शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

तामिळनाडूतल्या 18 बंडखोर आमदारांना मद्रास उच्च न्यायालयाचा तात्पुरता दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2018 15:59 IST

अण्णा द्रमुकच्या 18 बंडखोर आमदारांची आमदारकी रद्द करण्याच्या निर्णयाला आव्हान देणा-या याचिकेवर मद्रास उच्च न्यायालयात सुनावणी झाली

चेन्नई- अण्णा द्रमुकच्या 18 बंडखोर आमदारांची आमदारकी रद्द करण्याच्या निर्णयाला आव्हान देणा-या याचिकेवर मद्रास उच्च न्यायालयात सुनावणी झाली असून, न्यायालय अद्याप कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचलेलं नाही. या याचिकेवर सुनावणी करणा-या खंडपीठाच्या दोन्ही न्यायाधीशांची मतं वेगवेगळी आहेत.मद्रास उच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीश इंदिरा बॅनर्जी यांनी आमदारांना अयोग्य ठरवण्याच्या बाजूनं कल दिला. तर न्यायाधीश एम. सुंदर यांनी त्यांची आमदारकी रद्द करू नये, असा निर्णय दिला. त्यामुळे आता हे प्रकरण तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे वर्ग करण्यात आलं आहे. न्यायालयाचा निर्णय येत नाही, तोपर्यंत पोटनिवडणुका घेता येणार नसल्याचं मद्रास उच्च न्यायालयानं स्पष्ट केलं आहे.या सर्व आमदारांना अण्णा द्रमुकचे बंडखोर नेते टीटीव्ही दिनाकरण यांना पाठिंबा दिल्याप्रकरणी त्यांना अयोग्य घोषित करण्यात आलं होतं. त्यामुळे मुख्यमंत्री के. पलानीस्वामी यांच्या नेतृत्वातील अण्णा द्रमुक सरकारच्या स्थिरतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झालं होतं. जर न्यायालयानं आमदारांची आमदारकी रद्द करण्याच्या निर्णयाला योग्य ठरवलं असतं तर सद्यस्थितीत अण्णा द्रमुकच्या सरकारला बहुमत सिद्ध करावं लागलं असतं. त्यामुळे के. पलानीस्वामी यांना आमदारांच्या संख्येची जुळवाजुळव करण्यात अडचणी आल्या असत्या. न्यायालयानं 23 जानेवारीलाच या प्रकरणावर निर्णय राखून ठेवला होता.तामिळनाडूत विधानसभेच्या 234 जागा आहेत. ज्यात एआयएडीएमकेजवळ 114 आणि डीएमकेजवळ 98 जागा आहेत. याशिवाय टीटीव्ही दिनाकरण स्वतः आमदार आहेत. त्यातील 18 आमदार असे आहेत की त्यांच्या नशिबाची चावी ही मद्रास उच्च न्यायालयाजवळ आहे. 18 सप्टेंबर 2017मध्ये तामिळनाडू विधानसभेचे अध्यक्ष पी. धनपाल यांनी 18 एआयएडीएमकेच्या आमदारांची सदस्यता रद्द केली होती. एआयएडीएमकेच्या आमदारांनी राज्यपाल यांना भेटून पलानीस्वामी सरकारविरोधात अविश्वासाचा ठराव मांडला होता. या पक्षाच्या प्रमुख एस. राजेंद्रनने अध्यक्षांविरोधात तक्रार केली आहे.