शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

खरेच फ्लाइंग किस दिले का? भाजपच्या २२ महिला खासदारांची लोकसभा अध्यक्षांकडे तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2023 06:20 IST

भाजप खासदार हेमा मालिनी यांनी संसदेत असे काही झालेच नसल्याचे सांगत स्मृती इराणींच्या दाव्यातील हवाच काढली. 

- संजय शर्मालोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी संसदेत फ्लाइंग किस देण्याचा आरोप करत भाजपच्या २२ महिला खासदारांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे पत्राद्वारे तक्रार केली आहे. यामुळे राहुल गांधी यांचे खरे चरित्र बाहेर आले, असे भाजप नेत्यांनी म्हटले आहे. मात्र भाजप खासदार हेमा मालिनी यांनी संसदेत असे काही झालेच नसल्याचे सांगत स्मृती इराणींच्या दाव्यातील हवाच काढली. 

काँग्रेस म्हणते...काँग्रेसच्या नेत्यांनी सांगितले की, राहुल गांधी यांनी कोणालाही फ्लाइंग किस दिलेले नाही. त्यांच्या हातून काही कागदपत्रे पडली होती. ती उचलत असताना त्यांच्या हाताकडे पाहून असे वाटले असावे. तसेही भाजपचे सरकार राहुल गांधी यांना संसदेत पाहू इच्छित नाही. 

 

मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित व्हावीमणिपूरमध्ये महिलांवर झालेले अत्याचार अत्यंत वेदनादायी आहे. सरकारने तातडीने लक्ष घालून तिथे शांतता प्रस्थापित करण्यासाठी पुढाकार घ्यावा. तेथील हिंसाचार थांबायला हवा, महिलांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण व्हायला हवे. मणिपूर लहान राज्य असले तरी तो देशाचा अविभाज्य भाग आहे. राजकारण बाजूला ठेवून सरकारने तिथे शांतता प्रस्थापित करावी.

पंतप्रधानांना हटवणे सोपी गोष्ट नाहीकेंद्रातील मोदी सरकारने शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात मदत केली. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशातील १४० कोटी लोकांच्या हृदयात आहे. विरोधकांनी कितीही प्रयत्न केले, तरी मोदींचे काहीही बिघडवू शकत नाही. त्यांना हटवणे सोपी गोष्ट नाही. जनता दल, राष्ट्रीय जनता दलात केवळ घराणेशाहीलाच प्राधान्य दिले जात असल्याने मी त्यांना रामराम ठोकला.

त्यांना माहिती आहे काही फायदा नाही, तरीही...विरोधकांनी आणलेला अविश्वास प्रस्ताव हा आधारहीन असल्याची जाणीव त्यांनाही आहे. २०१८ मध्येही विरोधकांनी निवडणुकीच्या एक वर्षापूर्वी अविश्वास प्रस्ताव आणला होता. यावेळीही तेच झाले आहे. निवडणुकीपूर्वी अविश्वास प्रस्ताव आणून आगामी निवडणुकीत फायदा होईल, असे विरोधकांना वाटते, पण ते अशक्य आहे.

आज मणिपूर जळतेय, उद्या संपूर्ण ईशान्य जळेल मणिपूरमध्ये उद्भवलेली परिस्थिती अत्यंत भयावह आहे. तुम्ही मणिपूरच्या मुद्द्याला सहजतेने घेऊ शकत नाही. सरकारला अद्याप तेथील गांभीर्य कळालेच नाही. आम्ही तेथील परिस्थिती पाहून आलोय. आज मणिपूर जळत आहे, उद्या मिझोरम जळेल, परवा नागालँड जळेल आणि त्याचा परिणाम संपूर्ण ईशान्य भारतावर होईल.

डबल इंजिन सरकार फेल ठरलेतीन महिन्यांपासून मणिपूर धगधगत असताना केंद्र सरकार एवढे शांत का आहे? तेथील प्रश्न सोडवण्यासाठी ते पुढाकार का घेत नाही. मणिपूरमधील डबल इंजिन सरकार परिस्थिती हाताळण्यात अपयशी ठरले आहे. शासकीय शस्रागारातून शस्त्रास्त्रे चोरली जात असताना राज्य सरकार काय करत आहे? केंद्रानेही त्याकडे दुर्लक्ष करून त्यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.

न्यायालयाने हस्तक्षेप केल्यावर तरी जागे व्हा  मणिपूरमधील हिंसाचार रोखण्यासाठी सरकार इतके अपयशी ठरले, की कोर्टाला हस्तक्षेप करावा लागला. ही गोष्ट तुमच्यासाठी लाजिरवाणी नाही का? किमान आता तरी जागे व्हा. तीन महिन्यांपासून तेथे खून, बलात्कार, हिंसाचार होत आहे. मणिपूरमध्ये लोकसंख्येच्या तुलनेत अधिक सुरक्षादले तैनात केले असतानाही तेथील परिस्थिती नियंत्रणात आलेली नाही.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीParliamentसंसदMonsoon Session Of Parliamentसंसेदेचे पावसाळी अधिवेशनNo Confidence motionअविश्वास ठराव