शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
4
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
5
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
6
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
7
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
8
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
9
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
10
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
11
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
12
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
13
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
14
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
15
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
16
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
17
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
18
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
19
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
20
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त

पंतप्रधान मोदींच्या वडोदरामधील रॅलीसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी गुजरात सरकारकडे 80 लाखांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2017 17:38 IST

वडोदराचे जिल्हाधिकारी पी. भारती यांनी मंगळवारी ‘सरदार सरोवर नर्मदा निगम’ या सरकारी विभागाला विशेष पत्र लिहून ७५ लाख रुपयांची मागणी केली आहे.

ठळक मुद्देवडोदराचे जिल्हाधिकारी पी. भारती यांनी मंगळवारी ‘सरदार सरोवर नर्मदा निगम’ या सरकारी विभागाला विशेष पत्र लिहून ७५ लाख रुपयांची मागणी केली आहे. नर्मदा महोत्सवासाठी एका रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे. रॅलीमध्ये सहभागी होणाऱ्या दीड लाख लोकांना अन्नाची पाकिटं वाटण्यासाठी हे पैसे हवे असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी पत्रात म्हंटलं आहे.

वडोदरा, दि. 6- वडोदराचे जिल्हाधिकारी पी. भारती यांनी मंगळवारी ‘सरदार सरोवर नर्मदा निगम’ या सरकारी विभागाला विशेष पत्र लिहून ७५ लाख रुपयांची मागणी केली आहे. मोदींच्या वाढदिवसाच्या दिवशी म्हणजेच 17 सप्टेंबर रोजी नर्मदा महोत्सवासाठी एका रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे. या रॅलीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदीही सहभागी होणार आहे. या रॅलीमध्ये सहभागी होणाऱ्या दीड लाख लोकांना अन्नाची पाकिटं वाटण्यासाठी हे पैसे हवे असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी पत्रात म्हंटलं आहे. इंडियन एक्स्प्रेसने ही बातमी दिली आहे.

वडोदराच्या ‘डबोही’ इथे १७ सप्टेंबर रोजी ही रॅली होणार आहे. या रॅलीत मोदी स्वतः उपस्थितीत राहणार असल्यामुळे रॅलीत लोक मोठ्या संख्येने सहभागी होतील, असा अंदाज व्यक्त केला जातो आहे. तसंच सामान्य कार्यकर्त्यांबरोबरच अनेक प्रसिद्ध व्यक्तीही या रॅलीत सहभाग घेणार आहेत. त्यामुळे व्हीव्हीआयपी व्यक्तींच्या जेवणासाठी अतिरिक्त ५ लाख रुपयांचा निधीही जिल्हाधिकाऱ्यांनी मागितला आहे. हा सर्व खर्च तब्बल ८० लाख इतका होऊ शकतो . १७ सप्टेंबरला नर्मदा महोत्सवासाठी एका रॅलीचं आयोजन करण्यात आल्याचं  जिल्हाधिकारी भारती यांनी सरकारी विभागाला पाठवलेल्या पत्रात म्हटलं आहे. १७ सप्टेंबरला पंतप्रधान मोदी यांचाही वाढदिवस असतो. त्यामुळे ही रॅली नेमकी आहे कशासाठी, असा सवाल उपस्थित केला जातो आहे. 

दरम्यान, मोदींच्या या रॅलीसाठी विविध जिल्ह्यांमधून दीड लाख लोक येणार आहेत. या लोकांना राज्य परिवहन विभागाच्या १८०० बसेसमधून रॅलीच्या ठिकाणी आणण्यात येईल. हा सगळा खर्च जिल्हा प्रशासनाला उचलावा लागणार आहे. प्रत्येकासाठी अन्नाची पाकीटं आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी लागणार आहे. यासाठी प्रती व्यक्ती ५० रुपये इतका खर्च अपेक्षित आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी भारती यांना विचारलं असता, आम्ही फक्त सरकारला निधी देण्याची विनंती केल्याचं त्यांनी सांगितलं.