व्या लोकसभा निवडणुकांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. ईव्हीएम मशिनद्वारे देशातील 545 मतदारसंघात मतदान घेण्यात आले. कोट्यवधी नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावत नवीन सरकार स्थापन केले. यावेळीही जनतेनं मोदींच्या नेतृत्वाला संधी दिली आहे. निवडणूक आयोगाने सरकारी कर्मचारी आणि देशातील सुरक्षा रक्षकांना सोबत घेऊन शांततेत आणि अतिशय सहजतेनं ही निवडणूक प्रक्रिया पार पाडली. निश्चितच भारतासारख्या विशाल लोकसंख्या असलेल्या देशातील निवडणूक प्रकिया ही जगभरातील लोकांसाठी उत्सुकतेचा विषय आहे. कारण, न्यूटन चित्रपटात दाखवलेल्या आदिवासी बहुल भागांपासून ते दिल्लीच्या हाय प्रोफाईल लोकांपर्यंत सर्वच मतदारांनी त्यादिवशी आपला मतदानाचा हक्क बजावला. सुरक्षा यंत्रणा, ईव्हीएम प्रणाली, व्हीपॅटपॅट प्रणाली, निवडणूक आयोगाची नियमावली, आचारसंहिता यांसह बारीकसारीक गोष्टींचे नियोजन या मतदानप्रक्रियेवेळी करावे लागते. त्यामुळेच, जगभरातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारताच्या निवडणूप्रकिया एक संशोधनाचा विषय आहे.      

टॅग्स :VaranasiवाराणसीElectionनिवडणूकTamilnaduतामिळनाडूSolapurसोलापूर