शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुलीला बाहेर काढण्यासाठी कानाखाली मारली"; अविनाश जाधवांनी मारहाण केल्याचे CCTV फुटेज समोर
2
काँग्रेसला आणखी एक धक्का! पक्षानं फंडिंग न दिल्यानं निवडणूक लढण्यास उमेदवाराचा नकार
3
"मोदींनी स्वतःचं कुटुंब तरी कुठं सांभाळलं"; शरद पवारांचा पंतप्रधानांवर पलटवार
4
Video - मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी महुआ मोइत्रांसोबत निवडणूक रॅलीत केला डान्स
5
'...तर आफ्रिकेत जाऊन मतं मागा, कोकणातील शेतकरी लोकप्रतिनिधींवर संतप्त', त्या बॅनरची चर्चा
6
"स्मृती इराणींना निवडणुकीनंतर गोव्यात पाठवणार, गांधी परिवार कोणाला घाबरत नाही"
7
EPF Claim: किती दिवसांत मिळतो EPFO कडून क्लेम? ईपीएफनं म्हटलं, कमीतकमी लागतात 'इतके' दिवस
8
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
9
'नाच गं घुमा'मध्ये नम्रताचं काम पाहून प्राजक्ता माळी भारावली, म्हणाली -"हास्यजत्रेत ती गेली साडेपाच वर्ष..."
10
रिकामे झाले, दुसरीकडे काम, भाजपचा फॉर्म्युला; अनेक नेत्यांना दुसऱ्या मतदारसंघात पाठवले
11
...म्हणून काँग्रेसने राहुल गांधींना अमेठी ऐवजी रायबरेलीतून दिली उमेदवारी, असं आहे मतांचं गणित
12
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
13
Sara Tendulkar : सारा तेंडुलकर आता कोरियन ब्युटी ब्रँडची ॲम्बेसेडर; कोणत्या प्रोडक्टची करणार जाहिरात?
14
राणीमुळे झाला होता करण-काजोलमध्ये टोकाचा वाद; 'कुछ कुछ होता हैं' च्या सेटवर झालेलं भांडण
15
संविधान बदलणार बाेलले अन् पक्षाने तिकीट कापले; विश्वेवर हेगडे-कागेरी यांना उमेदवारी
16
मोबाइल चोरी नाहीच; पण, मृत्यूचे गूढ कायम; विशाल पवार संशयास्पद मृत्यू प्रकरण
17
PPF Vs NPS: रिटायरमेंटसाठी कोणता प्लान ठरेल बेस्ट? 'हे' आहेत पीपीएफ आणि एनपीएसचे फायदे
18
एकनाथ खडसेंच्या प्रवेशाला विरोध कशाला असेल ? वार्तालापात विनाेद तावडे यांनी मांडली भूमिका
19
भाजप अन् काँग्रेससमोर ‘पिंचहिटर’चे आव्हान ; पठाणच्या ‘एन्ट्री’मुळे देशाच्या नजरा
20
९ मे रोजी सुरू होत आहे वैशाख मास; रखरखीत उन्हाळ्यातही तो का ठरतो खास? वाचा!

आर्थिक अस्पृश्यता मिटवा - पंतप्रधान मोदींचं आवाहन

By admin | Published: August 28, 2014 5:19 PM

महात्मा गांधींनी सामाजिक जीवनातून अस्पृश्यता मिटवण्याचं आवाहन केलं होतं, तर मी आज आर्थिक क्षेत्राला आवाहन करतो की आर्थिक अस्पृश्यता मिटवा आणि गरीबांना मुख्य आर्थिक प्रवाहात आणा.

ऑनलाइन लोकमत 
नवी दिल्ली, दि. २८ - महात्मा गांधींनी सामाजिक जीवनातून अस्पृश्यता मिटवण्याचं आवाहन केलं होतं, तर मी आज आर्थिक क्षेत्राला आवाहन करतो की आर्थिक अस्पृश्यता मिटवा आणि गरीबांना मुख्य आर्थिक प्रवाहात आणा. २६ जानेवारी पर्यंत साडेसात कोटी गरीबांना पंतप्रधान जन-धन योजनेमध्ये सहभागी करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले होते. आज या योजनेचे उद्गाटन करण्यात आले आणि पहिल्याच दिवशी एक कोटीपेक्षा जास्त गरीबांना बँक खाते व एक लाख रुपयाचा विमा देण्यात आला. यावेळी २६ जानेवारीपर्यंत खाते उघडणा-या गरीबांना ३० हजार रुपयाच्या अतिरिक्त विम्याचीही घोषणा केली. 
देशातील ४० टक्के  गरीब जनतेचे कोणत्याही बँकेत खाते नाही. त्यामुळे ही जनता अर्थव्यवस्थेच्या मुख्य प्रवाहात न आल्याने ख-या अर्थाने अस्पृश्य (अनटचेबल )असल्याचे मोदी म्हणाले. या गरीबांना जर आर्थिक प्रवाहात आणले तर गरीबी दूर करण्यास सहाय्य होईल असेही त्यांनी सांगितले. महिला दिवसभर कष्ट करतात व पैसे कमावतात, परंतु व्यसनी नवरा ते पैसे उडवील अशी भीती असते, असे सांगत आता या महिला बँकेत आपले पैसे सुरक्षित ठेवू शकतिल असे मोदी म्हणाले.
बँकिग क्षेत्रातला व आपला अनुभव सांगताना मोदी म्हणाले की श्रीमंत व्यक्तींच्या दारात बँका कर्ज देण्यासाठी जातात व कमी व्याजात कर्जवाटप करतात. त्याचवेळी गरीब मात्र सावकाराकडून पाचपट दराने कर्ज घ्यायला मजबूर होतात आणि शेवटी ते आत्महत्या करतात. त्यापढे जात गरीब व्यक्ती ९९ टक्के वेळा कर्ज बुडवत नाहीत, व ती महिला असेल तर १०० टक्के वेळा कर्ज बुडवत नाही असे सांगत बँकांची कर्जे श्रीमंतच बुडवतात असेही त्यांनी सांगितले.
गरीबांना आर्थिक मुख्य प्रवाहात आणण्यासाठी बँकांनी पुढाकार घ्यावा आणि आपले लक्ष्य २६ जानेवारीच्या आतच पूर्ण करावे अशी अपेक्षाही मोदींनी व्यक्त केली. पंतप्रधान जन धन योजना हे गरीबी हटविण्यासाठी उचलेलं पाऊल असून या योजनेमुळे देशातील आत्महत्या कमी होण्यास तसेच भ्रष्टाचार कमी होण्यास मदत होईल असे पंतप्रधान म्हणाले. या योजनेअंतर्गत बँकेत खाते उघडणा-या व्यक्तीस डेबीट कार्ड आणि एक लाख रूपयांचा विमा मिळणार आहे.