शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

हृदयस्पर्शी! मुलगा गेल्यावर सासू-सासऱ्यांनी लावलं सुनेचं दुसरं लग्न; केलं कन्यादान, बंगला दिला भेट 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2022 11:35 IST

युग प्रकाश तिवारी यांनी समाजासमोर एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. त्यांनी आपल्या विधवा सुनेचं लग्न लावून दिलं. तसेच तिचे कन्यादान केले.

नवी दिल्ली - मध्य प्रदेशच्या धारमध्ये एक हृदयस्पर्शी घटना समोर आली आहे. सासू-सासऱ्यांनी आई-वडील होऊन सुनेचे कन्यादान केल्याची घटना समोर आली आहे. त्यांच्या मुलाचा कोरोना काळात मृत्यू झाला होता. त्यानंतर घरात विधवा सून आणि तिची मुलगी होती. यावेळी सासू-सासऱ्यांनी सूनेचा एकटेपणा आणि तिचे दु:ख समजून घेतले. आयुष्याचा प्रवास एकट्याने होऊ शकत नाही म्हणून तिच्यासाठी जीवनसाथी शोधण्याचा निर्णय घेतला. यानंतर तिचं लग्न लावून देत आशीर्वाद दिले.

धार येथील युग प्रकाश तिवारी यांनी समाजासमोर एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. त्यांनी आपल्या विधवा सुनेचं लग्न लावून दिलं. तसेच तिचे कन्यादान केले. एवढच नव्हे तर तिला राहण्यासाठी एक बंगला देखील भेट दिला. युग प्रकाश तिवारी आणि त्यांची पत्नी रागिनी तिवारी यांचे आयुष्य आनंदात सुरू होते. घरात दोन मुलं, सून, नात होते. मात्र, कोरोनाकाळात त्यांच्या आनंदाला ग्रहण लागल. त्यांचा लहान मुलगा प्रियंक तिवारी याचा मृत्यू झाला. त्यानंतर घरात विधवा सून ऋचा आणि नात होती. मुलाच्या मृत्यूनंतर त्याचं हसतं खेळतं घर उद्ध्वस्त झालं.

प्रियंक हा सॉफ्टवेअर इंजीनिअर होता. तो भोपाळ येथे मंडी दीपमध्ये एका चांगल्या कंपनीत नोकरीला होता. त्याचे वय फक्त 34 वर्ष होते. मात्र, कोरोनाकाळात त्याचा मृत्यू झाला. यानंतर तिवारी कुटुंबावर तर आभाळ कोसळलं. यातून ते कसेबसे सावरले. मात्र, पुढे प्रश्न होता तो विधवा सून आणि नातीचा. त्यांनी सुनेचं लग्न लावून तिने नवीन आयुष्य सुरू करावं, असा निर्णय घेतला. यानंतर त्यांनी तिच्यासाठी एक नागपूर येथील वरुण मिश्रा याच्या रुपात एक चांगले स्थळ शोधले. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर ऋचा हिचे लग्न आणि कन्यादान करुन तिची पाठवणी केली. प्रियंकने घर खरेदी केले होते. तिवारी परिवाराने ते घर ऋचाला लग्नात भेट म्हणून देऊन दिलं.

युग प्रकाश तिवारी आणि त्यांची पत्नी रागिनी या दोघांसाठी आपल्या विधवा सुनेचं लग्न पुन्हा लावून देणं सोपं नव्हतं. आधी त्यांनी आपल्या मुलाला गमावलं आणि नंतर सुनेलासुद्धा आपल्यापासून वेगळे करणं सोपं नव्हतं. रागिनी तिवारी म्हणाल्या की, ऋचा खूप चांगली आहे. आम्ही तिला मुलगी मानले आहे. मुलगी मानले म्हणूनच तिचा आणि नातीच्या भविष्याचा विचार करत तिचं लग्न लावून देण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच त्यांनी समाजालाही आवाहन केले आहे की, आपल्या सुनेला मुलीसारखे प्रेम द्यावे. हुंड्यासाठी तिचा छळ करू नका. प्रियंकचा मोठा भाऊ मयंक तिवारी यांनी आपल्या छोट्या भावाच्या आठवणीत पुस्तकाच्या रुपात साठवल्या आहेत. त्यांनी प्रियंकच्या आयुष्यावर पुस्तक लिहिले आहे. या पुस्तकाचे नाव जीवन का मानचित्र असं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

 

टॅग्स :marriageलग्न