शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
2
निवडणूक आयोगाने आधारहीन म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, स्पष्टीकरणासह त्या दाव्यातील हवाच काढली
3
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
4
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
5
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
6
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
7
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी
8
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
9
सरकारी कर्मचारी-पेन्शनधारकांची दिवाळी होणार गोड! किती वाढणार पगार? मोठी अपडेट समोर
10
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
11
Pune Firing: दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
12
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
13
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस
14
सासऱ्याच्या मृत्यूनंतर सून ढसाढसा रडली, संशय येताच पोलखोल झाली; 'ते' सत्य लपवण्यासाठी...
15
महाराष्ट्रातील या मतदारसंघात झाली मतचोरी, हजारो मतदार वाढले, राहुल गांधींचा पुराव्यानिशी सनसनाटी आरोप 
16
सेफ्टीमध्ये 'TATA'च एक नंबर, सलग नवव्या गाडीला मिळालं 5 स्टार रेटिंग; कोणती आहे कार?
17
जगातील सर्वात महान कर्णधार कोण? किरॉन पोलार्डनं 'या' दिग्गजाचं घेतलं नाव!
18
VIDEO: पाकिस्तानी खेळाडूने अंपायरच्या डोक्याला मारला चेंडू, अक्रमने केली 'घाणेरडी' कमेंट
19
मंदीच्या खाईत जाणाऱ्या अमेरिकन अर्थव्यवस्थेला वाचवण्यासाठी फेडचा मोठा डाव! भारतावर होणार थेट परिणाम
20
'डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष, जगाचे सम्राट नाहीत, त्यांच्या चुकांची किंमत...'; ब्राझीलच्या राष्ट्रपतींनी सुनावले

दिग्विजय सिंह यांची पुलवामा हल्ल्यावरून मोदी सरकारवर घणाघाती टीका; म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2020 14:54 IST

मोदी-शाह यांचे देशात नाव झाले आहे. राष्ट्रवादाच्या नावावर लोकसभा निवडणूकही जिंकली आहे.  आता शहिदांची आठवण कशाला येईल असा सवाल करत 2024 मध्ये बघू अशी भूमिका भाजपची असल्याचा आरोप दिग्विजय सिंह यांनी केला आहे. 

नवी दिल्ली - काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी पुलवामा येथे भारतीय सैन्यावर झालेल्या अतिरेकी हल्ल्याचा मुद्दा उपस्थित केला आहे. 14 फेब्रुवारी रोजी या घटनेला एक वर्ष पूर्ण होणार आहे. 

एक वर्ष उलटूनही पुलवामा हल्ल्यातील शहीद जवानांच्या कुटुंबीयांना मदत मिळाली नसल्याकडे दिग्विजय सिंह यांनी लक्ष वेधले आहे. त्यांनी ट्विट करून मोदी सरकारवर टीका केली आहे. ते म्हणाले की, पुलवामा हल्ल्याला आता एक वर्ष उलटत आले आहे. शहिदांच्या पत्नी मदतीसाठी सरकारला याचना  करत आहे. आता तरी सरकारने त्यांचे ऐकायला हवं, असं दिग्विजय सिंह म्हणाले. 

दरम्यान मोदी-शाह यांचे देशात नाव झाले आहे. राष्ट्रवादाच्या नावावर लोकसभा निवडणूकही जिंकली आहे.  आता शहिदांची आठवण कशाला येईल असा सवाल करत 2024 मध्ये बघू अशी भूमिका भाजपची असल्याचा आरोप दिग्विजय सिंह यांनी केला आहे. 

यावेळी दिग्विजय सिंह यांनी मोदी भक्तांवर देखील निशाना साधला. या लोकांचे हिंदुत्व इतर धर्मियांविरोधात भावना भडकवून मतांचा राजकारण करणे हेच आहे. त्यामुळे पुलवामामधील शहीद जवानांच्या कुटुंबीयांविषयी देखील हे विचार करत नसल्याचं दिग्विजय सिंह म्हणाले.