शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
4
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
5
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
6
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
7
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
8
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
9
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
10
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
11
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
12
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
13
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
14
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
15
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
16
Astro Tips: आंघोळीच्या पाण्यात १ वेलची टाकल्याने होणारे लाभ वाचून चकित व्हाल!
17
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
18
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
19
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
20
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
Daily Top 2Weekly Top 5

गांधी कुटुंबात मतभिन्नता; काही निर्णयांमुळे सोनिया गांधींना पत्र लिहिणाऱ्या नेत्यांमध्ये नाराजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2020 06:59 IST

काँग्रेसमध्ये चिंता

- शीलेश शर्मा नवी दिल्ली : गांधी कुटुंबात निर्णयांवरून आपापसातील मतभिन्नतेमुळे पक्षात चिंता आणि अंसतोष निर्माण झाला आहे. निर्णयांना पाहून पक्षाचे शीर्ष नेतृत्व तीन गटांत विभागले गेल्याचे दिसते. त्यामुळे निर्णय वेळेवर होत नाहीत की नव्या अध्यक्षाच्या नियुक्तीसाठी रोड मॅप बनतोय.

सरचिटणीस प्रियंका गांधी यांना फक्त उत्तर प्रदेशच्या राजकारणापुरते मर्यादित केले गेले आहे. सोनिया गांधी यांच्याशी चर्चा न करताच राज्यांत नियुक्त्या होत आहेत. पक्षाचे नेते समजतात की सगळे काही राहुल गांधी यांच्याभोवती फिरत आहे व ते निर्णयांना अंतिम रूप देत आहेत.

रविवारी उत्तर प्रदेशमध्ये ज्या समित्या बनवल्या गेल्या त्यात जितिन प्रसाद, प्रमोद कृष्णन,राजीव शुक्ला या ब्राह्मण नेत्यांची नावे नव्हती. याशिवाय श्रीप्रकाश जैस्वाल, राज बब्बर यांचीही नावे त्यात नव्हती तेही उत्तर प्रदेशमध्ये ब्राह्मण १८ टक्के आहेत हे माहीत असूनही. ब्राह्मणांची राजकारणावर जोरदार पकड आहे. यानंतर येतात दलित आणि मुस्लिम.

काँग्रेससोबत त्यांना उभे केले जाऊ शकते. उत्तर प्रदेशच्या एका वरिष्ठ नेत्याने ‘लोकमत’ शी बोलताना म्हटले की, राहुल गांधी यांच्या विश्वासूंना प्रियंका गांधी उत्तर प्रदेशच्या बाहेर निघू नये असे वाटते. उत्तर प्रदेश काँग्रेसच्या बहुतांश नेत्यांनी सोनिया व राहुल गांधींकडे मागणी केली की प्रियंका गांधी यांना योगी यांच्या समोर पक्षाचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून आणावे.

आजही प्रदेश समितीत २ उपाध्यक्ष आणि ६ महासचिव नियुक्त केले गेले. परंतु, सगळ््या नियुक्त्या राहुल यांच्या इशाºयावर होत आहेत. यामुळे सोनिया गांधींना लिहिलेल्या पत्रावर सह्या करणारे नेते निराश आहेत. जितिन प्रसाद यांनी ‘लोकमत’ शी बोलताना म्हटले की, पक्षात काय चालले हे मला माहिती नाही. काँग्रेसमध्ये राहायचे तर जे सांगितले जाते ते ऐकायचे.

कोरोना संकटात मोदी सरकारने देशाला वाऱ्यावर सोडून दिले -काँग्रेस

कोरोना महामारीत मोदी सरकारने संपूर्ण देशाला वाºयावर सोडून दिले, असा आरोप काँग्रेसने केला. महामारीची साथ पसरून १६६ दिवस झाले तरी मोदी सरकार चिकित्सा सुविधांची व्यवस्था करू शकले ना इतर काही उपाय. जर आकडेवारीच पाहिली तर भारत जगात या महामारीने प्रभावित होणारा क्रमांक एकचा देश होताना दिसतो. देशात कोरोना विषाणूचे एका दिवसात ९०,८०२ रुग्ण समोर आले आहेत. हे रुग्ण २९ दिवसांत दुपट्ट झाले. ११० दिवसांत एक लाखांपर्यंत कोरोना संक्रमण झाले आहे.

काँग्रेसने एक व्हिडिओ जारी करून हे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला की, मोदी सरकार आणि भाजपचे नेते कोरोनाबद्दल किती गंभीर आहेत. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, कैलाश विजयवर्गीय, अर्जुन मेघवाल, भाजपचे खासदार वीरेंद्र सिंह, आरोग्य राज्यमंत्री अश्विनी चौबे, अनुराग शर्मा, साक्षी महाराज, अनिल विज या नेत्यांची नावे आणि त्यांची वक्तव्ये या व्हिडिओमध्ये आहेत. कोणी शाकाहारी व्हा असा सल्ला देत आहे. पक्षाचे नेते राहुल गांधी यांच्यासह पक्षाच्या नेत्यांनी मोदी सरकार कोरोनाबाबत गंभीर नसल्यामुळे लोकांनी स्वत:ची काळजी घ्यावी, असे आवाहन केले. सरकार कोणाचा सल्ला घेत आहे ना कोणाशी संवाद साधत आहे, असेही त्यात म्हटले.

टॅग्स :congressकाँग्रेसSonia Gandhiसोनिया गांधीRahul Gandhiराहुल गांधी