शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
2
Raj Thackeray: राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
3
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
4
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!
5
Pune Rave Party: "तुमच्या तर दिव्याखालीच अंधार"; चित्रा वाघांनी सुप्रिया सुळे, रोहिणी खडसेंना सुनावले
6
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
7
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
8
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
9
आजारी लेकीला रुग्णालयात घेऊन चाललेले वडील, BMW ची धडक; मन हेलावून टाकणारी घटना
10
"कोणी ड्रममध्ये भरत आहे तर कोणी...", शिव ठाकरेला वाटते लग्नाची भीती, म्हणाला- "हा तर कर्मा..."
11
Pune Rave Party: रेव्ह पार्टी उधळल्यानंतर रोहिणी खडसेंच्या घराची झाडाझडती, पोलिसांना मिळाल्या तीन गोष्टी 
12
दुबईत सोनं खरंच स्वस्त मिळतं? भारतात आणण्याचे नियम काय? किती टॅक्स लागतो? सर्व काही जाणून घ्या
13
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं
14
भन्साळींच्या या सिनेमासाठी २ मराठी अभिनेत्यांनीही दिलेली ऑडिशन, वैभव तत्ववादीने मारली 'बाजी'
15
संजय कपूर यांच्या ३०,००० कोटींच्या संपत्तीवरून गृहकलह? कोण आहे प्रिया सचदेव? अचानक का आली चर्चेत?
16
'मंत्रिपदासाठी माझी जात आडवी येते; राष्ट्रवादीने मराठ्यांचा वापर केला', प्रकाश सोळंकेंचा पक्षाला घरचा आहेर
17
'गिरीश महाजन नावाचा सांड मोकाट सुटलाय; फडणवीसांना...', संजय राऊतांचे टीकास्त्र
18
Pune Rave Party: पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
19
Pranjal Khewalkar Pune Rave Party: तीन फ्लॅट बुक, तीन महिला गायब...! नुसती रेव्ह पार्टी होती की आणखी काही...; मोठी अपडेट समोर
20
"पु.ल. देशपांडेंनी मला बघून विचारलं...", आठ वर्षांच्या सचिन पिळगावकरांचा आणखी एक किस्सा

गांधी कुटुंबात मतभिन्नता; काही निर्णयांमुळे सोनिया गांधींना पत्र लिहिणाऱ्या नेत्यांमध्ये नाराजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2020 06:59 IST

काँग्रेसमध्ये चिंता

- शीलेश शर्मा नवी दिल्ली : गांधी कुटुंबात निर्णयांवरून आपापसातील मतभिन्नतेमुळे पक्षात चिंता आणि अंसतोष निर्माण झाला आहे. निर्णयांना पाहून पक्षाचे शीर्ष नेतृत्व तीन गटांत विभागले गेल्याचे दिसते. त्यामुळे निर्णय वेळेवर होत नाहीत की नव्या अध्यक्षाच्या नियुक्तीसाठी रोड मॅप बनतोय.

सरचिटणीस प्रियंका गांधी यांना फक्त उत्तर प्रदेशच्या राजकारणापुरते मर्यादित केले गेले आहे. सोनिया गांधी यांच्याशी चर्चा न करताच राज्यांत नियुक्त्या होत आहेत. पक्षाचे नेते समजतात की सगळे काही राहुल गांधी यांच्याभोवती फिरत आहे व ते निर्णयांना अंतिम रूप देत आहेत.

रविवारी उत्तर प्रदेशमध्ये ज्या समित्या बनवल्या गेल्या त्यात जितिन प्रसाद, प्रमोद कृष्णन,राजीव शुक्ला या ब्राह्मण नेत्यांची नावे नव्हती. याशिवाय श्रीप्रकाश जैस्वाल, राज बब्बर यांचीही नावे त्यात नव्हती तेही उत्तर प्रदेशमध्ये ब्राह्मण १८ टक्के आहेत हे माहीत असूनही. ब्राह्मणांची राजकारणावर जोरदार पकड आहे. यानंतर येतात दलित आणि मुस्लिम.

काँग्रेससोबत त्यांना उभे केले जाऊ शकते. उत्तर प्रदेशच्या एका वरिष्ठ नेत्याने ‘लोकमत’ शी बोलताना म्हटले की, राहुल गांधी यांच्या विश्वासूंना प्रियंका गांधी उत्तर प्रदेशच्या बाहेर निघू नये असे वाटते. उत्तर प्रदेश काँग्रेसच्या बहुतांश नेत्यांनी सोनिया व राहुल गांधींकडे मागणी केली की प्रियंका गांधी यांना योगी यांच्या समोर पक्षाचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून आणावे.

आजही प्रदेश समितीत २ उपाध्यक्ष आणि ६ महासचिव नियुक्त केले गेले. परंतु, सगळ््या नियुक्त्या राहुल यांच्या इशाºयावर होत आहेत. यामुळे सोनिया गांधींना लिहिलेल्या पत्रावर सह्या करणारे नेते निराश आहेत. जितिन प्रसाद यांनी ‘लोकमत’ शी बोलताना म्हटले की, पक्षात काय चालले हे मला माहिती नाही. काँग्रेसमध्ये राहायचे तर जे सांगितले जाते ते ऐकायचे.

कोरोना संकटात मोदी सरकारने देशाला वाऱ्यावर सोडून दिले -काँग्रेस

कोरोना महामारीत मोदी सरकारने संपूर्ण देशाला वाºयावर सोडून दिले, असा आरोप काँग्रेसने केला. महामारीची साथ पसरून १६६ दिवस झाले तरी मोदी सरकार चिकित्सा सुविधांची व्यवस्था करू शकले ना इतर काही उपाय. जर आकडेवारीच पाहिली तर भारत जगात या महामारीने प्रभावित होणारा क्रमांक एकचा देश होताना दिसतो. देशात कोरोना विषाणूचे एका दिवसात ९०,८०२ रुग्ण समोर आले आहेत. हे रुग्ण २९ दिवसांत दुपट्ट झाले. ११० दिवसांत एक लाखांपर्यंत कोरोना संक्रमण झाले आहे.

काँग्रेसने एक व्हिडिओ जारी करून हे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला की, मोदी सरकार आणि भाजपचे नेते कोरोनाबद्दल किती गंभीर आहेत. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, कैलाश विजयवर्गीय, अर्जुन मेघवाल, भाजपचे खासदार वीरेंद्र सिंह, आरोग्य राज्यमंत्री अश्विनी चौबे, अनुराग शर्मा, साक्षी महाराज, अनिल विज या नेत्यांची नावे आणि त्यांची वक्तव्ये या व्हिडिओमध्ये आहेत. कोणी शाकाहारी व्हा असा सल्ला देत आहे. पक्षाचे नेते राहुल गांधी यांच्यासह पक्षाच्या नेत्यांनी मोदी सरकार कोरोनाबाबत गंभीर नसल्यामुळे लोकांनी स्वत:ची काळजी घ्यावी, असे आवाहन केले. सरकार कोणाचा सल्ला घेत आहे ना कोणाशी संवाद साधत आहे, असेही त्यात म्हटले.

टॅग्स :congressकाँग्रेसSonia Gandhiसोनिया गांधीRahul Gandhiराहुल गांधी