शहरं
Join us  
Trending Stories
1
"माणिकराव कोकाटे यांचा 'तो' व्हिडीओ AIच्या मदतीनं, मी स्वतः..."; भाजप आमदाराचा दावा
2
प्रवेश करताच लिफ्ट बंद, प्रवीण दरेकरांसह १७ जण अडकले, १० मिनिटं चालला थरार, अखेर दरवाजा तोडून केली सुटका
3
जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये चकमक, जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी लपल्याचा संशय
4
इंडोनेशियात प्रवासी बोटीला भीषण आग; प्रवाशांनी समुद्रात मारल्या उड्या...
5
उज्ज्वल निकम यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार? भाजपा नेते म्हणतात, “काही अशक्य नाही”
6
हिमाचलमधील एका तरुणीनं दोन भावांसोबत का केलं लग्न? जाणून घ्या काय आहे ही 'जोडीदार प्रथा'?
7
"मी रमी खेळतच नव्हतो...!" व्हायरल व्हिडीओवर कोकाटेंचं स्पष्टिकरण, पण स्वतःच मांडल्या दोन थेअरी; एकदा म्हणाले जाहिरात, एकदा म्हणाले...!
8
भारतातील हे पर्यटन स्थळ बनतंय बँकॉक, वेश्या व्यवसायासाठी अल्पवयीन मुलींना आणलं जातंय, भाजपाच्या महिला नेत्याचा आरोप
9
Madha Crime: चेहरा छिन्नविच्छिन्न, रस्त्यावर रक्ताचे डाग! यात्रेत गेलेल्या १० वर्षांच्या कार्तिकचा कालव्यात सापडला कुजलेला मृतदेह
10
विकृतीचा कळस! लंडनमधील इस्कॉनच्या रेस्टोरंटमध्ये घुसून मुद्दाम खाल्लं चिकन; घाणेरडं कृत्य पाहून लोक संतापले
11
मराठमोळी मृणाल ठाकूर घटस्फोटीत अभिनेत्याच्या प्रेमात? "सीतारामम" चित्रपटात एकत्र केलंं काम
12
चातुर्मासातील पहिली कामिका एकादशी: श्रीविष्णूंचे ‘या’ स्वरुपात करा पूजन; पाहा, सोपा व्रतविधी
13
“शिवसेना-ठाकरे ब्रँड तुमचे राहिलेले नाही, काँग्रेस बरोबर गेलात तेव्हाच संपला”; भाजपाची टीका
14
कुत्रा चावलाच नाही, तरीही अख्ख्या गावाने घेतले रेबीजचे इंजेक्शन, छत्रपती संभाजीनगरमधील प्रकार
15
DCM एकनाथ शिंदेंचे नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिणार; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची घोषणा
16
MRI मशीनने व्यक्तीला एका झटक्यात गिळले, तडफडून मृत्यू, एक छोटीशी चूक ठरली जीवघेणी  
17
“CM फडणवीसांना टोमणा नाही, मित्र म्हणून सल्ला देतो की...”; नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
18
राज ठाकरे-निशिकांत दुबे वादावर स्वामी अविमुक्तेश्वरानंदांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
19
विरोधकांच्या मागणीला यश; पावसाळी अधिवेशनात 'ऑपरेशन सिंदूर'वर चर्चेस सरकार तयार
20
Beed: प्रेयसीने घरी बोलावलं, तो गेला अन् नातेवाईकांनी पकडले; तीन दिवसांतच तरुणाचा घेतला जीव

संसदेत चर्चा करा, गोंधळ नको - राष्ट्रपती

By admin | Updated: February 23, 2016 14:13 IST

संसदेमध्ये लोकशाही मार्गाने चर्चा करा, पण गोंधळ घालून संसदेचे कामकाज रोखू नका असा सल्ला राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी दिला.

ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. २३ - संसदेमध्ये लोकशाही मार्गाने चर्चा करा, पण गोंधळ घालून संसदेचे कामकाज रोखू नका असा सल्ला राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी दिला.राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या अभिभाषणाने मंगळवारी संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली. 
संसदेमध्ये राष्ट्रपतींनी दोन्ही सभागृहातील सदस्यांच्या संयुक्त सत्राला संबोधित केले. राष्ट्रपतींनी सर्व खासदारांना परस्परांना सहकार्य करुन आपआपली जबाबदारी पार पाडण्याचे आवाहन केले. संसदेचे कामकाज सुरळीत चालू रहाण्यासाठी सरकारही प्रयत्नशील राहील असे त्यांनी सांगितले. 
या अधिवेशनात सरकार राज्यसभेत प्रलंबित असलेली१२ आणि लोकसभेत प्रलंबित असलेले एक विधेयक मंजूर करण्याचा प्रयत्न करेल. उच्च शिक्षण संस्था, जेएनयू आणि हैदराबाद विद्यापीठ यावर उद्या चर्चा होणार आहे. 
राष्ट्रपतीं आपल्या भाषणात सरकारकडून नागरीकांच्या हितासाठी राबवण्यात येत असलेल्या विविध योजना आणि सरकारच्या यशस्वी कार्याची माहिती दिली. संसदेचे अधिवेशन दोन टप्प्यात होणार आहे. अधिवेशनाचा पहिला टप्पा १६ मार्च रोजी संपेल. दुसरा टप्पा २५ एप्रिलपासून सुरु होईल. रेल्वे अर्थसंकल्प आणि केंद्रीय अर्थसंकल्प पहिल्या टप्प्यात मांडण्यात येईल. 
 
राष्ट्रपतींच्या अभिभाषणातील मुद्दे 
 
नमामी गंगा कार्यक्रमातंर्गत केंद्र सरकार ११८ शहरात विविध प्रकल्प राबवत आहे. 
 
वेतनाचे व्यवस्थित वाटप व्हावे आणि संपत्ती निर्मिती करण्यासाठी मनरेगा योजनेमध्ये बदल करण्यात आले. 
 
स्किल इंडिया योजनेत ७६ लाख नागरीकांना प्रशिक्षण.
 
उद्योग-व्यवसाय अनुकूल करणा-या देशांसंदर्भात जागतिक बँकेची जी ताजी आकडेवारी आहे, त्यामध्ये भारताच्या क्रमवारीत १२ स्थानांची सुधारणा झाली आहे. 
 
मेक इन इंडियामुळे ३९ टक्के परदेशी गुंतवणूक वाढली.
 
ग्रामीण विकासाला आमचे पहिले प्राधान्य आहे.
 
नई मंझील योजनेतंर्गत मदरशातील २० हजार मुले कौशल्यआधारीत प्रशिक्षण घेत आहेत.
 
सरकारने अलीकडेच शेतक-यांच्या हितासाठी पीक विमा योजना सुरु केली. 
 
जन धन योजना ही जगातील यशस्वी आर्थिक समावेशक योजना आहे. 
 
देशाच्या समृद्धीसाठी शेतकरी सुखात असणे आवश्यक. 
 
नवीन बँक खाती उघडल्यामुळे गरीबी कमी होण्याची अपेक्षा आहे, ४.४५ लाख घरे बांधण्यासाठी २४,६०० कोटींचा फंड. 
 
देशातील तब्बल ६२ लाख नागरिकांनी गॅस सबसिडी सोडली. 
 
माझ्या सरकारने तीन नव्या सामाजिक सुरक्षा आणि पेन्शन योजना आणल्या.
 
२०२२ पर्यंत सर्वांना घर देण्याच्या आपले आश्वासन पूर्ण करण्यावर सरकार कटिबद्ध आहे.
 
आमच्या सरकारचा उद्देश सबका साथ, सबका विकास आहे, गरीबातील गरीब व्यक्तीपर्यंत विकास पोहोचवण्याचा आमचा उद्देश आहे.
 
गरीबांचे, शेतक-यांचे कल्याण आणि युवकांना रोजगार देण्यावर माझ्या सरकारने लक्ष केंद्रीत केले आहे.