शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

कर्नाटकमध्ये देवेगौडांना मुलाऐवजी खरगे हवे होते मुख्यमंत्री; पण काँग्रेसनेच नाकारले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2019 14:59 IST

राज्यातील सरकारला आमच्याकडून काहीही धोका नाही. परंतु, सरकार किती दिवस टीकेल हे मी सांगू शकत नाही. सरकार टिकवने कुमारस्वामीच्या हातात नसून काँग्रेसच्या हातात आहे.

नवी दिल्ली - माजी पंतप्रधान आणि जनता दल धर्मनिरपेक्ष पक्षाचे प्रमुख एच.डी. देवेगौडा यांनी कर्नाटक सरकार धोक्यात असल्याचे म्हटले. राज्य सरकारमधील भागीदार असलेल्या काँग्रेसच्या वागण्यावरून कर्नाटकमधील सरकार किती दिवस टिकेल हे सांगू शकत नाही, असंही देवेगौडा म्हणाले. यावेळी देवेगौडा यांनी धक्कादायक खुलासा केला असून काँग्रेसनेच मल्लिकार्जुन खरगे यांच्याऐवजी कुमारस्वामीला यांनाच मुख्यमंत्री करा असं म्हटल्याचे त्यांनी सांगितले.

देवेगौडा म्हणाले की, जेडीएस-काँग्रेसची युती व्हावी अशी इच्छा मी कधीही व्यक्त केली नव्हती. मी आजही हेच म्हणतोय आणि उद्याही म्हणेल. खुद्द काँग्रेसने आमच्याकडे येऊन तुमचा मुलगा मुख्यमंत्री होणार, काहीही होवो, असं सांगितले. परंतु, त्यावेळी मला हे ठावूक नव्हते की, काँग्रेसच्या नेत्यांमध्ये ताळमेळ नाही.

राज्यातील सरकारला आमच्याकडून काहीही धोका नाही. परंतु, सरकार किती दिवस टीकेल हे मी सांगू शकत नाही. सरकार टिकवने कुमारस्वामीच्या हातात नसून काँग्रेसच्या हातात आहे. आम्ही कॅबिनेटमधील एक जागा त्यांना दिली आहे. त्यांनी जे सांगितलं, ते आम्ही केलं. मात्र मध्यवधी निवडणूक होणार यात शंका नाही. काँग्रेसकडून ५ वर्षे पाठिंबा देण्याचे वचन देण्यात आले तरी जनता सर्वकाही पाहात असल्याची टीका देखील देवेगौडा यांनी केली.

दरम्यान देवेगौडा म्हणाले की, विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर माजी मुख्यमंत्री सिद्धरमया, मुल्लिकार्जुन खरगे, मुनियप्पा आणि परमेश्वर आपल्याकडे आले होते. मी त्यांना स्पष्ट सांगितले होते की, खरगेंना मुख्यमंत्री करा. त्यावर खरगे म्हणाले होते की, काँग्रेस हायकमानने सांगितल्यास आपण तयार आहोत. त्यानंतर मी किर्ती आजाद यांचा फोन घेत राहुल यांच्याशी चर्चा करून खरगेंना मुख्यमंत्री करण्याचे सुचवले. त्यावर राहुल यांनी कुमारस्वामी यांनाच मुख्यमंत्री करा, असं सांगितले. त्यानंतर आपण कुमारस्वामींना मुख्यमंत्री केल्याचे देवेगौडा म्हणाले.