शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
5
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
6
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
7
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
8
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
9
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
10
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
11
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
12
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
13
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
14
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
15
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
16
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
17
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
19
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया

"अटलजींच्या काळात लोकशाही पाहिली आता देश मोदींची हुकूमशाही अनुभवतोय", शत्रुघ्न सिन्हा बरसले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2022 21:22 IST

पश्चिम बंगालमध्ये पोटनिवडणुकीच्या रणधुमाळीत तृणमूल काँग्रेसचे नेते आणि अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

नवी दिल्ली- 

पश्चिम बंगालमध्ये पोटनिवडणुकीच्या रणधुमाळीत तृणमूल काँग्रेसचे नेते आणि अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. सिन्हा यांनी मोदी सरकारवर पेट्रोल-डिझेल आणि घरगुती गॅसच्या दरवाढीवरुन निशाणा साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार अहंकारी आणि हुकुमशाही सरकार असल्याचं म्हटलं आहे. 

सिन्हा यांनी यावेळी दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या आठवणी जागवल्या. "अटल बिहारी वाजपेयींच्या काळात आपण लोकशाही पाहिली आणि आता मोदींच्या काळात हुकुमशाहीचा अनुभव घेत आहोत", असं शत्रुघ्न सिन्हा म्हणाले. सिन्हा यांनी याआधी भाजपा आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांसोबत काम केलं आहे. तसंच वाजपेयींच्या काळात ते केंद्रीय मंत्री देखील राहिले आहेत. 

अभिनेते शत्रुघ्न सिन्हा १२ एप्रिल रोजी आसनसोलमधून तृणमूलच्या तिकिटावर पश्चिम बंगालची पोटनिवडणूक लढवत आहेत. "आपल्या मनाला येईल ते करायचं अशी हुकुमशाही प्रवृत्तीचं मोदी सरकार काम करत आहे. हे सरकार अहंकारी सरकार आहे", असं सिन्हा म्हणाले. "नऊ दिवसांत आठ वेळा इंधनाचे दर वाढवले हा अहंकारच आहे. तुम्ही याआधी कधी ऐकलं आहे का डिझेल आणि पेट्रोलचे दर नऊ दिवसांत आठ वेळा वाढले आहेत?", असंही ते म्हणाले. 

पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आज प्रत्येकी ८० पैशांनी वाढ झाली असून, गेल्या १० दिवसांत इंधनाच्या दरांमध्ये एकूण वाढ ६.४० रुपये प्रति लीटर वाढ झाली आहे. 

टॅग्स :Shatrughan Sinhaशत्रुघ्न सिन्हाNarendra Modiनरेंद्र मोदीwest bengalपश्चिम बंगाल