शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

संसदेत चर्चा करा, गोंधळ नको - राष्ट्रपती

By admin | Updated: February 23, 2016 14:13 IST

संसदेमध्ये लोकशाही मार्गाने चर्चा करा, पण गोंधळ घालून संसदेचे कामकाज रोखू नका असा सल्ला राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी दिला.

ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. २३ - संसदेमध्ये लोकशाही मार्गाने चर्चा करा, पण गोंधळ घालून संसदेचे कामकाज रोखू नका असा सल्ला राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी दिला.राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या अभिभाषणाने मंगळवारी संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली. 
संसदेमध्ये राष्ट्रपतींनी दोन्ही सभागृहातील सदस्यांच्या संयुक्त सत्राला संबोधित केले. राष्ट्रपतींनी सर्व खासदारांना परस्परांना सहकार्य करुन आपआपली जबाबदारी पार पाडण्याचे आवाहन केले. संसदेचे कामकाज सुरळीत चालू रहाण्यासाठी सरकारही प्रयत्नशील राहील असे त्यांनी सांगितले. 
या अधिवेशनात सरकार राज्यसभेत प्रलंबित असलेली१२ आणि लोकसभेत प्रलंबित असलेले एक विधेयक मंजूर करण्याचा प्रयत्न करेल. उच्च शिक्षण संस्था, जेएनयू आणि हैदराबाद विद्यापीठ यावर उद्या चर्चा होणार आहे. 
राष्ट्रपतीं आपल्या भाषणात सरकारकडून नागरीकांच्या हितासाठी राबवण्यात येत असलेल्या विविध योजना आणि सरकारच्या यशस्वी कार्याची माहिती दिली. संसदेचे अधिवेशन दोन टप्प्यात होणार आहे. अधिवेशनाचा पहिला टप्पा १६ मार्च रोजी संपेल. दुसरा टप्पा २५ एप्रिलपासून सुरु होईल. रेल्वे अर्थसंकल्प आणि केंद्रीय अर्थसंकल्प पहिल्या टप्प्यात मांडण्यात येईल. 
 
राष्ट्रपतींच्या अभिभाषणातील मुद्दे 
 
नमामी गंगा कार्यक्रमातंर्गत केंद्र सरकार ११८ शहरात विविध प्रकल्प राबवत आहे. 
 
वेतनाचे व्यवस्थित वाटप व्हावे आणि संपत्ती निर्मिती करण्यासाठी मनरेगा योजनेमध्ये बदल करण्यात आले. 
 
स्किल इंडिया योजनेत ७६ लाख नागरीकांना प्रशिक्षण.
 
उद्योग-व्यवसाय अनुकूल करणा-या देशांसंदर्भात जागतिक बँकेची जी ताजी आकडेवारी आहे, त्यामध्ये भारताच्या क्रमवारीत १२ स्थानांची सुधारणा झाली आहे. 
 
मेक इन इंडियामुळे ३९ टक्के परदेशी गुंतवणूक वाढली.
 
ग्रामीण विकासाला आमचे पहिले प्राधान्य आहे.
 
नई मंझील योजनेतंर्गत मदरशातील २० हजार मुले कौशल्यआधारीत प्रशिक्षण घेत आहेत.
 
सरकारने अलीकडेच शेतक-यांच्या हितासाठी पीक विमा योजना सुरु केली. 
 
जन धन योजना ही जगातील यशस्वी आर्थिक समावेशक योजना आहे. 
 
देशाच्या समृद्धीसाठी शेतकरी सुखात असणे आवश्यक. 
 
नवीन बँक खाती उघडल्यामुळे गरीबी कमी होण्याची अपेक्षा आहे, ४.४५ लाख घरे बांधण्यासाठी २४,६०० कोटींचा फंड. 
 
देशातील तब्बल ६२ लाख नागरिकांनी गॅस सबसिडी सोडली. 
 
माझ्या सरकारने तीन नव्या सामाजिक सुरक्षा आणि पेन्शन योजना आणल्या.
 
२०२२ पर्यंत सर्वांना घर देण्याच्या आपले आश्वासन पूर्ण करण्यावर सरकार कटिबद्ध आहे.
 
आमच्या सरकारचा उद्देश सबका साथ, सबका विकास आहे, गरीबातील गरीब व्यक्तीपर्यंत विकास पोहोचवण्याचा आमचा उद्देश आहे.
 
गरीबांचे, शेतक-यांचे कल्याण आणि युवकांना रोजगार देण्यावर माझ्या सरकारने लक्ष केंद्रीत केले आहे.