शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
8
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

लोकसंख्या नियंत्रणाकडे आणीबाणीपासून दुर्लक्ष, एन. आर. नारायण मूर्ती यांची खंत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2024 07:30 IST

इन्फोसिसचे सहसंस्थापक एन. आर. नारायण मूर्ती यांनी भारताची लोकसंख्या वाढ आणि देशाच्या शाश्वततेवरील त्याचा संभाव्य परिणाम याबद्दल चिंता व्यक्त केली.

प्रयागराज : "आणीबाणीच्या काळापासून भारताने लोकसंख्या नियंत्रणाकडे पुरेसे लक्ष दिलेले नाही, ज्यामुळे देशाच्या शाश्वततेला मोठा धोका आहे," असे सांगत इन्फोसिसचे सहसंस्थापक एन. आर. नारायण मूर्ती यांनी भारताची लोकसंख्या वाढ आणि देशाच्या शाश्वततेवरील त्याचा संभाव्य परिणाम याबद्दल चिंता व्यक्त केली. त्यांनी जमिनीची उपलब्धता आणि आरोग्य सेवेशी संबंधित गंभीर आव्हानांवरही भर दिला. 

येथील मोतीलाल नेहरू राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेच्या (एमएनएनआयटी) दीक्षांत समारंभात संबोधित करताना ते म्हणाले, "भारताला लोकसंख्या, दरडोई जमिनीची उपलब्धता आणि आरोग्य सुविधांशी संबंधित महत्त्वाच्या आव्हानांना तोंड द्यावे लागत आहे. आणीबाणीच्या काळापासून, आम्ही भारतीयांनी लोकसंख्या नियंत्रणाकडे पुरेसे लक्ष दिले नाही. यामुळे आपल्या देशाला टिकाव धरणे अवघड होण्याचा धोका निर्माण झाला आहे. 

तुलनेत अमेरिका, ब्राझील आणि चीनसारख्या देशांमध्ये दरडोई जमिनीची उपलब्धता खूप जास्त आहे." मूर्ती यांनी पदवीधरांना उच्च आकांक्षा बाळगा, मोठी स्वप्ने पाहा आणि त्या स्वप्नांचे सत्यात रूपांतर करण्यासाठी परिश्रमपूर्वक काम करण्याचे आवाहन केले. देशाच्या प्रगतीत योगदान देणे ही खऱ्या व्यावसायिकाची जबाबदारी आहे, हे योगदान कठोर परिश्रम आणि समर्पणावर अवलंबून असते, असे ते म्हणाले.

भावी पिढीसाठी बलिदान आवश्यक "एका पिढीने भावी पिढीचे जीवन सुधारण्यासाठी अनेक बलिदान दिले पाहिजेत. माझ्या प्रगतीसाठी माझे आई-वडील, भावंड आणि शिक्षक यांनी मोठे बलिदान दिले आणि येथे प्रमुख पाहुणे म्हणून माझी उपस्थिती हा त्यांचा त्याग व्यर्थ गेला नाही याचा पुरावा आहे." असे ते म्हणाले.

टॅग्स :Indiaभारत