शहरं
Join us  
Trending Stories
1
Latur: मारहाणीनंतर ‘छावा’चे कार्यकर्ते रात्री उशिरा रस्त्यावर; राष्ट्रवादीचे बॅनर फाडले
2
कोकाटेंचा राजीनामा मागितला, तटकरेंना निवेदन देत पत्ते फेकले, छावा आणि अजितदादांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा
3
"आमच्या निवेदनाला लाथाबुक्क्यांनी उत्तर देत असाल तर…’’, विजय घाडगे यांची संतप्त प्रतिक्रिया 
4
ऑपरेशन सिंदूरवेळी जीव धोक्यात घालून केली जवानांना मदत, आता लष्कराने १० वर्षांच्या मुलाला दिलं मोठं बक्षीस
5
"माणिकराव कोकाटे यांचा 'तो' व्हिडीओ AIच्या मदतीनं, मी स्वतः..."; भाजप आमदाराचा दावा
6
राजस्थानात मुसळधार पाऊस, अजमेरमध्ये तरुण वाहून जाता-जाता बचावला; असा वाचला जीव, बघा VIDEO
7
प्रवेश करताच लिफ्ट बंद, प्रवीण दरेकरांसह १७ जण अडकले, १० मिनिटं चालला थरार, अखेर दरवाजा तोडून केली सुटका
8
मांत्रिकाकडून पूजा केली, खड्डा खणला, तेवढ्यात आले पोलीस, गुप्तधन शोधताना पाच जणांना अटक
9
416%नं वाढला कंपनीचा नफा, आता शेअर खरेदीसाठी लोकांची झुंबड; ₹40 पेक्षाही कमी आहे किंमत!
10
हरीण बिथरले, महामार्गावरून सैरावैरा पळत सुटले, पुलावरून मारली उडी, झाला करुण अंत
11
असंवेदनशिल कृषीमंत्री कोकाटेंचा राजीनामा घ्या; विधान परिषदेतील विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांची मागणी
12
जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये चकमक, जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी लपल्याचा संशय
13
इंडोनेशियात प्रवासी बोटीला भीषण आग; प्रवाशांनी समुद्रात मारल्या उड्या...
14
उज्ज्वल निकम यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार? भाजपा नेते म्हणतात, “काही अशक्य नाही”
15
हिमाचलमधील एका तरुणीनं दोन भावांसोबत का केलं लग्न? जाणून घ्या काय आहे ही 'जोडीदार प्रथा'?
16
"मी रमी खेळतच नव्हतो...!" व्हायरल व्हिडीओवर कोकाटेंचं स्पष्टीकरण, पण स्वतःच मांडल्या दोन थेअरी; एकदा म्हणाले जाहिरात, एकदा म्हणाले...!
17
भारतातील हे पर्यटन स्थळ बनतंय बँकॉक, वेश्या व्यवसायासाठी अल्पवयीन मुलींना आणलं जातंय, भाजपाच्या महिला नेत्याचा आरोप
18
Madha Crime: चेहरा छिन्नविच्छिन्न, रस्त्यावर रक्ताचे डाग! यात्रेत गेलेल्या १० वर्षांच्या कार्तिकचा कालव्यात सापडला कुजलेला मृतदेह
19
विकृतीचा कळस! लंडनमधील इस्कॉनच्या रेस्टोरंटमध्ये घुसून मुद्दाम खाल्लं चिकन; घाणेरडं कृत्य पाहून लोक संतापले
20
मराठमोळी मृणाल ठाकूर घटस्फोटीत अभिनेत्याच्या प्रेमात? "सीतारामम" चित्रपटात एकत्र केलंं काम

भारतात 'मन की बात' करणं कठीण - करण जोहर

By admin | Updated: January 22, 2016 13:16 IST

भारतात ' मन की बात' करणं अत्यंत कठीण असून तुम्ही मनातील अथवा काही खासगी विषयावर बोललात, तर तुमची रवानगी तुरूंगात होऊ शकते, असे खळबळजनक वक्तव्य दिग्दर्शक करण जोहरने केले.

ऑनलाइन लोकमत
जयपूर, दि. २२ - भारतात ' मन की बात' करणं अत्यंत कठीण असून तुम्ही मनातील अथवा काही खासगी विषयावर बोललात, तर तुमची रवानगी तुरूंगात होऊ शकते, असे खळबळजनक वक्तव्य दिग्दर्शक करण जोहरने केले आहे. त्याच्या या वक्तव्यामुळे जयपूर लिटरेचर फेस्टीव्हलची सुरुवातच वादाने झाली आहे. गुरूवारी लिटरेचर फेस्टीव्हलदरम्यान लेखिका शोभा डे यांनी करण जोहरची मुलाखत घेतली, त्यावेळी त्याने अनेक विषयांवर आपलं मत मांडलं. 
गेल्या अनेक महिन्यांपासून देशात असहिष्णूतेच्या मुद्यावर बरीच चर्चा सुरू असून त्यासंबंधातील एका वक्तव्यामुळे अभिनेता आमिर खान मोठ्या वादात सापडला होता. काल झालेल्या मुलाखतीदरम्यान करणने या विषयावर स्पष्ट मत मांडण्यास नकार देत वरील वक्तव्य केले. तो म्हणाला ' भारतात अभिव्यक्ती स्वातंत्र्य (फ्रीडम ऑफ एक्स्प्रेशन) हा सर्वात मोठा विनोद असून 'लोकशाही तर त्याहून मोठी थट्टा झाली आहे.' 'तुम्हाला "मन की बात" करायची असेल, काही खासगी सांगायचे असेल तर ते या देशात शक्य नाही,' असेही तो म्हणाला. 
'मला प्रत्येक वेळेस बांधल्यासारखे वाटत राहते, एखादी लिगल नोटीस कायम माझा पिच्छा पुरवत असते असं मला वाटतं. इथे तुमच्या विरोधात कधी कुठे एफआयआर दाखल होईल सांगता ते सांगता येत नाही', असे वक्तव्य त्याने एआयबी रोस्ट प्रकरणी झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर केले. ' आपण फ्रीडम ऑफ स्पीचच्या गोष्टी करतो, पण जर तुम्ही सेलेब्रिटी असाल आणि तुम्ही तुमचे काही मत मांडले तर, एक मोठी कॉन्ट्रोव्हर्सी निर्माण होते,' असेही तो म्हणाला. 
गेल्या वर्षी अभिनेता आमिर खानने देशातील असहिष्णूतेच्या मुद्यावर मत मांडल्याने मोठा गदारोळ झाला होता. 'पत्नी किरण राव हिने आपण देश सोडून जावे का?' अशी विचारणा केल्याचे सांगत आमीरने देशात असहिष्णुता वाढल्याबद्दल चिंता व्यक्त केली होती. देशातील असुरक्षित वातावरणात मुलांच्या सुरक्षेबाबत भीती वाटत असल्याची भावनाही त्याने व्यक्त केली होती. मात्र त्याच्या या वक्तव्यानंतर देशभरात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या, अनेकांनी त्याला देश सोडून जाण्याचा सल्लाही दिला होता. त्याचे हे वक्तव्य त्याला भलतेच महागात पडले. त्याला 'अतुल्य भारत'चे ब्रँड अँम्बेसेडरपद गमवावे लागले तसेच रस्ता सुरक्षा अभियानातूनही त्याची हकालपट्टी करण्यात आली.