शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
2
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
3
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!
4
सीपी राधाकृष्णन बनले देशाचे १५ वे उपराष्ट्रपती! राष्ट्रपती भवनात घेतली शपथ, जगदीप धनखड पहिल्यांदाच समोर
5
ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू
6
Video: प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यावर सिंहाचा हल्ला, पर्यटकांसमोर फाडून खाल्ले...
7
Latur: 'ओबीसी आरक्षण संपले', घोषणा देत तरुणाने मांजरा नदीत उडी घेऊन संपवलं जीवन
8
बंगला नाही, गाडी नाही, सर्व सुविधा काढून घेतल्या; ८० वर्षीय माजी राष्ट्रपतींना राजवाडा रिकामा करावा लागला; जाणून घ्या नवीन कायदा
9
"तू आयुष्यभर तेच केलंस, विवाहित पुरुषांसोबत...", कुनिकावर संतापला कुमार सानूचा मुलगा, म्हणाला...
10
Astrology: लक्ष्मीकृपने आज 'या' ५ राशींचा दिवस उत्तम जाणार; गोड बातमीही मिळणार!
11
गोळी मारली, १५ फुटांवरुन रायफलसह उडी मारली अन्... चार्ली कर्कची हत्या करणाऱ्याचा VIDEO समोर
12
पैसे तयार ठेवा! ऑक्टोबरमध्ये येणार 'टाटा'चा बहुप्रतिक्षित आयपीओ; अधिक माहिती काय?
13
तुम्ही 'जाड' झालात का? धोका ओळखा! युनिसेफने दिला तरुणांना सर्तकतेचा इशारा, भारतातही चिंता वाढली
14
६५० कोटी रुपयांच्या जीएसटी घोटाळ्यात सीमा हैदर आणि सचिन यांची नावे समोर? काय आहे प्रकरण?
15
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
16
धक्कादायक! पती नपुंसक, सासऱ्याने नातवासाठी सेक्सची मागणी केली; माजी एसीपीच्या सुनेचा गंभीर आरोप
17
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
18
MSRTC: ...तरच जेष्ठ नागरिकांना एसटी तिकिट दरात ५० टक्क्यांची सवलत, नियमात बदल!
19
हेमा मालिनीशी लग्न केल्यानंतरही २७ वर्षांनी लहान अभिनेत्रीच्या प्रेमात पडले होते धर्मेंद्र, कोण होती ती?
20
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक

गांधी कुटुंबात मतभिन्नता; काही निर्णयांमुळे सोनिया गांधींना पत्र लिहिणाऱ्या नेत्यांमध्ये नाराजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2020 06:59 IST

काँग्रेसमध्ये चिंता

- शीलेश शर्मा नवी दिल्ली : गांधी कुटुंबात निर्णयांवरून आपापसातील मतभिन्नतेमुळे पक्षात चिंता आणि अंसतोष निर्माण झाला आहे. निर्णयांना पाहून पक्षाचे शीर्ष नेतृत्व तीन गटांत विभागले गेल्याचे दिसते. त्यामुळे निर्णय वेळेवर होत नाहीत की नव्या अध्यक्षाच्या नियुक्तीसाठी रोड मॅप बनतोय.

सरचिटणीस प्रियंका गांधी यांना फक्त उत्तर प्रदेशच्या राजकारणापुरते मर्यादित केले गेले आहे. सोनिया गांधी यांच्याशी चर्चा न करताच राज्यांत नियुक्त्या होत आहेत. पक्षाचे नेते समजतात की सगळे काही राहुल गांधी यांच्याभोवती फिरत आहे व ते निर्णयांना अंतिम रूप देत आहेत.

रविवारी उत्तर प्रदेशमध्ये ज्या समित्या बनवल्या गेल्या त्यात जितिन प्रसाद, प्रमोद कृष्णन,राजीव शुक्ला या ब्राह्मण नेत्यांची नावे नव्हती. याशिवाय श्रीप्रकाश जैस्वाल, राज बब्बर यांचीही नावे त्यात नव्हती तेही उत्तर प्रदेशमध्ये ब्राह्मण १८ टक्के आहेत हे माहीत असूनही. ब्राह्मणांची राजकारणावर जोरदार पकड आहे. यानंतर येतात दलित आणि मुस्लिम.

काँग्रेससोबत त्यांना उभे केले जाऊ शकते. उत्तर प्रदेशच्या एका वरिष्ठ नेत्याने ‘लोकमत’ शी बोलताना म्हटले की, राहुल गांधी यांच्या विश्वासूंना प्रियंका गांधी उत्तर प्रदेशच्या बाहेर निघू नये असे वाटते. उत्तर प्रदेश काँग्रेसच्या बहुतांश नेत्यांनी सोनिया व राहुल गांधींकडे मागणी केली की प्रियंका गांधी यांना योगी यांच्या समोर पक्षाचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून आणावे.

आजही प्रदेश समितीत २ उपाध्यक्ष आणि ६ महासचिव नियुक्त केले गेले. परंतु, सगळ््या नियुक्त्या राहुल यांच्या इशाºयावर होत आहेत. यामुळे सोनिया गांधींना लिहिलेल्या पत्रावर सह्या करणारे नेते निराश आहेत. जितिन प्रसाद यांनी ‘लोकमत’ शी बोलताना म्हटले की, पक्षात काय चालले हे मला माहिती नाही. काँग्रेसमध्ये राहायचे तर जे सांगितले जाते ते ऐकायचे.

कोरोना संकटात मोदी सरकारने देशाला वाऱ्यावर सोडून दिले -काँग्रेस

कोरोना महामारीत मोदी सरकारने संपूर्ण देशाला वाºयावर सोडून दिले, असा आरोप काँग्रेसने केला. महामारीची साथ पसरून १६६ दिवस झाले तरी मोदी सरकार चिकित्सा सुविधांची व्यवस्था करू शकले ना इतर काही उपाय. जर आकडेवारीच पाहिली तर भारत जगात या महामारीने प्रभावित होणारा क्रमांक एकचा देश होताना दिसतो. देशात कोरोना विषाणूचे एका दिवसात ९०,८०२ रुग्ण समोर आले आहेत. हे रुग्ण २९ दिवसांत दुपट्ट झाले. ११० दिवसांत एक लाखांपर्यंत कोरोना संक्रमण झाले आहे.

काँग्रेसने एक व्हिडिओ जारी करून हे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला की, मोदी सरकार आणि भाजपचे नेते कोरोनाबद्दल किती गंभीर आहेत. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, कैलाश विजयवर्गीय, अर्जुन मेघवाल, भाजपचे खासदार वीरेंद्र सिंह, आरोग्य राज्यमंत्री अश्विनी चौबे, अनुराग शर्मा, साक्षी महाराज, अनिल विज या नेत्यांची नावे आणि त्यांची वक्तव्ये या व्हिडिओमध्ये आहेत. कोणी शाकाहारी व्हा असा सल्ला देत आहे. पक्षाचे नेते राहुल गांधी यांच्यासह पक्षाच्या नेत्यांनी मोदी सरकार कोरोनाबाबत गंभीर नसल्यामुळे लोकांनी स्वत:ची काळजी घ्यावी, असे आवाहन केले. सरकार कोणाचा सल्ला घेत आहे ना कोणाशी संवाद साधत आहे, असेही त्यात म्हटले.

टॅग्स :congressकाँग्रेसSonia Gandhiसोनिया गांधीRahul Gandhiराहुल गांधी