शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

लसीकरणासाठी सरकारचे प्रयत्न तरी लोक उदासीन; ६० टक्के लोकांना लसीची घाई नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2021 01:14 IST

६० टक्के लोकांना लसीची घाई नाही

नितीन अग्रवालनवी  दिल्ली : कोरोना विषाणूला राेखण्यासाठी सरकारने लसीकरणाची मोठी योजना बनवली असली तरी लोकांचा तेवढा प्रतिसाद नाही.ऑनलाईन प्लॅटफॉर्म लोकल पाहणीत ६० टक्के लोकांनी स्पष्ट केले की, आम्ही कोरोना लस घेण्याची घाई करणार नाही. पाहणीत सहभागी २६२ जिल्ह्यांतील जवळपास २५ हजार लोकांपैकी जवळपास १५ हजार जण जर येत्या दोन महिन्यांत लस उपलब्ध झाली तरी ती घेण्यास प्राधान्य देणार नाहीत. येथील सफदरजंग रुग्णालयाच्या भगवान महावीर मेडिकल कॉलेजच्या कम्युनिटी मेडिसन विभागाचे प्रमुख प्रो. डॉ. जुगल किशोर यांच्या देखरेखीत झालेल्या दुसऱ्या एका पाहणीचे निष्कर्षही मिळतेजुळते आहेत.

डॉ. जुगल किशोर यांनी‘लोकमत’ ला सांगितले की, पाहणीत ४० टक्के लोक त्यांच्या मुलांना सध्याच लस देण्यास तयार नाहीत. २९ टक्क्यांपेक्षा जास्त लोक स्वत: लस घेण्यास तयार नाहीत. ते म्हणाले, एखादी लस इतक्या कमी वेळेत तयार होण्याची ही पहिली वेळ आहे. खूपच मर्यादित वेळेत व मर्यादित शोधाच्या आधारावर लसीला मंजुरी मिळाल्यामुळे तिच्या विश्वासार्हता लोकांचा विश्वास नाही.

अखिल भारत हिंदू महासभेचे स्वामी चक्रपाणी यांनी म्हटले की, सरकारने हे स्पष्ट करावे की, लसीत गायीचे रक्त वापरले का किंवा हिंदू सनातन धर्माच्या भावनांना तडा जाईल अशा तत्वाचा वापर केला गेला आहे का? याबाबत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना निवेदन दिल्याचा दावा त्यांनी केला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारत