शहरं
Join us  
Trending Stories
1
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
2
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
3
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
4
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
5
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
6
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
7
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
8
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
9
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
10
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
11
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
12
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
13
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
14
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
15
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
16
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
17
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
18
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
19
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
20
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!

चर्चा, वादविवाद हा लोकशाहीचा आत्मा

By admin | Updated: November 27, 2015 00:36 IST

संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला गुरुवारी प्रारंभ होताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व मुद्यांवर चर्चेची तयारी असल्याचे स्पष्ट केले आहे.

नवी दिल्ली : संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला गुरुवारी प्रारंभ होताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व मुद्यांवर चर्चेची तयारी असल्याचे स्पष्ट केले आहे. चर्चा, वादविवाद हा संसदेचा आत्मा आहे. चर्चेसाठी संसदेखेरीज दुसरे अन्य मोठे व्यासपीठ असूच शकत नाही, असे सांगतानाच त्यांनी या अधिवेशनात चांगले विचार, चांगली चर्चा आणि नव्या कल्पना समोर येतील असा विश्वास व्यक्त केला.संसदेत चर्चा, वादविवादासह अन्य बाबीही असतात. देशाचे ते कार्यक्षेत्र ठरते, असे त्यांनी महिनाभर चालणाऱ्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी पत्रकारांशी संवाद साधताना म्हटले. संसदेचे कामकाज सुरळीत चालावे यासाठी बुधवारी सर्वपक्षीय बैठकीत चर्चा झाली आहे. चर्चेसाठी सर्व पक्षांनी सकारात्मकता दाखविल्यामुळे मी आनंदी आहे. संसदेकडून देशाची अपेक्षा असून जनतेच्या कसोटीला उतरण्यासाठी खासदार कोणतीही कसर सोडणार नाहीत, अशी मला आशा आहे. विरोधकांना असहिष्णुतेच्या मुद्यावर चर्चा हवी आहे. आमची सर्व मुद्यांवर चर्चेची तयारी आहे, असे ते म्हणाले. (लोकमत न्यूज नेटवर्क)भारतीय संविधानाबद्दल देशभरात जागरूकता निर्माण करण्याची गरज आहे. विद्यार्र्थ्यांनी भारताच्या राज्यघटनेची प्रस्तावना वाचायला हवी. हळूहळू संविधान हे जनतेच्या दैनंदिन जीवनाचा भाग बनावे. त्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत, असे मोदी म्हणाले. घटनेचा मसुदा लिहिण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे १२५ वे जयंती वर्षही साजरे होण्याचा योगायोग साधला जाणे प्रेरणादायी आणि सुदैवाची बाब आहे. >> डॉ. आंबेडकरांना अभिवादननवी दिल्ली : देशाच्या राज्यघटनेने दिलेल्या संकल्पना आणि मूल्ये जपत घटनाकारांना अभिमान वाटेल अशा भारताची निर्मिती करू या, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टिष्ट्वटरवरून देशवासीयांना दिले. देशात पहिला घटनादिन साजरा होण्याच्या ऐतिहासिक प्रसंगामुळे आपल्याला राज्यघटनेबद्दल खूप काही जाणून घेण्याची प्रेरणा मिळेल. देशाला घटना देण्यासाठी ज्यांनी अथकपणे कार्य केले त्यांना आदरांजली अर्पण करण्याचा हा दिवस आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुख्य योगदानाचे स्मरण केल्याखेरीज आपल्या राज्यघटनेचा उल्लेख पूर्णत्वास जाणार नाही. मी त्यांना अभिवादन करतो, असेही मोदींनी नमूद केले. (लोकमत न्यूज नेटवर्क)