शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
2
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं
3
'गिरीश महाजन नावाचा सांड मोकाट सुटलाय; फडणवीसांना...', संजय राऊतांचे टीकास्त्र
4
Pune Rave Party: पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
5
Pranjal Khewalkar Pune Rave Party: तीन फ्लॅट बुक, तीन महिला गायब...! नुसती रेव्ह पार्टी होती की आणखी काही...; मोठी अपडेट समोर
6
"पु.ल. देशपांडेंनी मला बघून विचारलं...", आठ वर्षांच्या सचिन पिळगावकरांचा आणखी एक किस्सा
7
एकनाथ खडसेंचा जावई रेव्ह पार्टीत रंगेहाथ सापडला, तरी सुषमा अंधारे म्हणतात...
8
पुण्यातील रेव्ह पार्टीत सापडलेले खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर नेमका काय व्यवसाय करतात?
9
Girish Mahajan : रेव्ह पार्टीत रोहिणी खडसेंच्या पतीला अटक; गिरीश महाजन म्हणतात, "नाथाभाऊंनी जावईबापुंना..."
10
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
11
ट्रम्प यांचा युद्धविरामाचा दावा ठरला फोल; थायलंड आणि कंबोडियामधील तणाव चौथ्या दिवशीही कायम
12
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
13
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
14
"निलेश साबळे आणि भाऊ कदम हवे होते...", नवीन 'चला हवा येऊ द्या'च्या पहिल्या एपिसोडनंतर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया
15
"भयंकर परिणाम होतील...", ऊर्जामंत्री एके शर्मा संतापले; वीज अधिकाऱ्याचा ऑडिओ केला शेअर
16
सोने ₹३२,००० वरून थेट १ लाखांवर! गेल्या ६ वर्षात २००% वाढ, पुढील ५ वर्षात 'इतकं' महाग होणार!
17
रात्री १२ वाजता सलमान खानची पोस्ट, म्हणाला, "बाबांचं आधीच ऐकलं असतं तर..."
18
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
19
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
20
७ तासांपेक्षा कमी किंवा ९ तासांपेक्षा जास्त झोपता? लवकर मृत्यूचा धोका, रिसर्चमध्ये मोठा खुलासा

आश्वासने व भाषणांऐवजी लोकांना हवे प्रत्यक्ष काम

By admin | Updated: October 20, 2016 04:34 IST

सुलतानपूर जिल्ह्यात पाच लहानशा खेड्यांत चमकदार पिवळ्या रंगाने सजलेल्या छोट्या घरकुलांचे मालकी हक्क मंगळवारी भाजपचे तरुण खासदार वरुण गांधींनी २८ गरीब कुटुंबांच्या स्वाधीन केले

सुरेश भटेवरा,

सुलतानपूर- उत्तर प्रदेशच्या सुलतानपूर जिल्ह्यात पाच लहानशा खेड्यांत चमकदार पिवळ्या रंगाने सजलेल्या छोट्या घरकुलांचे मालकी हक्क मंगळवारी भाजपचे तरुण खासदार वरुण गांधींनी २८ गरीब कुटुंबांच्या स्वाधीन केले. ही घरे कोणत्याही सरकारी योजनेतून अथवा खासदार निधीतून तयार झालेली नसून, वरुण गांधींनी आपल्या खासदारकीच्या मासिक वेतनातून व स्वत:च्या कमाईतून बांधून दिली आहेत. अशी एकुण १00 घरे गरीबांना देण्याची मोहीम वरुण गांधीनी हाती घेतली असून, आणखी ७२ घरांचे बांधकाम सध्या सुरू आहे. या मोहिमेचे चळवळीत रूपांतर करण्याची तयारी खा. गांधींनी चालवली आहे. दिल्लीहून लोकमतच्या प्रस्तुत प्रतिनिधीसह निवडक पत्रकारांना मंगळवारी वरुण गांधींनी या कार्यक्रमाला नेते होते. बेला मोहन, सैतापूर सराय, पगडी सराय, मल्हिपूर, पदारथपूर गावांमधे या निमित्ताने सरासरी दोन हजार ग्रामस्थांच्या ५ छोटेखानी सभांत त्यांनी भाषणे केली. ते म्हणाले, ‘राजकीय पक्षाशी अथवा निवडणुकीच्या राजकारणाशी ही मोहीम संबंधित नाही. उत्तरप्रदेशच्या गरीब ग्रामस्थांची व कर्जग्रस्त शेतकऱ्यांची दैना दूर करण्यासाठी योजलेल्या एका सामाजिक चळवळीची ही छोटी सुरुवात आहे.लवकरच या मोहिमेची वेबसाईट व मोबाइल अ‍ॅप तयार करण्यात येईल. त्या डिजिटल व्यासपीठावर उत्तरप्रदेशच्या गरीब कुटुंबांना साऱ्या जगाशी जोडले जाईल. कोणत्याही सरकारी मदतीशिवाय राबवल्या जाणाऱ्या या मोहिमेद्वारे दोन वर्षांत गरीब कुटुंबांना १0 हजार घरे व १0 हजार शेतकऱ्यांना पूर्णत: कर्जमुक्त करण्याचा संकल्प आहे. स्वत:च्या मालकीचे पक्के घर गरीब कुटुंबांना मिळावे व कर्जग्रस्त शेतकऱ्यांवर आत्महत्येचा प्रसंग ओढवू नये हा या मोहिमेचा हेतू आहे. उत्तरप्रदेशात या मोहिमेला यश मिळाल्यास ही चळवळ देशव्यापी बनवण्याचा इरादा आहे, असेही त्यांनी बोलून दाखवले.>लोकवर्गणीतून शेतकऱ्यांची कर्जमुक्तीशेतीच्या न संपणाऱ्या समस्या आणि कर्जाचे ओझे यामुळे आत्महत्येसाठी प्रवृत्त झालेल्या अल्पभूधारक शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी वरूण यांनी उत्तरप्रदेशात दुसरी अभिनव चळवळही सुरू केली आहे. आपल्या खासदारकीचे गेल्या चार वर्षांचे १ कोटी ६0 लाखांचे संपूर्ण वेतन तर कर्जमुक्तीसाठी वरूणनी दिलेच; याखेरीज आग्रा, मेरठ, मुजफ्फरनगर, बिजनोर, बहराईच, लखीमपूर खिरी, प्रतापगड, अलिगड, सुलतानपूर, सीतापूर, मोरादाबाद अशा २0 जिल्ह्यांत फिरून गरीब शेतकऱ्यांच्या समस्यांविषयी धनिक वर्गामधे जागरूकता निर्माण करण्यातही यश मिळवले. कर्जमुक्तीच्या या अभिनव चळवळीत सधन समाज गटही उत्साहाने सहभागी झाला आहे. आजवर १७ कोटी ८0 लाख रूपयांचे योगदान स्वत:हून त्यांनी दिले. त्यातून ३२६0 शेतकरी कुटुंबे पूर्णत: कर्जमुक्त करण्याचे यश वरुण गांधींना मिळाले. कर्जमुक्तीची ही मोहिम राबवण्यापूर्वी वरूण गांधी व त्यांच्या स्थानिक कार्यक र्त्यांच्या टीमने प्रशासन व बँकांशी संपर्क साधला. शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीची सविस्तर माहिती मिळवली. दुष्काळ व नैसर्गिक आपत्तीमुळे सलग ३ वर्षे ज्यांची पिके नष्ट झाली, कर्जाचा बोजा वाढत गेला आणि शेतजमिनीखेरीज कोणतीही अचल संपत्ती ज्या शेतकऱ्यांकडे नाही, या तीन ३ प्रमुख निकषांनुसार गरजू कर्जग्रस्त शेतकऱ्यांची यादी तयार करण्यात आली. त्यानंतर स्थानिक वकील, व्यापारी, उद्योजक, सधन शेतकरी अशा विविध समाज घटकांच्या बैठका घेतल्या. त्यात या गरजवंत शेतकऱ्यांना कर्ज फेडण्यासाठी आर्थिक मदतीचे आवाहन करण्यात आले. या मोहिमेतून जवळपास १७ कोटी ८0 लाख रूपयांचा निधी उभा राहिला. तो गरजू शेतकऱ्यांना या दानशूरांच्या हस्ते लगेच वितरित करण्यात आला.