शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

लोकशाही आणि घराणेशाही एकत्र नांदू शकत नाही; घराणेशाहीवर उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचं मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2017 11:39 IST

उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी घराणेशाहीच्या मुद्द्यावर मत मांडलं आहे.  

ठळक मुद्देउपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी घराणेशाहीच्या मुद्द्यावर मत मांडलं आहे.  घराणेशाही आणि लोकशाही एकत्र नांदू शकत नाही. तसंच घराणेशाही ही पूर्णपणे अयोग्य आहे. पण, आपल्याकडे काहीजण त्याचं समर्थन करतात, असं व्यंकय्या नायडू त्यांनी म्हटलं.

नवी दिल्ली, दि. 16-  भारतातील घराणेशाहीवर काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी अमेरिकेतील बर्कले येथे कॅलिफोर्निया विद्यापीठात वक्तव्य केलं होतं. आता उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी घराणेशाहीच्या मुद्द्यावर मत मांडलं आहे.  घराणेशाही आणि लोकशाही एकत्र नांदू शकत नाही. तसंच घराणेशाही ही पूर्णपणे अयोग्य आहे. पण, आपल्याकडे काहीजण त्याचं समर्थन करतात, असं व्यंकय्या नायडू त्यांनी म्हटलं. मी हे एखाद्या पक्षाला किंवा व्यक्तीला उद्देशून बोलत नसल्याचंही व्यंकय्या नायडू यांनी स्पष्ट केलं. काही दिवसांपूर्वी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी अमेरिकेतील एका कार्यक्रमात बोलताना भारतात असलेल्या घराणेशाहीबद्दल वक्तव्य केलं होतं. राहुल गांधी यांच्या त्या वक्तव्याला व्यंकय्या नायडू यांनी उत्तर दिल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

काही दिवसांपूर्वी राहुल गांधी यांनी अमेरिकेतील बर्कले येथे कॅलिफोर्निया विद्यापीठातील विद्यार्थ्यांशी संवाद साधला होता. यावेळी त्यांना काँग्रेस पक्षातील घराणेशाहीबद्दल त्यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर राहुल गांधी यांनी उत्तर दिलं होतं. 'एकट्या काँग्रेस पक्षालाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करता येणार नाही. देशातील अनेक पक्षात आजही घराणेशाही चालते. असं बोलताना राहुल गांधी यांनी अखिलेश यादव, करुणानिधी यांचा मुलगा स्टालिन तसंत अमिताभ बच्चन या सगळ्यांची उदाहरणं दिली होती. सगळीकडे घराणेशाही आहेच. एवढंच काय तर बॉलिवूड क्षेत्रात, व्यावसायिकांमध्येही घराणेशाही आहे. अभिषेक बच्चनपासून ते अंबानी कुटुंबियांपर्यंत सगळीकडे घराणेशाही पाहायला मिळते. इन्फोसिसही काही यापेक्षा वेगळे नाही, असं उत्तर राहुल गांधी यांनी दिलं.

राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्यामुळे त्यांच्यावर टीका झाली. घराण्याचा वंशज आणि घराणेशाही या गोष्टी भारतीय व्यवस्थेचा अविभाज्य भाग असल्याचा त्यांचा दावा विसंगतीपूर्ण असल्याचे स्मृती इराणी यांनी म्हटलं होतं. तर अभिनेते ऋषी कपूर यांनीही राहुल गांधी यांच्यावर टीका केली होती. ऋषी कपूर यांनी सलग तीन ट्विट करत राहुल गांधी यांना झापलं. पहिल्या ट्विटमध्ये त्यांनी लिहिलं आहे की, 'राहुल गांधी. 106 वर्षांच्या भारतीय चित्रपटसृष्टीत कपूर घराण्याचं योगदान 90 वर्ष आहे. प्रत्येक पिढीला लोकांनी मेरिटच्या आधारे निवडलं आहे'. यानंतर केलेल्या दुस-या ट्विटमध्ये त्यांनी सांगितलं आहे की, 'देवाच्या कृपेने आमची चौथी पिढी आहे - पृथ्वीराज कपूर, राज कपूर, रणधीर कपूर आणि रणबीर कपूर. याशिवाय अजूनही'. असं ऋषी कपूर म्हणाले होते.