शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
2
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
3
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
4
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
5
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
6
"राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; काँग्रेसची भूमिका भारत जोडोची’’, हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया
7
भारताने केलेला ड्रोन हल्ला का रोखला नाही? पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांचं संसदेत अजब उत्तर, म्हणाले...  
8
Jalgaon Accident: भरधाव टिप्परची दुचाकीला धडक; आजी- आजोबांच्या डोळ्यांदेखत दोन नातवंडांचा मृत्यू
9
अक्षय केळकरनं १० वर्षांच्या रिलेशनशिपनंतर 'रमा'सोबत थाटला संसार, पहिला फोटो आला समोर
10
भारत-पाक संघर्षादरम्यान 'या' ड्रोन उत्पादक कंपनीच्या शेअर्सला अपर सर्कीट; तुमच्याकडे आहे का?
11
“भविष्यात STच्या नव्या बसेस हायब्रीड इंधनावर, डिझेलच्या पर्यायांचा विचार आवश्यक”: सरनाईक
12
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
13
Mumbai: पिझ्झा देण्याच्या बहाण्याने घरी नेले आणि...; आठ वर्षाच्या चिमुकलीसोबत शेजाऱ्याचे संतापजनक कृत्य
14
भारत-पाक संघर्षाचा बाजारावर दबाव! आठवड्यात ३ टक्के घसरण; फक्त 'या' सेक्टरमध्ये तेजी
15
भारत-पाक तणावादरम्यान एअरटेलच्या अध्यक्षांचा मोठा निर्णय, चिनी कंपनीतील हिस्सा खरेदी करणार
16
IPL 2025: आयपीएल रद्द होणार की, उर्वरित सामनेही खेळवले जाणार? बीसीसीआयनं घेतला 'हा' निर्णय
17
India Pakistan: एटीएम २-३ दिवस बंद राहणार? व्हायरल मेसेजबद्दल सरकारने केला खुलासा
18
महामृत्युंजय मंत्र कधी व कोणासाठी म्हणावा? त्यामुळे नेमका कसा लाभ होतो? जाणून घ्या!
19
Operation Sindoor Live Updates: राज्यांना आपत्कालीन अधिकारांचा वापर करण्याची परवानगी, गृह मंत्रालयाचा निर्णय
20
हा दिग्गज १०८ अब्ज डॉलर्सची संपत्ती दान करणार; ठरणार आजवरचं सर्वात मोठं परोपकारी कार्य

उपचारातील फरक हा निष्काळजीपणा नाही

By admin | Updated: January 29, 2015 23:17 IST

हायकोर्टाचा निर्णय : वेगवेगळी असू शकतात डॉक्टरांची मते

हायकोर्टाचा निर्णय : वेगवेगळी असू शकतात डॉक्टरांची मते

नागपूर : रुग्णाच्या आजारासंदर्भात दोन डॉक्टरांची वेगवेगळी मते असू शकतात व त्यांच्या उपचार करण्याच्या पद्धतीतही फरक असू शकतो असे स्पष्ट करून याला वैद्यकीय निष्काळजीपणा म्हणता येणार नाही असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांनी दिला आहे.
एक व्यावसायिक म्हणून डॉक्टरांना रुग्णाची तपासणी केल्यानंतर स्वत:चे मत ठरविण्याचा अधिकार आहे. परंतु, हे मत वस्तुनिष्ठ बाबींवर आधारित नसेल किंवा त्याकडे दुर्लक्ष केल्या गेले असेल व यामुळे काही नुकसान झाल्यास डॉक्टरवर निष्काळजीपणासाठी फौजदारी कारवाई केली जाऊ शकते. कोणते प्रकरण फौजदारी निष्काळजीपणाचे आहे व कोणते नाही हे त्या-त्या प्रकरणातील तथ्ये व परिस्थितीवर अवलंबून असते, असे मत न्यायालयाने निर्णयात नोंदविले आहे.
गौतम सदाशिव (ता. अचलपूर) यांची पत्नी शीला यांचा चार डॉक्टरांकडे उपचार केल्यानंतर मृत्यू झाला होता. शीला यांना रक्ताचा कर्करोग होता. याप्रकरणी गौतम यांनी सुरुवातीला परतवाडा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली होती. पोलिसांनी आरोपींविरुद्ध दोषारोपपत्र दाखल केले नाही. यामुळे त्यांनी दोषी डॉक्टरांविरुद्ध भादंविच्या कलम ३०४-अ (निष्काळजीपणामुळे मृत्यू) अंतर्गत कारवाई करण्यासाठी अचलपूर येथील प्रथम श्रेणी न्यायादंडाधिकारी न्यायालयात तक्रार दाखल केली. १९ जून २०१० रोजी ही तक्रार फेटाळण्यात आली. यानंतर त्यांनी सत्र न्यायालयात पुनर्विचार अर्ज दाखल केला. १९ जानेवारी २०१३ रोजी सत्र न्यायालयाने प्रथम श्रेणी न्यायादंडाधिकारी न्यायालयाचा आदेश कायम ठेवला. या दोन्ही निर्णयांना गौतम यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. उच्च न्यायालयाने वैद्यकीय तज्ज्ञ मंडळाच्या अहवालासह विविध बाबी लक्षात घेता वरीलप्रमाणे निरीक्षण नोंदवून याचिका खारीज केली.