शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

४० कोटी लोकांच्या खात्यांमध्ये ३४,८०० कोटी रुपये जमा केले; राहुल गांधी यांच्या आरोपांना भाजपचे उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2020 06:52 IST

लॉकडाऊनमध्ये सरकारने गरिबांच्या हितासाठी सुमारे ४० कोटी लोकांच्या खात्यांमध्ये विविध योजनांच्या माध्यमातून ३४,८०० कोटी रुपये जमा केले आहेत.

- नितीन अग्रवालनवी दिल्ली : लोकांच्या खात्यांमध्ये थेट रक्कम जमा करण्याच्या काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या मागणीला भाजपने उत्तर दिले आहे. पक्षाने म्हटले आहे की, काँग्रेस सरकारांनी जे मागील ७० वर्षांत केले नाही, ते मोदी सरकारने मागील ६ वर्षांत करून दाखवले आहे. लॉकडाऊनमध्ये सरकारने गरिबांच्या हितासाठी सुमारे ४० कोटी लोकांच्या खात्यांमध्ये विविध योजनांच्या माध्यमातून ३४,८०० कोटी रुपये जमा केले आहेत.भाजपचे राष्टÑीय प्रवक्ते संबित पात्रा यांनी पत्रकारांना सांगितले की, आर्थिक वादळ रोखण्यासाठी सरकारने व्यवस्था केली आहे. काँग्रेसच्या कार्यकाळात भ्रष्टाचाराची त्सुनामी होती. मोदी सरकारने भ्रष्टाचाराची सफाई केली आहे. तेव्हा १ रुपयामधील केवळ १५ पैसेच गरिबांच्या हातात पोहोचत होते व ८५ पैसे मधले लोक खात होते, अशी तेव्हा स्थिती होती. आता मात्र थेट लोकांच्या खिशात पैसा पोहोचत आहे.अर्थव्यवस्था सुरळीत करण्यासाठी व श्रमिकांच्या रोजगारासाठी २० लाख कोटी रुपयांची व्यवस्था करताना एमएसएमई, निर्माण क्षेत्रापासून ग्रामीण अर्थव्यवस्थेपर्यंत पैसे पोहोचवले आहेत.गरीब कुटुंबांना ३ सिलिंडर पोहोचवण्यात आले आहेत व तीन महिन्यांचे रेशन मोफत देण्यात आले आहे. याबरोबरच दोन महिन्यांचे रेशन आणखी देण्याचीही तयारी सुरू आहे.२०.०५ कोटी गरीब महिलांच्या जनधन खात्यांमध्ये १०,०२५ कोटी रुपये जमा केले. याचा दुसरा हप्ता जमा करण्यात आला आहे. ३ कोटी विधवा, वृद्ध व दिव्यांकांच्या खात्यांमध्ये १४०५ कोटी रुपये थेट जमा करण्यात आले.८.१९ कोटी शेतकऱ्यांनाही पीएम किसान योजनेंतर्गत थेट १६.३९४ कोटी रुपये देण्यात आले आहेत. निर्माण श्रमिकांच्या खात्यांमध्येही ३४९३ कोटी रुपये जमा केले आहेत. त्याचा लाभ २.५ कोटी लोकांना झाला.४५ लाख खाजगी क्षेत्रातील अतिरिक्त कर्मचाऱ्यांच्या ईपीएफओचा पहिला हप्ता जमा करण्यात आला. अशा प्रकारे ३९.२८ कोटी लोकांच्या खात्यांमध्ये ३४,८०० कोटी रुपये जमा करण्यात आले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याBJPभाजपाRahul Gandhiराहुल गांधी