शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

दिल और दिमाग में गिरावट आ गई है, सुधरना चाहिए; ‘जवाहर’च्या हिंदी अनुवादाचे प्रकाशन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2023 08:36 IST

राजकारण-पत्रकारितेतल्या मान्यवरांची उपस्थिती

नवी दिल्ली : स्वातंत्र्यानंतर देशाची प्रगती झाली, विकासाचा रस्ता प्रशस्त होत गेला पण त्या भरात ‘जीवनमूल्यांचे ऱ्हासपर्व’ही देशाने अनुभवले. तीव्र राजकीय विरोधातही संस्कृती आणि सभ्यता जपणाऱ्या नेतृत्वाची पिढी अस्तंगत होत गेली, याबद्दल हृदयीची खंत व्यक्त करणाऱ्या ज्येष्ठांच्या उपस्थितीत ‘लोकमत’चे संस्थापक-संपादक, ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी जवाहरलाल दर्डा यांच्या ‘जवाहर’ या चरित्रग्रंथाच्या हिंदी आवृत्तीचे प्रकाशन दिल्लीत संपन्न झाले.

अनेक धर्म-परंपरांच्या, रंग-रूप-स्वभावाच्या माणसांना सुखाने एकत्र नांदवणाऱ्या या देशाला आपण धार्मिक आणि जातीय भेदभावाचे ‘रंग’ दिले आहेत; अशी सार्वत्रिक हळहळ व्यक्त करणाऱ्या सर्व प्रमुख वक्त्यांच्या भावनेला शब्दरूप देताना माजी केंद्रीय मंत्री गुलाम नबी आझाद म्हणाले, ‘दिल और दिमाग में गिरावट आ चुकी है, सुधरना चाहिए! ईश्वराने विविधतेचे रंग भरलेल्या या देशाचा व्यक्तिगत स्वार्थापोटी बेरंग होता कामा नये!’

जीवनात व्यक्ती किती दूर जाऊ शकते आणि काय साध्य करू शकते, याचे उदाहरण म्हणजे जवाहरलाल दर्डा होते. त्यांच्यासाठी आकाश ठेंगणे होते. ‘लोकमत’ देशात अव्वल क्रमांकाचा मीडिया समूह व्हावा, ही शुभेच्छा. - अधीर रंजन चौधरी

बाबूजींशी आपले १९७९ पासूनचे संबंध होते. त्यांच्या चेहऱ्यावर चिंता, दुःख किंवा अशांतीचे भाव नसायचे. त्यांची मुखमुद्रा वनवासाच्या वृत्तीने दुःखी किंवा राज्याभिषेकाने हर्षभरित न होणाऱ्या श्रीरामासारखी भासायची.- जनार्दन द्विवेदी

यवतमाळसारख्या जिल्ह्यातून सुरुवात करणारे बाबूजी जवाहरलाल दर्डा हे भारताचे रुपर्ट मरडॉक आहेत. त्यांनी आपल्या पत्रकारितेचा कधीच राजकीय स्वार्थासाठी उपयोग केला नाही.- विनोद तावडे

आपले अस्तित्व आणि विचारांप्रमाणेच इतरांचे अस्तित्व आणि विचार स्वीकारून त्यांचा सन्मान करणे बाबूजींनी आचरणात आणले होते. वैचारिक प्रदूषण दूर करण्यासाठी युवा पिढीने बाबूजींवरील चरित्रग्रंथ वाचावा.- आचार्य लोकेश मुनिजी

आजच्या जमान्यातील पत्रकारांनी हिमतीने आणि निष्पक्षतेने पत्रकारिता करावी आणि जवाहरलाल दर्डा यांना आपला आदर्श मानावा.    - आलोक मेहता

बाबूजी गरीब, दलित, वंचित, उपेक्षितांसह सर्व धर्माच्या लोकांशी मानवतेच्या नात्याने वागले. त्यांनी नामांतराला सक्रिय पाठिंबा दिला होता.     - रामदास आठवले

जवाहरलाल दर्डा यांचा राजकीय आणि पत्रकारितेचा प्रवास तसेच त्यांच्यावरील चरित्रग्रंथ अतिशय प्रेरणादायी आहे. - सत्यपाल सिंह बघेल

सत्तेत असो वा नसाे, सिद्धांत सोडला नाही याप्रसंगी गुलाम नबी आझाद यांनी बाबूजींसोबतच्या अनेक हृद्य आठवणी विशद केल्या. बाबूजींप्रमाणे धर्म आणि जातिभेद न मानणारी पिढी आता संपली आहे. विमानतळाहून त्यांच्या निवासस्थानी भोजनासाठी गेला नाही असा कोणताही नेता नसेल आणि त्यांनी आदर केला नाही, असा कोणता राजकीय पक्षही नसेल. काँग्रेस सत्तेत असो वा विरोधात, त्यांनी आपला सिद्धांत सोडला नाही, असे ते म्हणाले.

टॅग्स :Jawaharlal Dardaजवाहरलाल दर्डा