शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

कटू सत्य ऐकण्याची सवय करा; स्वामींचा मोदींना सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2019 10:08 IST

अर्थव्यवस्थेच्या स्थितीवरुन थेट पंतप्रधानांवर निशाणा

मुंबई: कटू सत्य ऐकण्याची तयारी ठेवा आणि प्रशासनातील अर्थतज्ज्ञांना घाबरवणं सोडा, अशा शब्दांमध्ये भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना घरचा अहेर दिला आहे. देश आणि अर्थव्यवस्था चालवायची असल्यास ऐकून घेण्याची वृत्ती असायला हवी. मात्र मोदींनी अद्याप तशी सवय करुन घेतलेली नाही, असं स्वामी म्हणाले. स्वामी यांनी याआधीही देशातील अर्थव्यवस्थेवरुन मोदी सरकारला लक्ष्य केलं आहे. 'मोदींच्या कामाची पद्धत पाहता खूपच कमी व्यक्ती त्यांच्यासमोर बोलू शकतात. त्यांच्यासोबत काम करणाऱ्या व्यक्तींना मनमोकळेपणानं त्यांचे विचार मांडता यावेत यासाठी प्रोत्साहन द्यायला हवं. मात्र अद्याप मोदींनी अशी सवय लावून घेतलेली नाही,' अशा शब्दांमध्ये स्वामींनी मोदींच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली. देशाची अर्थव्यवस्था मंदीसदृश्य अवस्थेतून जात असताना स्वामींनी मोदींवर निशाणा साधला आहे. अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी मोदी सरकारनं कॉर्पोरेट करात कपात केली आहे. याशिवाय आणखीही पावलं उचलली आहेत. मात्र अद्याप याचे परिणाम अर्थव्यवस्थेवर दिसलेले नाहीत.नोटबंदी आणि घाई गडबडीत लागू करण्यात आलेला वस्तू आणि सेवा कर अर्थव्यवस्थेतील मंदीला कारणीभूत असल्याचं स्वामी म्हणाले. रिझर्व्ह बँक आणि अर्थ मंत्रालय नेमक्या समस्यांवर काम करत नसल्यानं अर्थव्यवस्थेसमोरील संकट अधिक गहिरं होत असल्याचंही ते म्हणाले. 'अर्थव्यवस्थेला संकटातून बाहेर काढण्यासाठी त्रिस्तरीय प्रयत्नांची आवश्यकता आहे. अर्थव्यवस्थेची स्थिती सुधारण्यासाठी अल्प, मध्यम आणि दीर्घ काळासाठी स्वतंत्र धोरणं आखायला हवीत. मात्र सध्या अशी कोणतीही धोरणं अस्तित्वात नाहीत. पंतप्रधानांना अर्थव्यवस्थेची सद्यस्थिती सांगण्याची हिंमत प्रशासनातील एकही अर्थतज्ज्ञ करत नसेल. कारण मोदींना कटू सत्य ऐकण्याची सवय नाही,' असं स्वामी यांनी म्हटलं. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीSubramanian Swamyसुब्रहमण्यम स्वामीEconomyअर्थव्यवस्थाGSTजीएसटीDemonetisationनिश्चलनीकरण