शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे सुपुत्र बी. आर. गवई देशाचे नवे सरन्यायाधीश; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी दिली शपथ
2
विजय शाह यांना कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबाबत वादग्रस्त विधान भोवले; काँग्रेस नेत्यांची निदर्शने; नेमप्लेटवर शाई फेकली
3
कर्नल सोफिया कुरेशींबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या भाजपा मंत्र्याला दणका; वरिष्ठांचे आदेश आले, अन्...
4
पाकिस्ताननं जितक्या रकमेसाठी IMF मध्ये नाक कापून घेतलं, भारताला त्यापेक्षा अधिक तर 'गिफ्ट'च मिळणारे; प्रकरण काय?
5
एकामागोमाग एक दिग्गज कंपन्या निर्णय घेतायत; मायक्रोसॉफ्ट ६००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार
6
Rohit Sharma : कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर रोहित शर्मा मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला, कारण काय ?
7
ब्रेकअपनंतर प्रेयसीचे ’तसले’ व्हिडीओ पॉर्न साईटवर? कोल्हापूरच्या प्रियकरावर पुण्यात गुन्हा
8
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आता बुलेटप्रुफ कारमधून ये-जा करणार; पाकिस्तानमुळे वाढली सुरक्षा
9
मोठी बातमी! अकोल्यातील पाच सराफा दुकानांवर आयकरची धाड; सकाळपासून शोधमोहिम सुरू
10
पाकिस्तानला शस्त्रास्त्रे देणाऱ्या तुर्कीवर पुण्यातून ट्रेड स्ट्राईक; उदयपूरचे संगमरवर व्यापारीही माल आणणार नाहीत
11
कोण आहे कशिश चौधरी?; वयाच्या २५ व्या वर्षी या हिंदू मुलीनं पाकिस्तानात रचला इतिहास
12
भारत-पाकिस्तान तणावामुळे आलिया भटने घेतला हा मोठा निर्णय, वाचून कराल तिचं कौतुक
13
हेअर ट्रान्सप्लांटमुळे एक नव्हे २ इंजिनिअरचा मृत्यू; डॉ. अनुष्का तिवारीचा नवा कांड उघड
14
Stock Market Today: या वृत्तानं बदलला बाजाराचा मूड; १३० अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स, IT-Metal स्टॉक्समध्ये तेजी
15
भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानी एअरबेस उद्ध्वस्त; लढाऊ विमाने जळून राख, सॅटेलाईट फोटो पाहा
16
भारतीय वंशाच्या अनिता आनंद कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री; ट्रुडोंनी बिघडविलेले संबंध सुधारण्याची अपेक्षा
17
PPF बनवेल कोट्यधीश, कमाल आहे १५+५+५ ची जादू; बनेल १ कोटींचा बॅलन्स, पण कसा?
18
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
19
S-400: सिलिगुडी कॉरिडॉरला 'सुदर्शन चक्र' चे संरक्षण असणार; कोणत्याही धोक्याला तोंड देण्यासाठी सैन्य सज्ज
20
पाकविरोधात केंद्र सरकारच्या कारवाईवर जनता खुश आहे की नाही?; ऑपरेशन सिंदूरनंतर समोर आला सर्व्हे

भारतात 'मन की बात' करणं कठीण - करण जोहर

By admin | Updated: January 22, 2016 13:16 IST

भारतात ' मन की बात' करणं अत्यंत कठीण असून तुम्ही मनातील अथवा काही खासगी विषयावर बोललात, तर तुमची रवानगी तुरूंगात होऊ शकते, असे खळबळजनक वक्तव्य दिग्दर्शक करण जोहरने केले.

ऑनलाइन लोकमत
जयपूर, दि. २२ - भारतात ' मन की बात' करणं अत्यंत कठीण असून तुम्ही मनातील अथवा काही खासगी विषयावर बोललात, तर तुमची रवानगी तुरूंगात होऊ शकते, असे खळबळजनक वक्तव्य दिग्दर्शक करण जोहरने केले आहे. त्याच्या या वक्तव्यामुळे जयपूर लिटरेचर फेस्टीव्हलची सुरुवातच वादाने झाली आहे. गुरूवारी लिटरेचर फेस्टीव्हलदरम्यान लेखिका शोभा डे यांनी करण जोहरची मुलाखत घेतली, त्यावेळी त्याने अनेक विषयांवर आपलं मत मांडलं. 
गेल्या अनेक महिन्यांपासून देशात असहिष्णूतेच्या मुद्यावर बरीच चर्चा सुरू असून त्यासंबंधातील एका वक्तव्यामुळे अभिनेता आमिर खान मोठ्या वादात सापडला होता. काल झालेल्या मुलाखतीदरम्यान करणने या विषयावर स्पष्ट मत मांडण्यास नकार देत वरील वक्तव्य केले. तो म्हणाला ' भारतात अभिव्यक्ती स्वातंत्र्य (फ्रीडम ऑफ एक्स्प्रेशन) हा सर्वात मोठा विनोद असून 'लोकशाही तर त्याहून मोठी थट्टा झाली आहे.' 'तुम्हाला "मन की बात" करायची असेल, काही खासगी सांगायचे असेल तर ते या देशात शक्य नाही,' असेही तो म्हणाला. 
'मला प्रत्येक वेळेस बांधल्यासारखे वाटत राहते, एखादी लिगल नोटीस कायम माझा पिच्छा पुरवत असते असं मला वाटतं. इथे तुमच्या विरोधात कधी कुठे एफआयआर दाखल होईल सांगता ते सांगता येत नाही', असे वक्तव्य त्याने एआयबी रोस्ट प्रकरणी झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर केले. ' आपण फ्रीडम ऑफ स्पीचच्या गोष्टी करतो, पण जर तुम्ही सेलेब्रिटी असाल आणि तुम्ही तुमचे काही मत मांडले तर, एक मोठी कॉन्ट्रोव्हर्सी निर्माण होते,' असेही तो म्हणाला. 
गेल्या वर्षी अभिनेता आमिर खानने देशातील असहिष्णूतेच्या मुद्यावर मत मांडल्याने मोठा गदारोळ झाला होता. 'पत्नी किरण राव हिने आपण देश सोडून जावे का?' अशी विचारणा केल्याचे सांगत आमीरने देशात असहिष्णुता वाढल्याबद्दल चिंता व्यक्त केली होती. देशातील असुरक्षित वातावरणात मुलांच्या सुरक्षेबाबत भीती वाटत असल्याची भावनाही त्याने व्यक्त केली होती. मात्र त्याच्या या वक्तव्यानंतर देशभरात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या, अनेकांनी त्याला देश सोडून जाण्याचा सल्लाही दिला होता. त्याचे हे वक्तव्य त्याला भलतेच महागात पडले. त्याला 'अतुल्य भारत'चे ब्रँड अँम्बेसेडरपद गमवावे लागले तसेच रस्ता सुरक्षा अभियानातूनही त्याची हकालपट्टी करण्यात आली.