शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
2
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
3
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
4
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
5
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
6
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
7
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
8
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
9
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
10
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
11
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
12
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
13
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
14
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
15
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
16
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
17
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू
18
अहमदाबाद प्लेन क्रॅशसंदर्भात बाबा रामदेव यांना वेगळाच संशय, स्पष्टच बोलले! केली मोठी मागणी
19
Maharashtra Rain Alert: कोकणाला रेड अलर्ट! मुंबई-ठाण्यासह 'या' जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा
20
Tarot Card: कष्ट करावे लागतील, तडकाफडकी कोणतेही निर्णय घेऊ नका; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!

श्रीराम मंदिर सोहळ्यावर बंदी घालण्याची मागणी; अलाहाबाद हायकोर्टात याचिका दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2024 15:27 IST

एकीकडे 22 जानेवारी रोजी रामललाची प्राणप्रतिष्ठा होत आहे, तर दुसरीकडे यावरुन राजकारणही तापले आहे.

Ram Mandir: श्रीराम जन्मभूमी अयोध्येत होणाऱ्या रामललाच्या प्रतिष्ठापणा सोहळ्यासाठी अवघा देश उत्सुक आहे. रामभक्त ऐतिहासिक अनेक दशकांपासून आतुरतेने वाट पाहत होते. एकीकडे 22 जानेवारी रोजी अयोध्येत हा भव्यदिव्य सोहळा पार पडत आहे, दुसरीकडे या मुद्द्यावरुन बरेच राजकारणही सुरू आहे. दरम्यान, आता या सोहळ्याविरोधात अलादाबाद हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे.

वृत्तसंस्थ एएनआयनुसार, राम मंदिराच्या उद्घाटनापूर्वी हे प्रकरण आता न्यायालयात पोहोचले आहे. उत्तर प्रदेशच्या अलाहाबाद उच्च न्यायालयात जनहित याचिका (पीआयएल) दाखल करण्यात आली आहे. या याचिकेत 22 जानेवारीला श्रीराम मंदिरात होणाऱ्या रामललाच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यावर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथील रहिवासी भोला दास यांनी ही याचिका दाखल केली आहे.

‘पौष महिन्यात धार्मिक कार्यक्रम होत नाहीत’याचिकाकर्ते भोला दास यांचे म्हणणे आहे की, सध्या पौष महिना सुरू असून हिंदू दिनदर्शिकेनुसार पौष महिन्यात कोणताही धार्मिक कार्यक्रम आयोजित केला जात नाही. अशा स्थितीत रामललाच्या मूर्तीच्या अभिषेकाचा कार्यक्रम आयोजित करू नये, न्यायालयाने यावर बंदी घालावी. याशिवाय याचिकाकर्त्याने असेही म्हटले आहे की, मंदिराचे बांधकाम अद्याप पूर्ण झाले नाही, त्यामुळे तिथे श्रीराम विराजमान होऊ शकत नाही. 

'फायद्यासाठी भाजपचे प्रयत्न'भोला दास यांनी आपल्या याचिकेत शंकराचार्यांचाही उल्लेख केला आहे. ते म्हणाले की, शंकराचार्यांनीही प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमावर आक्षेप घेतला आहे. अपूर्ण असलेल्या मंदिरातील मूर्तीचा अभिषेक करण्याबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. अशा परिस्थितीत हा उपक्रम तूर्तास थांबवावा. एवढेच नाही तर भोला दास यांनी याचिकेत भाजपवर आरोप केले आहेत. भाजप राम मंदिरावर राजकारण करत असल्याचे आणि आगामी लोकसभा निवडणुकीत राजकीय फायद्यासाठी हा सोहळा आयोजित केल्याचा आरोप केला आहे. 

विरोधी पक्षची या मुद्द्यावरुन टीकायाच मुद्द्यावरुन विरोधी पक्ष सुरुवातीपासूनच भाजपवर हल्लाबोल करत आहेत. लोकसभा निवडणुकीत फायदा मिळवण्यासाठी भाजप राम मंदिराचा वापर करत असल्याचे काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, समाजवादी पक्षासह सर्व पक्षांचे म्हणणे आहे. तर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी तर भाजपने प्रभू रामाचे अपहरण केल्याचे म्हटले आहे. 

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्याHigh Courtउच्च न्यायालयUttar Pradeshउत्तर प्रदेशNarendra Modiनरेंद्र मोदी