शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
2
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
3
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
4
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
5
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
6
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
7
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
8
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
9
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
10
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
11
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
12
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
13
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
14
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
15
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
16
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
17
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
18
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
19
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
20
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...

गांधी कुटुंबात मतभिन्नता; काही निर्णयांमुळे सोनिया गांधींना पत्र लिहिणाऱ्या नेत्यांमध्ये नाराजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2020 06:59 IST

काँग्रेसमध्ये चिंता

- शीलेश शर्मा नवी दिल्ली : गांधी कुटुंबात निर्णयांवरून आपापसातील मतभिन्नतेमुळे पक्षात चिंता आणि अंसतोष निर्माण झाला आहे. निर्णयांना पाहून पक्षाचे शीर्ष नेतृत्व तीन गटांत विभागले गेल्याचे दिसते. त्यामुळे निर्णय वेळेवर होत नाहीत की नव्या अध्यक्षाच्या नियुक्तीसाठी रोड मॅप बनतोय.

सरचिटणीस प्रियंका गांधी यांना फक्त उत्तर प्रदेशच्या राजकारणापुरते मर्यादित केले गेले आहे. सोनिया गांधी यांच्याशी चर्चा न करताच राज्यांत नियुक्त्या होत आहेत. पक्षाचे नेते समजतात की सगळे काही राहुल गांधी यांच्याभोवती फिरत आहे व ते निर्णयांना अंतिम रूप देत आहेत.

रविवारी उत्तर प्रदेशमध्ये ज्या समित्या बनवल्या गेल्या त्यात जितिन प्रसाद, प्रमोद कृष्णन,राजीव शुक्ला या ब्राह्मण नेत्यांची नावे नव्हती. याशिवाय श्रीप्रकाश जैस्वाल, राज बब्बर यांचीही नावे त्यात नव्हती तेही उत्तर प्रदेशमध्ये ब्राह्मण १८ टक्के आहेत हे माहीत असूनही. ब्राह्मणांची राजकारणावर जोरदार पकड आहे. यानंतर येतात दलित आणि मुस्लिम.

काँग्रेससोबत त्यांना उभे केले जाऊ शकते. उत्तर प्रदेशच्या एका वरिष्ठ नेत्याने ‘लोकमत’ शी बोलताना म्हटले की, राहुल गांधी यांच्या विश्वासूंना प्रियंका गांधी उत्तर प्रदेशच्या बाहेर निघू नये असे वाटते. उत्तर प्रदेश काँग्रेसच्या बहुतांश नेत्यांनी सोनिया व राहुल गांधींकडे मागणी केली की प्रियंका गांधी यांना योगी यांच्या समोर पक्षाचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून आणावे.

आजही प्रदेश समितीत २ उपाध्यक्ष आणि ६ महासचिव नियुक्त केले गेले. परंतु, सगळ््या नियुक्त्या राहुल यांच्या इशाºयावर होत आहेत. यामुळे सोनिया गांधींना लिहिलेल्या पत्रावर सह्या करणारे नेते निराश आहेत. जितिन प्रसाद यांनी ‘लोकमत’ शी बोलताना म्हटले की, पक्षात काय चालले हे मला माहिती नाही. काँग्रेसमध्ये राहायचे तर जे सांगितले जाते ते ऐकायचे.

कोरोना संकटात मोदी सरकारने देशाला वाऱ्यावर सोडून दिले -काँग्रेस

कोरोना महामारीत मोदी सरकारने संपूर्ण देशाला वाºयावर सोडून दिले, असा आरोप काँग्रेसने केला. महामारीची साथ पसरून १६६ दिवस झाले तरी मोदी सरकार चिकित्सा सुविधांची व्यवस्था करू शकले ना इतर काही उपाय. जर आकडेवारीच पाहिली तर भारत जगात या महामारीने प्रभावित होणारा क्रमांक एकचा देश होताना दिसतो. देशात कोरोना विषाणूचे एका दिवसात ९०,८०२ रुग्ण समोर आले आहेत. हे रुग्ण २९ दिवसांत दुपट्ट झाले. ११० दिवसांत एक लाखांपर्यंत कोरोना संक्रमण झाले आहे.

काँग्रेसने एक व्हिडिओ जारी करून हे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला की, मोदी सरकार आणि भाजपचे नेते कोरोनाबद्दल किती गंभीर आहेत. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, कैलाश विजयवर्गीय, अर्जुन मेघवाल, भाजपचे खासदार वीरेंद्र सिंह, आरोग्य राज्यमंत्री अश्विनी चौबे, अनुराग शर्मा, साक्षी महाराज, अनिल विज या नेत्यांची नावे आणि त्यांची वक्तव्ये या व्हिडिओमध्ये आहेत. कोणी शाकाहारी व्हा असा सल्ला देत आहे. पक्षाचे नेते राहुल गांधी यांच्यासह पक्षाच्या नेत्यांनी मोदी सरकार कोरोनाबाबत गंभीर नसल्यामुळे लोकांनी स्वत:ची काळजी घ्यावी, असे आवाहन केले. सरकार कोणाचा सल्ला घेत आहे ना कोणाशी संवाद साधत आहे, असेही त्यात म्हटले.

टॅग्स :congressकाँग्रेसSonia Gandhiसोनिया गांधीRahul Gandhiराहुल गांधी