शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
3
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
4
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
5
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
6
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
7
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
8
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
9
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
10
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
11
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
12
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
13
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
14
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
15
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
16
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
17
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
18
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
19
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
20
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत

सुरक्षा दलांतील चर्चा; पाकचे शिष्टमंडळ भारतात

By admin | Updated: September 10, 2015 03:29 IST

भारत आणि पाकिस्तानच्या सीमा सुरक्षा दलांदरम्यान महासंचालक स्तरावरील चर्चा गुरुवारपासून नवी दिल्लीत सुरू होत असून यावेळी भारतातर्फे सीमेवर वारंवार होणारे शस्त्रसंधी

नवी दिल्ली/ अमृतसर : भारत आणि पाकिस्तानच्या सीमा सुरक्षा दलांदरम्यान महासंचालक स्तरावरील चर्चा गुरुवारपासून नवी दिल्लीत सुरू होत असून यावेळी भारतातर्फे सीमेवर वारंवार होणारे शस्त्रसंधी उल्लंघन आणि घुसखोरीसारखे महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केले जातील. अलीकडेच उभय देशांदरम्यान राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) स्तरावरील चर्चा रद्द झाली असताना ही बैठक होत आहे. दोन्ही देशांमधील वाढत्या तणावातच बैठकीत सहभागी होण्यासाठी पाकिस्तानचे एक १६ सदस्यीय शिष्टमंडळ बुधवारी येथे डेरेदाखल झाले. पाकिस्तानी प्रतिनिधी मंडळाचे नेतृत्व रेंजर्सचे महासंचालक (पंजाब) मेजर जनरल उमर फारुक बुर्की करीत असून अमृतसरजवळील अटारी वाघा सीमेवर पंजाब फ्रंटियरच्या सीमा सुरक्षा दलाच्या वरिष्ठ कमांडरने त्यांचे स्वागत केले. यापूर्वी डिसेंबर २०१३ मध्ये लाहोरला महासंचालक स्तरावरील बैठक झाली होती. दीड वर्षाच्या खंडानंतर ही बोलणी होत आहेत. पाकिस्तानी शिष्टमंडळात सिंध रेंजर्सच्या अधिकाऱ्यांशिवाय तेथील गृहमंत्रालय, सर्व्हे आॅफ पाकिस्तान, अमली पदार्थविरोधी दल आणि स्थलांतरण विभागातील अधिकाऱ्यांचा समावेश आहे, तर २३ सदस्यीय भारतीय दलाचे नेतृत्व सीमा सुरक्षा दलाचे (बीएसएफ) महासंचालक डी.के. पाठक करीत आहेत. पाकिस्तानी उच्चायोगातील सूत्रानुसार भारत आणि पाकिस्तानदरम्यान संयुक्त राष्ट्र सैन्य निरीक्षक गट सक्रिय बनविण्यावर पाककडून जोर दिला जाईल. संयुक्त राष्ट्र गटाची प्रासंगिकता आता राहिली नसल्याचे भारताचे म्हणणे आहे.दोन्ही देशांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार, सीमेवर गस्त घालणाऱ्या दोन्ही देशांच्या सुरक्षा दलांचे महासंचालक व दोन्ही देशांच्या लष्करांचे ‘मिलिटरी आॅपरेशन्स’चे महासंचालक या विषयावर मोदी व नवाज शरीफ चर्चेवर एकमत झाले होते. (लोकमत न्यूज नेटवर्क)भारताचे चर्चेतील अपेक्षित मुद्देजम्मू-काश्मीर सीमेवर होणारे शस्त्रसंधीचे उल्लंघन. आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकिस्तानी सैनिकांकडून कुठल्याही चिथावणीशिवाय होणाऱ्या गोळीबारात निष्पाप नागरिक आणि जवानांचे मृत्यू होत आहेत.बीएसएफच्या वतीने श्वेत झेंड्याला दुसऱ्या बाजूने प्रतिसाद मिळत नसल्याचाही मुद्दा उपस्थित केला जाईल. गोळीबार थांबविण्याचे संकेत या श्वेत झेंड्याने दिले जातात.विविध स्तरावरील संवाद, परस्पर समन्वयाने गस्त आणि विश्वासार्हता वाढविणारे इतर विषय.गुजरातमधील कच्छच्या रणालगतच्या हरामी नाल्यात होणारी घुसखोरी, सीमेपलीकडून अमली पदार्थांची तस्करी, आंतरराष्ट्रीय सीमेवर झीरो लाईन क्षेत्रात संशयास्पद बेकायदेशीर हालचालीपाककडून शस्त्रसंधीचे उल्लंघन; २ जवान जखमीश्रीनगर: जम्मू-काश्मीरच्या कूपवाडा आणि पूंछ जिल्ह्यात नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी सैनिकांनी शस्त्रसंधीचे उल्लंघन करून केलेल्या गोळीबारात सीमा सुरक्षा दलाचे दोन जवान जखमी झाले. मंगळवारी रात्री पूंछमध्येही पाकने आगळीक केली. त्याला भारतीय जवानांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले.भारतीय अधिकाऱ्यांच्या घरगुती वापराच्या वस्तू अडविल्यानवी दिल्ली : इस्लामाबाद येथील भारतीय उच्चायुक्तालयातील चार मुत्सद्दी अधिकाऱ्यांसाठी भारतातून पाठविण्यात आलेली घरगुती वापराच्या वस्तूंची पार्सले पाकिस्तानने महिनाभरापासून वाघा सीमेवर अडवून ठेवली आहेत. भारतातर्फे पाकिस्तानी परराष्ट्र कार्यालयाला वेळोवेळी सूचना देण्यात आल्यानंतरही रेंजर्सनी हे सामान संबंधित अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचते केले नाही. भारत-पाक महासंचालक स्तरावरील बैठकीत हा मुद्दा उपस्थित केला जाणार आहे.