शहरं
Join us  
Trending Stories
1
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
2
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
3
Nuwan Thushara, IPL 2024 MI vs KKR: 'पॉवर-प्ले'मध्ये कोलकाताची 'बॅटरी डाऊन'! तुषाराने घेतल्या ३ विकेट्स, हार्दिकनेही फोडला घाम
4
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
5
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
6
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
7
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
8
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
9
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
10
पातूरच्या घाटात भीषण अपघात; सहा जण ठार, चार गंभीर जखमी!
11
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
12
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
13
संजय चव्हाण, विजय करंजकरांचे बंड; शांतीगिरी महाराज नाशिकमधून अपक्ष लढणार
14
शरद पवार यांच्या ताफ्यातील दोन वाहने धडकली
15
देशातील कर प्रणालीवर राजीव बजाज यांची टीका, सरकारकडे केली 'ही' मागणी...
16
पाकिस्तान भारताची कॉपी करायला गेला, चीनच्या मदतीनं लॉन्च केलं 'मून मिशन'; झाला 'खेला'!
17
'आम्ही तेथे राहुल गांधींविरोधात जिंकू शकणार नाही...'; भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचा टोमणा
18
सायकल बिल्डिंगखाली लावली म्हणून पित्रा-पुत्राने केली एकाची हत्या; गिरगावात धक्कादायक प्रकार
19
“उद्धव ठाकरे वीर सावरकरांचे नाव भाषणात घेण्याची हिंमत करु शकतात का?”; अमित शाहांचे आव्हान
20
'भारतावर संकट आले की, राहुल गांधी इटलीला पळून जातात', योगी आदित्यनाथांचा घणाघात

कोण खोटं बोलतंय? 'त्या' फोटोवर बोट ठेवत दिग्विजय यांचा 'एअर स्ट्राइक'वर संशय

By ऑनलाइन लोकमत | Published: March 06, 2019 4:04 PM

भारतीय हवाई दलाने पाकिस्तानात घुसून बालकोट भागात अनेक दहशतवादी अड्डे उधवस्त केले. फोटो दाखवत एअर स्ट्राईकबाबत काँग्रेसचे जेष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी संशय व्यक्त केला

नवी दिल्ली - भारतीय हवाई दलाने पाकिस्तानात घुसून बालकोट भागात अनेक दहशतवादी अड्डे उधवस्त केले. पुलवामा हल्ल्याच्या बदला घेण्यासाठी भारताने दहशतवाद्यांना टार्गेट करत पाकिस्तानातील त्यांच्या तळांवर एअर स्ट्राईक केला. या एअर स्ट्राईकबाबत काँग्रेसचे जेष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी संशय व्यक्त केला. जर एअर स्ट्राईक झाला असेल त्यात किती दहशतवादी मारले गेले याची माहिती सरकारने द्यावी अशी मागणी सिंह यांनी केली. 

मात्र आत्ता पुन्हा एकदा ऱॉयटर या संस्थेचा हवाला देत दिग्विजय सिंह यांनी ट्विट करत एअर स्ट्राईकवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. हवाई दलाच्या एअऱ स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांचे किती नुकसान झाले त्याचे पुरावे द्यावेत, आंतरराष्ट्रीय पातळीवर एअऱ स्ट्राईकवर शंका उपस्थित होत आहे त्याचे निरसन केंद्र सरकारने करावे अशी मागणी दिग्विजय सिंह केली.

 

रॉयटर या संस्थेने एअर स्ट्राईकनंतरच्या 6 दिवसांनंतर 4 मार्च रोजी बालकोट भागात घेतलेले सँटेलाईट इमेज जारी केले. या फोटोमध्ये ज्या ठिकाणी हवाई दलाने बॉम्ब टाकले त्याठिकाणी असलेल्या इमारती जैसे थे असल्याचा दावा केला. जैश-ए-मोहम्मदकडून दहशतवाद्यांना प्रशिक्षण देण्यासाठी ज्या मदरसा इमारतीचा वापर केला जातो ती इमारत बॉम्ब हल्ल्यानंतर साबूत असल्याचं दाखविण्यात आले आहे. 

पाकिस्तानच्या उत्तर पूर्व भागात असणाऱ्या बालकोट परिसरात जैश-ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेकडून मदरशा चालवला जातो. याच ठिकाणी दहशतवाद्यांना ट्रेंनिग दिले जाते. दहशतवाद्यांच्या या कॅम्पला पाकिस्तानकडूनही मदत होत असल्याचा आरोप भारताकडून केला जातो. जैश-ए-मोहम्मद संघटनेचे सर्वांत मोठे प्रशिक्षण केंद्र बालकोट भागात असून मौलाना मसूद अजहरचा मेहुणा मौलाना युसूफ अजहर हे प्रशिक्षण केंद्र चालवत होता. हेच केंद्र पहाटेच्या अंधारात भारतीय हवाई दलाने एअऱ स्ट्राईक करत उधवस्त केल्याची माहिती परराष्ट्र सचिव विजय़ गोखले यांनी माध्यमांना दिली होती.    

टॅग्स :Digvijaya Singhदिग्विजय सिंहpulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाPakistanपाकिस्तानairforceहवाईदलIndian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईक