शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या दिशेने एकजरी टॉमहॉक मिसाईल आले...; दोन तेल कंपन्यांवर निर्बंध लादल्यावर पुतीन भडकले
2
भयानक, लक्झरी बसवर दुचाकी आदळली; २० प्रवाशांचा होरपळून मृत्यू, दिवाळी साजरी करून परतत होते
3
'ऑपरेशन सिंदूर'चा व्हिडीओ दाखवून पाकिस्तान करतंय महिलांचा ब्रेनवॉश! दहशतवाद्यांचा भरतोय वर्ग
4
पैसे दुप्पट करणारी जबरदस्त स्कीम; सरकारची मिळते गॅरेंटी, 'इतक्या' महिन्यांत डबल होईल रक्कम
5
भूसंपादनाअभावी ‘समृद्धी’ विस्तार निविदा रद्द, ‘शक्तिपीठ’च्या आराखड्यात बदल शक्य: CM फडणवीस
6
ओला-उबरचा बाजार उठणार...! महाराष्ट्रासह 'या' राज्यांत सरकारी 'भारत टॅक्सी' येणार, १०० टक्के भाडे...
7
कुर्ला, सांगली ते दुबई...मुंबई पोलिसांची धडाकेबाज कारवाई, D-गँगच्या ड्रग्स मास्टरमाइंडला UAE तून खेचून आणले
8
नियतीचा क्रूर खेळ! ६ बहिणींच्या कुटुंबात एकुलता एक मुलगा, भाऊबीजच्या दिवशीच झाला मृत्यू; ऐकून डोळ्यांत पाणी येईल
9
आजचे राशीभविष्य २४ ऑक्टोबर २०२५ : आर्थिक लाभ, खोळंबलेली कामे...
10
भारताची युद्धक्षमता वाढणार, ७९ हजार कोटींची शस्त्रखरेदी; प्रगत नाग क्षेपणास्त्राचा समावेश
11
२२३ एकर भूखंड सोलर डिफेन्स अँड एरोस्पेसला; औद्योगिक भविष्यास नवे पंख देणारी गुंतवणूक 
12
पीडीपी, काँग्रेसचा नॅशनल कॉन्फरन्सला पाठिंबा; राज्यसभेच्या ४ जागांसाठी नवे राजकीय समीकरण
13
भाऊबीजनिमित्ताने राज-उद्धव पुन्हा आले एकत्र; आता युतीच्या घोषणेची उत्सुकता
14
इंडिया आघाडीचे ठरले! तेजस्वी यादव बिहारच्या मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार; सर्व पक्षांचा पाठिंबा
15
बिहार निवडणूक २०२५: मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार नितीश कुमारच; ‘एनडीए’ने केले नाव जाहीर
16
अमेरिकेकडून रशियाची कोंडी; दोन ऑइल कंपन्यांवर निर्बंध, युक्रेन युद्ध थांबविण्यासाठी नीती
17
भारत रशियाकडून फक्त हे वर्षच तेलखरेदी करणार, मोदींचे मला आश्वासन; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
18
हिमालयातील पाण्यात १४ वर्षांत ९ टक्के वाढ; केंद्रीय जल आयोगाच्या अहवालातील निष्कर्ष
19
सत्ताधारी पक्षाचे आमदारही फेक नरेटिव्ह सेट करत आहेत का? काँग्रेस नेत्यांचा भाजपला सवाल
20
मुंबई ते नेवार्क एअर इंडिया विमानाचा यू टर्न; ३ तासांनी वैमानिकाला तांत्रिक बिघाडाचा संशय

जामिनावर विचार करताना विवेकबुद्धी वापरावी; सरन्यायाधीश चंद्रचूड यांचे मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2024 07:50 IST

प्रत्येक प्रकरणातील बारकावे पाहण्यासाठी सर्वसामान्य समज आणि विवेक वापरण्याची गरज आहे, असे प्रतिपादन सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी केले. 

बंगळुरू : महत्त्वाच्या फौजदारी खटल्यांमध्ये संशयाला वाव असताना कनिष्ठ न्यायालयाचे न्यायाधीश जामीन देऊन कोणताही धोका पत्करू इच्छित नाहीत. त्यामुळे ज्यांना कनिष्ठ न्यायालयात जामीन मिळायला हवा, ते सर्वोच्च न्यायालयात धाव घेतात. म्हणून प्रत्येक प्रकरणातील बारकावे पाहण्यासाठी सर्वसामान्य समज आणि विवेक वापरण्याची गरज आहे, असे प्रतिपादन सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी रविवारी केले. 

‘बर्कले सेंटर फॉर कॉम्पॅरेटिव्ह इक्वॅलिटी अँड अँटी-डिस्क्रिमिनेशन’च्या ११व्या वार्षिक परिषदेत ते बोलत होते. सरन्यायाधीश चंद्रचूड म्हणाले, “ज्या लोकांना कनिष्ठ न्यायालयांतून जामीन मिळायला हवा होता, त्यांना तेथे जामीन मिळत नाही, परिणामी त्यांना नेहमी उच्च न्यायालयांमध्ये जावे लागते. ज्या लोकांना उच्च न्यायालयांतून जामीन मिळायला पाहिजे, त्यांना न मिळाल्याने तेही सर्वोच्च न्यायालयात येतात. या विलंबामुळे अनियंत्रित पद्धतीने अटक झालेल्यांच्या समस्यांत आणखी भर पडते.”

‘दिलाशाकडे संशयाने पाहिले जाते’

याबाबत प्रश्न विचारणारी व्यक्ती म्हणाली, “आम्ही अशा समाजात राहतो, जिथे आधी कृत्य केले जाते आणि नंतर माफी मागितली जाते. हे विशेषतः सरकारी अधिकाऱ्यांच्या बाबतीत खरे आहे जे राजकीयदृष्ट्या प्रेरित आहेत आणि कार्यकर्त्यांसह, शिक्षणतज्ज्ञ, पत्रकार आणि विरोधी पक्षांच्या मुख्यमंत्र्यांसह नेत्यांना ताब्यात घेत आहेत. ही सर्व कृत्ये पूर्ण विश्वासाने केली जातात कारण न्याय मिळायला खूप उशीर होतो, असे त्यांचे म्हणणे असते. याला उत्तर देताना चंद्रचूड म्हणाले की, सर्वोच्च न्यायालय सातत्याने हे सांगण्याचा प्रयत्न करत आहे की, यामागचे एक कारण म्हणजे देशातील संस्थांबद्दल असलेला अविश्वास आहे. दुर्दैवाने आज समस्या अशी आहे की आम्ही कनिष्ठ न्यायालयांच्या न्यायाधीशांनी दिलेल्या कोणत्याही दिलाशाकडे संशयाने पाहतो.” 

टॅग्स :DY Chandrachudडी. वाय. चंद्रचूड