शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

खरेच फ्लाइंग किस दिले का? भाजपच्या २२ महिला खासदारांची लोकसभा अध्यक्षांकडे तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2023 06:20 IST

भाजप खासदार हेमा मालिनी यांनी संसदेत असे काही झालेच नसल्याचे सांगत स्मृती इराणींच्या दाव्यातील हवाच काढली. 

- संजय शर्मालोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी संसदेत फ्लाइंग किस देण्याचा आरोप करत भाजपच्या २२ महिला खासदारांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे पत्राद्वारे तक्रार केली आहे. यामुळे राहुल गांधी यांचे खरे चरित्र बाहेर आले, असे भाजप नेत्यांनी म्हटले आहे. मात्र भाजप खासदार हेमा मालिनी यांनी संसदेत असे काही झालेच नसल्याचे सांगत स्मृती इराणींच्या दाव्यातील हवाच काढली. 

काँग्रेस म्हणते...काँग्रेसच्या नेत्यांनी सांगितले की, राहुल गांधी यांनी कोणालाही फ्लाइंग किस दिलेले नाही. त्यांच्या हातून काही कागदपत्रे पडली होती. ती उचलत असताना त्यांच्या हाताकडे पाहून असे वाटले असावे. तसेही भाजपचे सरकार राहुल गांधी यांना संसदेत पाहू इच्छित नाही. 

 

मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित व्हावीमणिपूरमध्ये महिलांवर झालेले अत्याचार अत्यंत वेदनादायी आहे. सरकारने तातडीने लक्ष घालून तिथे शांतता प्रस्थापित करण्यासाठी पुढाकार घ्यावा. तेथील हिंसाचार थांबायला हवा, महिलांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण व्हायला हवे. मणिपूर लहान राज्य असले तरी तो देशाचा अविभाज्य भाग आहे. राजकारण बाजूला ठेवून सरकारने तिथे शांतता प्रस्थापित करावी.

पंतप्रधानांना हटवणे सोपी गोष्ट नाहीकेंद्रातील मोदी सरकारने शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात मदत केली. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशातील १४० कोटी लोकांच्या हृदयात आहे. विरोधकांनी कितीही प्रयत्न केले, तरी मोदींचे काहीही बिघडवू शकत नाही. त्यांना हटवणे सोपी गोष्ट नाही. जनता दल, राष्ट्रीय जनता दलात केवळ घराणेशाहीलाच प्राधान्य दिले जात असल्याने मी त्यांना रामराम ठोकला.

त्यांना माहिती आहे काही फायदा नाही, तरीही...विरोधकांनी आणलेला अविश्वास प्रस्ताव हा आधारहीन असल्याची जाणीव त्यांनाही आहे. २०१८ मध्येही विरोधकांनी निवडणुकीच्या एक वर्षापूर्वी अविश्वास प्रस्ताव आणला होता. यावेळीही तेच झाले आहे. निवडणुकीपूर्वी अविश्वास प्रस्ताव आणून आगामी निवडणुकीत फायदा होईल, असे विरोधकांना वाटते, पण ते अशक्य आहे.

आज मणिपूर जळतेय, उद्या संपूर्ण ईशान्य जळेल मणिपूरमध्ये उद्भवलेली परिस्थिती अत्यंत भयावह आहे. तुम्ही मणिपूरच्या मुद्द्याला सहजतेने घेऊ शकत नाही. सरकारला अद्याप तेथील गांभीर्य कळालेच नाही. आम्ही तेथील परिस्थिती पाहून आलोय. आज मणिपूर जळत आहे, उद्या मिझोरम जळेल, परवा नागालँड जळेल आणि त्याचा परिणाम संपूर्ण ईशान्य भारतावर होईल.

डबल इंजिन सरकार फेल ठरलेतीन महिन्यांपासून मणिपूर धगधगत असताना केंद्र सरकार एवढे शांत का आहे? तेथील प्रश्न सोडवण्यासाठी ते पुढाकार का घेत नाही. मणिपूरमधील डबल इंजिन सरकार परिस्थिती हाताळण्यात अपयशी ठरले आहे. शासकीय शस्रागारातून शस्त्रास्त्रे चोरली जात असताना राज्य सरकार काय करत आहे? केंद्रानेही त्याकडे दुर्लक्ष करून त्यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.

न्यायालयाने हस्तक्षेप केल्यावर तरी जागे व्हा  मणिपूरमधील हिंसाचार रोखण्यासाठी सरकार इतके अपयशी ठरले, की कोर्टाला हस्तक्षेप करावा लागला. ही गोष्ट तुमच्यासाठी लाजिरवाणी नाही का? किमान आता तरी जागे व्हा. तीन महिन्यांपासून तेथे खून, बलात्कार, हिंसाचार होत आहे. मणिपूरमध्ये लोकसंख्येच्या तुलनेत अधिक सुरक्षादले तैनात केले असतानाही तेथील परिस्थिती नियंत्रणात आलेली नाही.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीParliamentसंसदMonsoon Session Of Parliamentसंसेदेचे पावसाळी अधिवेशनNo Confidence motionअविश्वास ठराव