शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
3
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
4
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
5
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
6
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
7
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
8
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
9
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
10
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
11
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
12
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
13
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
14
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
15
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
16
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
17
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
18
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
19
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
20
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त

कर्नाटकमध्ये देवेगौडांना मुलाऐवजी खरगे हवे होते मुख्यमंत्री; पण काँग्रेसनेच नाकारले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2019 14:59 IST

राज्यातील सरकारला आमच्याकडून काहीही धोका नाही. परंतु, सरकार किती दिवस टीकेल हे मी सांगू शकत नाही. सरकार टिकवने कुमारस्वामीच्या हातात नसून काँग्रेसच्या हातात आहे.

नवी दिल्ली - माजी पंतप्रधान आणि जनता दल धर्मनिरपेक्ष पक्षाचे प्रमुख एच.डी. देवेगौडा यांनी कर्नाटक सरकार धोक्यात असल्याचे म्हटले. राज्य सरकारमधील भागीदार असलेल्या काँग्रेसच्या वागण्यावरून कर्नाटकमधील सरकार किती दिवस टिकेल हे सांगू शकत नाही, असंही देवेगौडा म्हणाले. यावेळी देवेगौडा यांनी धक्कादायक खुलासा केला असून काँग्रेसनेच मल्लिकार्जुन खरगे यांच्याऐवजी कुमारस्वामीला यांनाच मुख्यमंत्री करा असं म्हटल्याचे त्यांनी सांगितले.

देवेगौडा म्हणाले की, जेडीएस-काँग्रेसची युती व्हावी अशी इच्छा मी कधीही व्यक्त केली नव्हती. मी आजही हेच म्हणतोय आणि उद्याही म्हणेल. खुद्द काँग्रेसने आमच्याकडे येऊन तुमचा मुलगा मुख्यमंत्री होणार, काहीही होवो, असं सांगितले. परंतु, त्यावेळी मला हे ठावूक नव्हते की, काँग्रेसच्या नेत्यांमध्ये ताळमेळ नाही.

राज्यातील सरकारला आमच्याकडून काहीही धोका नाही. परंतु, सरकार किती दिवस टीकेल हे मी सांगू शकत नाही. सरकार टिकवने कुमारस्वामीच्या हातात नसून काँग्रेसच्या हातात आहे. आम्ही कॅबिनेटमधील एक जागा त्यांना दिली आहे. त्यांनी जे सांगितलं, ते आम्ही केलं. मात्र मध्यवधी निवडणूक होणार यात शंका नाही. काँग्रेसकडून ५ वर्षे पाठिंबा देण्याचे वचन देण्यात आले तरी जनता सर्वकाही पाहात असल्याची टीका देखील देवेगौडा यांनी केली.

दरम्यान देवेगौडा म्हणाले की, विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर माजी मुख्यमंत्री सिद्धरमया, मुल्लिकार्जुन खरगे, मुनियप्पा आणि परमेश्वर आपल्याकडे आले होते. मी त्यांना स्पष्ट सांगितले होते की, खरगेंना मुख्यमंत्री करा. त्यावर खरगे म्हणाले होते की, काँग्रेस हायकमानने सांगितल्यास आपण तयार आहोत. त्यानंतर मी किर्ती आजाद यांचा फोन घेत राहुल यांच्याशी चर्चा करून खरगेंना मुख्यमंत्री करण्याचे सुचवले. त्यावर राहुल यांनी कुमारस्वामी यांनाच मुख्यमंत्री करा, असं सांगितले. त्यानंतर आपण कुमारस्वामींना मुख्यमंत्री केल्याचे देवेगौडा म्हणाले.