शहरं
Join us  
Trending Stories
1
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
2
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
3
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
4
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
5
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
6
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
7
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
8
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
9
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
10
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
11
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
12
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
13
सहाव्या वर्षी वडिलांना एक चाल सांगितली अन्...; कोनेरू हम्पीची खास आठवण
14
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
15
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
16
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
17
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
18
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
19
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
20
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप

कर्नाटकात भाजप प्रदेशाध्यक्षपदावरून नाराजी, येडियुराप्पा यांच्या विरोधी गटात अस्वस्थता

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2023 13:41 IST

प्रकाश बेळगोजी बेळगाव : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री येडियुराप्पा यांचे पुत्र बी. वाय. ...

प्रकाश बेळगोजीबेळगाव : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री येडियुराप्पा यांचे पुत्र बी. वाय. विजयेंद्र यांची प्रदेशाध्यक्ष तर आर. अशोक यांची विरोधी पक्षनेतेपदी केलेली निवड अनेक भाजप नेत्यांना रुचलेली नाही.विजापूरचे आमदार असलेले बसनगौडा पाटील-यत्नाळ, गोकाकचे आमदार रमेश जारकीहोळी, अरविंद बेल्लद यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेत्यांनी या दोघांना बढती दिल्याबद्दल खुलेआम नाराजी व्यक्त केली आहे. भाजपचे वरिष्ठ नेते बी. एल. संतोष व रा. स्व. संघाला मानणाऱ्या सर्व आमदारांसाठी हा निर्णय आश्चर्यकारक होता. लिंगायतांवर मजबूत पकड असलेल्या आणि येडीयुराप्पा मुख्यमंत्री असेपर्यंत गेल्या अनेक विधानसभा निवडणुकांमध्ये ठामपणे त्यांच्या मागे उभ्या राहिलेल्या उत्तर कर्नाटकातील अनेक नेत्यांनी अशोक आणि विजयेंद्र यांच्या निवडीला विरोध दर्शवला आहे.यासंदर्भात पंचमसाली मठाचे प.पू. जयमृत्युंजय स्वामीजी यांनी राज्यातील पक्षाची दोन्ही उच्च पदे बंगळुरू आणि शिमोगा येथील नेत्यांना घेऊन भाजपने उत्तर कर्नाटकातील नेत्यांवर अन्याय केला आहे, असे म्हटले आहे. बसनगौडा पाटील यांच्यासारख्या नेत्याकडे दुर्लक्ष केल्याबद्दल भाजपवर जोरदार टीका करताना स्वामीजींनी त्या दोन पदांपैकी एक पद तरी उत्तर कर्नाटकाला द्यावयास हवे होते, असे मत व्यक्त केले आहे.गोकाकचे आमदार रमेश जारकीहोळी यांनी गेल्या शुक्रवारी झालेल्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीवर बहिष्कार टाकला होता. त्यांनी पक्ष निरीक्षकांची भेट घेऊन बी. एस. येडीयुराप्पा मी एक वेळ स्वीकारले असते मात्र त्यांच्या पुत्राला नाही, असे सांगितले. तसेच माझ्यापेक्षा लहान असलेल्या विजयेंद्र यांच्या हाताखाली मी कसे काम करणार? त्या पदासाठी पक्षाने ज्येष्ठ नेत्यांचा विचार करावयास हवा होता, असेही स्पष्ट केले.भारतीय जनता पक्ष एका घराण्याचा पक्ष झाला आहे, हे पक्षातील हिंदू कार्यकर्ते कदापि खपवून घेणार नाहीत, असे परखड मत फायरब्रँड नेते म्हणून ओळखले जाणारे बसनगौडा पाटील-यत्नाळ यांनी विधिमंडळ पक्षाची बैठकीतून बाहेर पडल्यानंतर व्यक्त केले. उत्तर कर्नाटकातील लोक नेहमीच भाजपला संपूर्ण पाठिंबा देऊन मतदान करत असतात. मात्र पक्षातील चांगली पदे मात्र नेहमीच दक्षिण कर्नाटकातील नेत्यांना दिली जातात, असे दोन्ही पदांसाठी इच्छुक असलेले यत्नाळ म्हणाले.अशोक आणि विजयेंद्र यांच्या निवडीच्या माध्यमातून येडीयुराप्पा गट पक्षाची सूत्रे आपल्या हातात घेत आहे. असे भाजपमधील अनेक आमदारांना वाटते. गेल्या विधानसभा निवडणुकीत बी. एल. संतोष यांच्या नेतृत्वाखाली दारुण पराभव पत्करावा लागल्यामुळे भाजपसमोर येडीयुराप्पा यांच्यासमोर नमते घेण्याशिवाय दुसरा कोणता पर्याय उरला नसल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

टॅग्स :Karnatakकर्नाटकPoliticsराजकारणBJPभाजपा