शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायल-हमास शांतता करार: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा दोघांचीही सही मिळविली, युद्ध थांबणार?
2
पाकवर हल्ला कोणाच्या सांगण्यामुळे राेखला? पंतप्रधान नरेंद्र माेदी यांचा काॅंग्रेसला सवाल
3
उद्योगांवर विजेचा ‘गुपचुप’ हल्ला, राज्यात स्थिती आणखी बिकट; प्रति युनिट दर ११.१५ रुपयांवर 
4
वाहनचालकांनो सावधान! विना हेल्मेट, राँग साइड, प्रखर दिव्यांविरुद्ध कठोर कारवाई करा : सुप्रीम कोर्ट
5
इलेक्ट्रिक कार विक्रीत दुप्पट वाढ; सप्टेंबरमध्ये नवा विक्रम; १५ हजार इव्हींची विक्री
6
‘६० कोटी जमा करा, मग याचिकेवर विचार’; शिल्पा शेट्टीवर न्यायालय संतापले...
7
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाण कुणाचा? १२ नोव्हेंबरला सुनावणी   
8
भाजपकडून लोकप्रिय चेहऱ्यांना संधी; गायिका मैथिलीस पक्षाची उमेदवारी? डॅमेज कंट्रोल मोड ऑन
9
एक जीबी डेटा आता चहाच्या एका कपापेक्षाही स्वस्त झाला आहे : मोदी
10
प्रा. कितागावा, रॉबसन अन् याघी यांना नोबेल; मेटल-ऑर्गेनिक फ्रेमवर्कसाठी रसायनशास्त्रातील पुरस्कार 
11
भारताशी युद्ध झाल्यास आम्हीच बाजी मारणार; पाकचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची दर्पोक्ती
12
महिला विश्वचषक : ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला दिला धडा, मूनीचे निर्णायक शतक
13
जब गिल पर आया दिल, तो रोहित क्या चीज हैं !
14
महिला विश्वचषक : फलंदाजांना दाखवावा लागेल दम, आज दक्षिण आफ्रिकेच्या कडव्या आव्हानाचा करणार सामना
15
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
16
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
17
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
18
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
19
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
20
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या

४० कोटी लोकांच्या खात्यांमध्ये ३४,८०० कोटी रुपये जमा केले; राहुल गांधी यांच्या आरोपांना भाजपचे उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2020 06:52 IST

लॉकडाऊनमध्ये सरकारने गरिबांच्या हितासाठी सुमारे ४० कोटी लोकांच्या खात्यांमध्ये विविध योजनांच्या माध्यमातून ३४,८०० कोटी रुपये जमा केले आहेत.

- नितीन अग्रवालनवी दिल्ली : लोकांच्या खात्यांमध्ये थेट रक्कम जमा करण्याच्या काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या मागणीला भाजपने उत्तर दिले आहे. पक्षाने म्हटले आहे की, काँग्रेस सरकारांनी जे मागील ७० वर्षांत केले नाही, ते मोदी सरकारने मागील ६ वर्षांत करून दाखवले आहे. लॉकडाऊनमध्ये सरकारने गरिबांच्या हितासाठी सुमारे ४० कोटी लोकांच्या खात्यांमध्ये विविध योजनांच्या माध्यमातून ३४,८०० कोटी रुपये जमा केले आहेत.भाजपचे राष्टÑीय प्रवक्ते संबित पात्रा यांनी पत्रकारांना सांगितले की, आर्थिक वादळ रोखण्यासाठी सरकारने व्यवस्था केली आहे. काँग्रेसच्या कार्यकाळात भ्रष्टाचाराची त्सुनामी होती. मोदी सरकारने भ्रष्टाचाराची सफाई केली आहे. तेव्हा १ रुपयामधील केवळ १५ पैसेच गरिबांच्या हातात पोहोचत होते व ८५ पैसे मधले लोक खात होते, अशी तेव्हा स्थिती होती. आता मात्र थेट लोकांच्या खिशात पैसा पोहोचत आहे.अर्थव्यवस्था सुरळीत करण्यासाठी व श्रमिकांच्या रोजगारासाठी २० लाख कोटी रुपयांची व्यवस्था करताना एमएसएमई, निर्माण क्षेत्रापासून ग्रामीण अर्थव्यवस्थेपर्यंत पैसे पोहोचवले आहेत.गरीब कुटुंबांना ३ सिलिंडर पोहोचवण्यात आले आहेत व तीन महिन्यांचे रेशन मोफत देण्यात आले आहे. याबरोबरच दोन महिन्यांचे रेशन आणखी देण्याचीही तयारी सुरू आहे.२०.०५ कोटी गरीब महिलांच्या जनधन खात्यांमध्ये १०,०२५ कोटी रुपये जमा केले. याचा दुसरा हप्ता जमा करण्यात आला आहे. ३ कोटी विधवा, वृद्ध व दिव्यांकांच्या खात्यांमध्ये १४०५ कोटी रुपये थेट जमा करण्यात आले.८.१९ कोटी शेतकऱ्यांनाही पीएम किसान योजनेंतर्गत थेट १६.३९४ कोटी रुपये देण्यात आले आहेत. निर्माण श्रमिकांच्या खात्यांमध्येही ३४९३ कोटी रुपये जमा केले आहेत. त्याचा लाभ २.५ कोटी लोकांना झाला.४५ लाख खाजगी क्षेत्रातील अतिरिक्त कर्मचाऱ्यांच्या ईपीएफओचा पहिला हप्ता जमा करण्यात आला. अशा प्रकारे ३९.२८ कोटी लोकांच्या खात्यांमध्ये ३४,८०० कोटी रुपये जमा करण्यात आले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याBJPभाजपाRahul Gandhiराहुल गांधी