शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

हुमायूनचा मकबरा पाडून कब्रस्तान तयार करा, पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे शिया सेंट्रल वक्फ बोर्डाची पत्राद्वारे मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2017 09:44 IST

दिल्लीच्या कित्येक एकर जमिनीवर पसरलेल्या हुमायूनचा मकबरा पाडून त्याठिकाणी कब्रस्तान तयार केले जावे, अशी मागणी शिया सेंट्रल वक्फ बोर्डाने केली आहे.

नवी दिल्ली - दिल्लीच्या कित्येक एकर जमिनीवर पसरलेल्या हुमायूनचा मकबरा पाडून त्याठिकाणी कब्रस्तान तयार केले जावे, अशी मागणी शिया सेंट्रल वक्फ बोर्डाने केली आहे. यासाठी बोर्डाचे अध्यक्ष वसीम रिझवी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिले आहे. दिल्लीत मृतदेहांचे दफन करण्यासाठी जागा अपुरी पडत असल्याने हुमायूनचा मकबरा पाडण्यात यावा आणि त्याठिकाणी कब्रस्तान तयार करण्यात यावे, अशी मागणी या पत्राद्वारे करण्यात आली आहे.  वसीम रिझवी यांनी पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रात मुघलांचा दरोडेखोर असा उल्लेख केला आहे.  पंतप्रधानांना लिहिण्यात आलेल्या या पत्रात वक्फ बोर्डनं नमूद केले आहे की, 35 एकर जमिनीवर असलेला हुमायूनचा मकबरा कब्रस्तानसाठी कामी येऊ शकतो. कारण हुमायू इस्लामिक प्रचारक नव्हता किंवा धर्मगुरूदेखील नव्हता. अशातच, दिल्लीतील कब्रस्तानांची क्षमता संपल्याने मृतदेहांचे दफन करण्यासाठी जागा शिल्लक नसल्यानं हुमायूनचा मकबरा जमिनदोस्त करण्याची मागणी शिया वफ्क बोर्डाकडून करण्यात येत आहे.

दरम्यान, ऑल इंडिया राबता-ए-मस्जिद आणि मद्रिस-ए-इस्लामिया या दोन संस्थांनी उत्तर प्रदेश शिया सेंट्रल वक्फ बोर्डाला पत्र लिहिले होते. 'दिल्ली आणि उत्तर प्रदेशच्या सीमेवरील भागांमध्ये कब्रस्तानसाठी जागा उपलब्ध नाही. त्यामुळे दिल्लीत राहणाऱ्या मुस्लिमांसमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत. हा प्रश्न लवकरात लवकर सोडवणे गरजेचा आहे,' असे शिया वक्फ बोर्डाने मोदींना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.  'हुमायूनचा मकबरा धार्मिक स्थळ नाही. त्याठिकाणी हुमायूनची कबर असल्याने ते कब्रस्तानच आहे', असे पत्रात नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, हुमायूनचा मकबराप्रमाणे काही दिवसांपासून ताज महलवरुन वादविवाद सुरू आहेत. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीMuslimमुस्लीम