शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

पंतप्रधान मोदींच्या वडोदरामधील रॅलीसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी गुजरात सरकारकडे 80 लाखांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2017 17:38 IST

वडोदराचे जिल्हाधिकारी पी. भारती यांनी मंगळवारी ‘सरदार सरोवर नर्मदा निगम’ या सरकारी विभागाला विशेष पत्र लिहून ७५ लाख रुपयांची मागणी केली आहे.

ठळक मुद्देवडोदराचे जिल्हाधिकारी पी. भारती यांनी मंगळवारी ‘सरदार सरोवर नर्मदा निगम’ या सरकारी विभागाला विशेष पत्र लिहून ७५ लाख रुपयांची मागणी केली आहे. नर्मदा महोत्सवासाठी एका रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे. रॅलीमध्ये सहभागी होणाऱ्या दीड लाख लोकांना अन्नाची पाकिटं वाटण्यासाठी हे पैसे हवे असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी पत्रात म्हंटलं आहे.

वडोदरा, दि. 6- वडोदराचे जिल्हाधिकारी पी. भारती यांनी मंगळवारी ‘सरदार सरोवर नर्मदा निगम’ या सरकारी विभागाला विशेष पत्र लिहून ७५ लाख रुपयांची मागणी केली आहे. मोदींच्या वाढदिवसाच्या दिवशी म्हणजेच 17 सप्टेंबर रोजी नर्मदा महोत्सवासाठी एका रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे. या रॅलीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदीही सहभागी होणार आहे. या रॅलीमध्ये सहभागी होणाऱ्या दीड लाख लोकांना अन्नाची पाकिटं वाटण्यासाठी हे पैसे हवे असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी पत्रात म्हंटलं आहे. इंडियन एक्स्प्रेसने ही बातमी दिली आहे.

वडोदराच्या ‘डबोही’ इथे १७ सप्टेंबर रोजी ही रॅली होणार आहे. या रॅलीत मोदी स्वतः उपस्थितीत राहणार असल्यामुळे रॅलीत लोक मोठ्या संख्येने सहभागी होतील, असा अंदाज व्यक्त केला जातो आहे. तसंच सामान्य कार्यकर्त्यांबरोबरच अनेक प्रसिद्ध व्यक्तीही या रॅलीत सहभाग घेणार आहेत. त्यामुळे व्हीव्हीआयपी व्यक्तींच्या जेवणासाठी अतिरिक्त ५ लाख रुपयांचा निधीही जिल्हाधिकाऱ्यांनी मागितला आहे. हा सर्व खर्च तब्बल ८० लाख इतका होऊ शकतो . १७ सप्टेंबरला नर्मदा महोत्सवासाठी एका रॅलीचं आयोजन करण्यात आल्याचं  जिल्हाधिकारी भारती यांनी सरकारी विभागाला पाठवलेल्या पत्रात म्हटलं आहे. १७ सप्टेंबरला पंतप्रधान मोदी यांचाही वाढदिवस असतो. त्यामुळे ही रॅली नेमकी आहे कशासाठी, असा सवाल उपस्थित केला जातो आहे. 

दरम्यान, मोदींच्या या रॅलीसाठी विविध जिल्ह्यांमधून दीड लाख लोक येणार आहेत. या लोकांना राज्य परिवहन विभागाच्या १८०० बसेसमधून रॅलीच्या ठिकाणी आणण्यात येईल. हा सगळा खर्च जिल्हा प्रशासनाला उचलावा लागणार आहे. प्रत्येकासाठी अन्नाची पाकीटं आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी लागणार आहे. यासाठी प्रती व्यक्ती ५० रुपये इतका खर्च अपेक्षित आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी भारती यांना विचारलं असता, आम्ही फक्त सरकारला निधी देण्याची विनंती केल्याचं त्यांनी सांगितलं.