शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
2
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
3
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
4
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
5
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
6
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
7
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
8
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
9
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता
10
माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली...
11
Nag Panchami 2025: नागपंचमी का साजरी केली जाते, यामागील पौराणिक कथा वाचलीत का?
12
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
13
चीनचा भारताला मोठा 'धक्का'! 'रेअर अर्थ' बंदीमुळे 'या' ५ क्षेत्रांवर थेट परिणाम, SBI चा गंभीर इशारा!
14
"TCS मधील कपात तर सुरुवात आहे, अजून अनेक कंपन्यांमध्ये AI चा फटका बसणारे"
15
Jharkhand: झारखंडमध्ये भीषण अपघात, कावडियांची बस ट्रकवर आदळली; १९ जणांचा मृत्यू
16
२५ वर्षीय CA तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; 'हेलियम गॅस' शरीरात घेत आयुष्याचा शेवट केला, कारण...
17
Stock Market Today: सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात विक्रीचा सपाटा, Sensex २७१ अंकांनी घसरला; IT-मेटल स्टॉक्स कमकुवत
18
"सलमानने चाकू माझ्या गळ्यावर धरला आणि जोरात...", अशोक सराफ यांनी सांगितला भाईजानचा तो प्रसंग
19
भीषण! गाझामध्ये उपासमारीने १४७ लोकांचा मृत्यू, ४० हजार लहान मुलांचा जीव धोक्यात
20
FD-RD झाली जुनी, आता ‘या’ ५ स्कीम्सची चर्चा; वर्षभरात तगडा नफा हवा असेल तर ही डिटेल्स तपासा

दिल और दिमाग में गिरावट आ गई है, सुधरना चाहिए; ‘जवाहर’च्या हिंदी अनुवादाचे प्रकाशन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2023 08:36 IST

राजकारण-पत्रकारितेतल्या मान्यवरांची उपस्थिती

नवी दिल्ली : स्वातंत्र्यानंतर देशाची प्रगती झाली, विकासाचा रस्ता प्रशस्त होत गेला पण त्या भरात ‘जीवनमूल्यांचे ऱ्हासपर्व’ही देशाने अनुभवले. तीव्र राजकीय विरोधातही संस्कृती आणि सभ्यता जपणाऱ्या नेतृत्वाची पिढी अस्तंगत होत गेली, याबद्दल हृदयीची खंत व्यक्त करणाऱ्या ज्येष्ठांच्या उपस्थितीत ‘लोकमत’चे संस्थापक-संपादक, ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी जवाहरलाल दर्डा यांच्या ‘जवाहर’ या चरित्रग्रंथाच्या हिंदी आवृत्तीचे प्रकाशन दिल्लीत संपन्न झाले.

अनेक धर्म-परंपरांच्या, रंग-रूप-स्वभावाच्या माणसांना सुखाने एकत्र नांदवणाऱ्या या देशाला आपण धार्मिक आणि जातीय भेदभावाचे ‘रंग’ दिले आहेत; अशी सार्वत्रिक हळहळ व्यक्त करणाऱ्या सर्व प्रमुख वक्त्यांच्या भावनेला शब्दरूप देताना माजी केंद्रीय मंत्री गुलाम नबी आझाद म्हणाले, ‘दिल और दिमाग में गिरावट आ चुकी है, सुधरना चाहिए! ईश्वराने विविधतेचे रंग भरलेल्या या देशाचा व्यक्तिगत स्वार्थापोटी बेरंग होता कामा नये!’

जीवनात व्यक्ती किती दूर जाऊ शकते आणि काय साध्य करू शकते, याचे उदाहरण म्हणजे जवाहरलाल दर्डा होते. त्यांच्यासाठी आकाश ठेंगणे होते. ‘लोकमत’ देशात अव्वल क्रमांकाचा मीडिया समूह व्हावा, ही शुभेच्छा. - अधीर रंजन चौधरी

बाबूजींशी आपले १९७९ पासूनचे संबंध होते. त्यांच्या चेहऱ्यावर चिंता, दुःख किंवा अशांतीचे भाव नसायचे. त्यांची मुखमुद्रा वनवासाच्या वृत्तीने दुःखी किंवा राज्याभिषेकाने हर्षभरित न होणाऱ्या श्रीरामासारखी भासायची.- जनार्दन द्विवेदी

यवतमाळसारख्या जिल्ह्यातून सुरुवात करणारे बाबूजी जवाहरलाल दर्डा हे भारताचे रुपर्ट मरडॉक आहेत. त्यांनी आपल्या पत्रकारितेचा कधीच राजकीय स्वार्थासाठी उपयोग केला नाही.- विनोद तावडे

आपले अस्तित्व आणि विचारांप्रमाणेच इतरांचे अस्तित्व आणि विचार स्वीकारून त्यांचा सन्मान करणे बाबूजींनी आचरणात आणले होते. वैचारिक प्रदूषण दूर करण्यासाठी युवा पिढीने बाबूजींवरील चरित्रग्रंथ वाचावा.- आचार्य लोकेश मुनिजी

आजच्या जमान्यातील पत्रकारांनी हिमतीने आणि निष्पक्षतेने पत्रकारिता करावी आणि जवाहरलाल दर्डा यांना आपला आदर्श मानावा.    - आलोक मेहता

बाबूजी गरीब, दलित, वंचित, उपेक्षितांसह सर्व धर्माच्या लोकांशी मानवतेच्या नात्याने वागले. त्यांनी नामांतराला सक्रिय पाठिंबा दिला होता.     - रामदास आठवले

जवाहरलाल दर्डा यांचा राजकीय आणि पत्रकारितेचा प्रवास तसेच त्यांच्यावरील चरित्रग्रंथ अतिशय प्रेरणादायी आहे. - सत्यपाल सिंह बघेल

सत्तेत असो वा नसाे, सिद्धांत सोडला नाही याप्रसंगी गुलाम नबी आझाद यांनी बाबूजींसोबतच्या अनेक हृद्य आठवणी विशद केल्या. बाबूजींप्रमाणे धर्म आणि जातिभेद न मानणारी पिढी आता संपली आहे. विमानतळाहून त्यांच्या निवासस्थानी भोजनासाठी गेला नाही असा कोणताही नेता नसेल आणि त्यांनी आदर केला नाही, असा कोणता राजकीय पक्षही नसेल. काँग्रेस सत्तेत असो वा विरोधात, त्यांनी आपला सिद्धांत सोडला नाही, असे ते म्हणाले.

टॅग्स :Jawaharlal Dardaजवाहरलाल दर्डा