शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

पंतप्रधान मोदींच्या वडोदरामधील रॅलीसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी गुजरात सरकारकडे 80 लाखांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2017 17:38 IST

वडोदराचे जिल्हाधिकारी पी. भारती यांनी मंगळवारी ‘सरदार सरोवर नर्मदा निगम’ या सरकारी विभागाला विशेष पत्र लिहून ७५ लाख रुपयांची मागणी केली आहे.

ठळक मुद्देवडोदराचे जिल्हाधिकारी पी. भारती यांनी मंगळवारी ‘सरदार सरोवर नर्मदा निगम’ या सरकारी विभागाला विशेष पत्र लिहून ७५ लाख रुपयांची मागणी केली आहे. नर्मदा महोत्सवासाठी एका रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे. रॅलीमध्ये सहभागी होणाऱ्या दीड लाख लोकांना अन्नाची पाकिटं वाटण्यासाठी हे पैसे हवे असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी पत्रात म्हंटलं आहे.

वडोदरा, दि. 6- वडोदराचे जिल्हाधिकारी पी. भारती यांनी मंगळवारी ‘सरदार सरोवर नर्मदा निगम’ या सरकारी विभागाला विशेष पत्र लिहून ७५ लाख रुपयांची मागणी केली आहे. मोदींच्या वाढदिवसाच्या दिवशी म्हणजेच 17 सप्टेंबर रोजी नर्मदा महोत्सवासाठी एका रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे. या रॅलीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदीही सहभागी होणार आहे. या रॅलीमध्ये सहभागी होणाऱ्या दीड लाख लोकांना अन्नाची पाकिटं वाटण्यासाठी हे पैसे हवे असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी पत्रात म्हंटलं आहे. इंडियन एक्स्प्रेसने ही बातमी दिली आहे.

वडोदराच्या ‘डबोही’ इथे १७ सप्टेंबर रोजी ही रॅली होणार आहे. या रॅलीत मोदी स्वतः उपस्थितीत राहणार असल्यामुळे रॅलीत लोक मोठ्या संख्येने सहभागी होतील, असा अंदाज व्यक्त केला जातो आहे. तसंच सामान्य कार्यकर्त्यांबरोबरच अनेक प्रसिद्ध व्यक्तीही या रॅलीत सहभाग घेणार आहेत. त्यामुळे व्हीव्हीआयपी व्यक्तींच्या जेवणासाठी अतिरिक्त ५ लाख रुपयांचा निधीही जिल्हाधिकाऱ्यांनी मागितला आहे. हा सर्व खर्च तब्बल ८० लाख इतका होऊ शकतो . १७ सप्टेंबरला नर्मदा महोत्सवासाठी एका रॅलीचं आयोजन करण्यात आल्याचं  जिल्हाधिकारी भारती यांनी सरकारी विभागाला पाठवलेल्या पत्रात म्हटलं आहे. १७ सप्टेंबरला पंतप्रधान मोदी यांचाही वाढदिवस असतो. त्यामुळे ही रॅली नेमकी आहे कशासाठी, असा सवाल उपस्थित केला जातो आहे. 

दरम्यान, मोदींच्या या रॅलीसाठी विविध जिल्ह्यांमधून दीड लाख लोक येणार आहेत. या लोकांना राज्य परिवहन विभागाच्या १८०० बसेसमधून रॅलीच्या ठिकाणी आणण्यात येईल. हा सगळा खर्च जिल्हा प्रशासनाला उचलावा लागणार आहे. प्रत्येकासाठी अन्नाची पाकीटं आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी लागणार आहे. यासाठी प्रती व्यक्ती ५० रुपये इतका खर्च अपेक्षित आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी भारती यांना विचारलं असता, आम्ही फक्त सरकारला निधी देण्याची विनंती केल्याचं त्यांनी सांगितलं.