शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

चर्चा, वादविवाद हा लोकशाहीचा आत्मा

By admin | Updated: November 27, 2015 00:36 IST

संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला गुरुवारी प्रारंभ होताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व मुद्यांवर चर्चेची तयारी असल्याचे स्पष्ट केले आहे.

नवी दिल्ली : संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला गुरुवारी प्रारंभ होताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व मुद्यांवर चर्चेची तयारी असल्याचे स्पष्ट केले आहे. चर्चा, वादविवाद हा संसदेचा आत्मा आहे. चर्चेसाठी संसदेखेरीज दुसरे अन्य मोठे व्यासपीठ असूच शकत नाही, असे सांगतानाच त्यांनी या अधिवेशनात चांगले विचार, चांगली चर्चा आणि नव्या कल्पना समोर येतील असा विश्वास व्यक्त केला.संसदेत चर्चा, वादविवादासह अन्य बाबीही असतात. देशाचे ते कार्यक्षेत्र ठरते, असे त्यांनी महिनाभर चालणाऱ्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी पत्रकारांशी संवाद साधताना म्हटले. संसदेचे कामकाज सुरळीत चालावे यासाठी बुधवारी सर्वपक्षीय बैठकीत चर्चा झाली आहे. चर्चेसाठी सर्व पक्षांनी सकारात्मकता दाखविल्यामुळे मी आनंदी आहे. संसदेकडून देशाची अपेक्षा असून जनतेच्या कसोटीला उतरण्यासाठी खासदार कोणतीही कसर सोडणार नाहीत, अशी मला आशा आहे. विरोधकांना असहिष्णुतेच्या मुद्यावर चर्चा हवी आहे. आमची सर्व मुद्यांवर चर्चेची तयारी आहे, असे ते म्हणाले. (लोकमत न्यूज नेटवर्क)भारतीय संविधानाबद्दल देशभरात जागरूकता निर्माण करण्याची गरज आहे. विद्यार्र्थ्यांनी भारताच्या राज्यघटनेची प्रस्तावना वाचायला हवी. हळूहळू संविधान हे जनतेच्या दैनंदिन जीवनाचा भाग बनावे. त्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत, असे मोदी म्हणाले. घटनेचा मसुदा लिहिण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे १२५ वे जयंती वर्षही साजरे होण्याचा योगायोग साधला जाणे प्रेरणादायी आणि सुदैवाची बाब आहे. >> डॉ. आंबेडकरांना अभिवादननवी दिल्ली : देशाच्या राज्यघटनेने दिलेल्या संकल्पना आणि मूल्ये जपत घटनाकारांना अभिमान वाटेल अशा भारताची निर्मिती करू या, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टिष्ट्वटरवरून देशवासीयांना दिले. देशात पहिला घटनादिन साजरा होण्याच्या ऐतिहासिक प्रसंगामुळे आपल्याला राज्यघटनेबद्दल खूप काही जाणून घेण्याची प्रेरणा मिळेल. देशाला घटना देण्यासाठी ज्यांनी अथकपणे कार्य केले त्यांना आदरांजली अर्पण करण्याचा हा दिवस आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुख्य योगदानाचे स्मरण केल्याखेरीज आपल्या राज्यघटनेचा उल्लेख पूर्णत्वास जाणार नाही. मी त्यांना अभिवादन करतो, असेही मोदींनी नमूद केले. (लोकमत न्यूज नेटवर्क)