शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

भारतात 'मन की बात' करणं कठीण - करण जोहर

By admin | Updated: January 22, 2016 13:16 IST

भारतात ' मन की बात' करणं अत्यंत कठीण असून तुम्ही मनातील अथवा काही खासगी विषयावर बोललात, तर तुमची रवानगी तुरूंगात होऊ शकते, असे खळबळजनक वक्तव्य दिग्दर्शक करण जोहरने केले.

ऑनलाइन लोकमत
जयपूर, दि. २२ - भारतात ' मन की बात' करणं अत्यंत कठीण असून तुम्ही मनातील अथवा काही खासगी विषयावर बोललात, तर तुमची रवानगी तुरूंगात होऊ शकते, असे खळबळजनक वक्तव्य दिग्दर्शक करण जोहरने केले आहे. त्याच्या या वक्तव्यामुळे जयपूर लिटरेचर फेस्टीव्हलची सुरुवातच वादाने झाली आहे. गुरूवारी लिटरेचर फेस्टीव्हलदरम्यान लेखिका शोभा डे यांनी करण जोहरची मुलाखत घेतली, त्यावेळी त्याने अनेक विषयांवर आपलं मत मांडलं. 
गेल्या अनेक महिन्यांपासून देशात असहिष्णूतेच्या मुद्यावर बरीच चर्चा सुरू असून त्यासंबंधातील एका वक्तव्यामुळे अभिनेता आमिर खान मोठ्या वादात सापडला होता. काल झालेल्या मुलाखतीदरम्यान करणने या विषयावर स्पष्ट मत मांडण्यास नकार देत वरील वक्तव्य केले. तो म्हणाला ' भारतात अभिव्यक्ती स्वातंत्र्य (फ्रीडम ऑफ एक्स्प्रेशन) हा सर्वात मोठा विनोद असून 'लोकशाही तर त्याहून मोठी थट्टा झाली आहे.' 'तुम्हाला "मन की बात" करायची असेल, काही खासगी सांगायचे असेल तर ते या देशात शक्य नाही,' असेही तो म्हणाला. 
'मला प्रत्येक वेळेस बांधल्यासारखे वाटत राहते, एखादी लिगल नोटीस कायम माझा पिच्छा पुरवत असते असं मला वाटतं. इथे तुमच्या विरोधात कधी कुठे एफआयआर दाखल होईल सांगता ते सांगता येत नाही', असे वक्तव्य त्याने एआयबी रोस्ट प्रकरणी झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर केले. ' आपण फ्रीडम ऑफ स्पीचच्या गोष्टी करतो, पण जर तुम्ही सेलेब्रिटी असाल आणि तुम्ही तुमचे काही मत मांडले तर, एक मोठी कॉन्ट्रोव्हर्सी निर्माण होते,' असेही तो म्हणाला. 
गेल्या वर्षी अभिनेता आमिर खानने देशातील असहिष्णूतेच्या मुद्यावर मत मांडल्याने मोठा गदारोळ झाला होता. 'पत्नी किरण राव हिने आपण देश सोडून जावे का?' अशी विचारणा केल्याचे सांगत आमीरने देशात असहिष्णुता वाढल्याबद्दल चिंता व्यक्त केली होती. देशातील असुरक्षित वातावरणात मुलांच्या सुरक्षेबाबत भीती वाटत असल्याची भावनाही त्याने व्यक्त केली होती. मात्र त्याच्या या वक्तव्यानंतर देशभरात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या, अनेकांनी त्याला देश सोडून जाण्याचा सल्लाही दिला होता. त्याचे हे वक्तव्य त्याला भलतेच महागात पडले. त्याला 'अतुल्य भारत'चे ब्रँड अँम्बेसेडरपद गमवावे लागले तसेच रस्ता सुरक्षा अभियानातूनही त्याची हकालपट्टी करण्यात आली.