शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
2
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
3
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
4
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
5
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
6
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
7
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
8
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
9
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
10
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
11
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...
12
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
13
Vivo Y400 5G: एमोलेड डिस्प्ले, ६००० mAh बॅटरी आणि बरेच काही; विवो व्हाय ४०० भारतात लॉन्च!
14
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
15
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
16
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
17
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
18
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
19
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
20
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...

जमिनीला डिजिटल ओळख क्रमांक, छोटे शेतकरी मोठी शक्ती - पंतप्रधान नरेंद्र मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2024 08:10 IST

३२व्या ‘आंतरराष्ट्रीय कृषी अर्थतज्ज्ञ परिषदे’चे (आयसीएई) उद्घाटन करताना मोदी बोलत होते. राजधानी दिल्लीतील राष्ट्रीय कृषी विज्ञान केंद्रात सुरू असलेली ही परिषद ७ ऑगस्टपर्यंत चालणार आहे.

नवी दिल्ली : देशातील शेतकऱ्यांना त्यांच्या शेत जमिनींचे डिजिटल ओळख क्रमांक देण्यासंबंधीच्या अभियानावर आपले सरकार काम करीत आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी केले. भारत जागतिक खाद्य सुरक्षेसाठी काम करीत आहे, असेही त्यांनी सांगितले.

३२व्या ‘आंतरराष्ट्रीय कृषी अर्थतज्ज्ञ परिषदे’चे (आयसीएई) उद्घाटन करताना मोदी बोलत होते. राजधानी दिल्लीतील राष्ट्रीय कृषी विज्ञान केंद्रात सुरू असलेली ही परिषद ७ ऑगस्टपर्यंत चालणार आहे.

शेती व शेतीशी संबंधित समस्यांवर उपाय शोधण्यासाठी दर ३ वर्षांनी ही परिषद होते. भारतात तब्बल ६५ वर्षांनंतर या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.

याप्रसंगी मोदी यांनी सांगितले की, ‘अन्न हे सर्व पदार्थांत सर्वश्रेष्ठ आहे’, असे आमच्या धर्मग्रंथांत हजारो वर्षांपूर्वी म्हटलेले आहे. अन्नास आम्ही सर्व औषधांचे मूळ मानले आहे.

एका क्लिकवर पैसे...- मोदी यांनी म्हटले की, आपल्या सरकारने नेहमीच शेतकरी हितास प्राधान्य दिले आहे. २०२४-२५चा आमचा अर्थसंकल्प पर्यावरणपूरक शेतीवर केंद्रित आहे.- पीएम किसान सन्मान योजनेच्या माध्यमातून एका क्लिकवर आमच्या १० कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे हस्तांतरित होतात. सरकार शेतजमिनीच्या डिजिटलायझेशनसाठीही अभियान राबवित आहे.- यात शेतकऱ्यांना त्यांच्या शेतजमिनीचे डिजिटल ओळख क्रमांक दिले जातील.

७५ देशांतील १ हजार प्रतिनिधींनी ‘आयसीएई’ परिषदेत हजेरी लावली आहे.

छोटे शेतकरी मोठी शक्तीमोदी म्हणाले की, ६५ वर्षांपूर्वी ‘आयसीएई’ची परिषद भारतात झाली होती, तेव्हा भारताला नुकतेच स्वातंत्र्य मिळाले होते. तेव्हा भारताची खाद्य सुरक्षा जगाच्या दृष्टीने चिंतेचा विषय होती. आता भारत जागतिक खाद्य आणि पोषण सुरक्षेसाठी काम करीत आहे.भारत आता अन्नधान्याच्या दृष्टीने शिलकी साठे असलेला देश बनला आहे. तो जगात दूध, डाळी आणि मसाले यांचे सर्वाधिक उत्पादन करतो.याशिवाय भारत अन्नधान्ये, फळे, भाजीपाला, कापूस, साखर आणि चहा यांचे उत्पादन करणारा जगातील दुसरा मोठा देश आहे. छोटे शेतकरी भारताच्या अन्न सुरक्षेची मोठी शक्ती आहेत.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीFarmerशेतकरी