शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
4
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
5
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
6
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
7
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
8
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
9
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
10
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
11
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
12
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
13
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
14
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
15
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
16
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
17
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
18
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
19
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

श्रीराम मंदिर सोहळ्यावर बंदी घालण्याची मागणी; अलाहाबाद हायकोर्टात याचिका दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2024 15:27 IST

एकीकडे 22 जानेवारी रोजी रामललाची प्राणप्रतिष्ठा होत आहे, तर दुसरीकडे यावरुन राजकारणही तापले आहे.

Ram Mandir: श्रीराम जन्मभूमी अयोध्येत होणाऱ्या रामललाच्या प्रतिष्ठापणा सोहळ्यासाठी अवघा देश उत्सुक आहे. रामभक्त ऐतिहासिक अनेक दशकांपासून आतुरतेने वाट पाहत होते. एकीकडे 22 जानेवारी रोजी अयोध्येत हा भव्यदिव्य सोहळा पार पडत आहे, दुसरीकडे या मुद्द्यावरुन बरेच राजकारणही सुरू आहे. दरम्यान, आता या सोहळ्याविरोधात अलादाबाद हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे.

वृत्तसंस्थ एएनआयनुसार, राम मंदिराच्या उद्घाटनापूर्वी हे प्रकरण आता न्यायालयात पोहोचले आहे. उत्तर प्रदेशच्या अलाहाबाद उच्च न्यायालयात जनहित याचिका (पीआयएल) दाखल करण्यात आली आहे. या याचिकेत 22 जानेवारीला श्रीराम मंदिरात होणाऱ्या रामललाच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यावर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथील रहिवासी भोला दास यांनी ही याचिका दाखल केली आहे.

‘पौष महिन्यात धार्मिक कार्यक्रम होत नाहीत’याचिकाकर्ते भोला दास यांचे म्हणणे आहे की, सध्या पौष महिना सुरू असून हिंदू दिनदर्शिकेनुसार पौष महिन्यात कोणताही धार्मिक कार्यक्रम आयोजित केला जात नाही. अशा स्थितीत रामललाच्या मूर्तीच्या अभिषेकाचा कार्यक्रम आयोजित करू नये, न्यायालयाने यावर बंदी घालावी. याशिवाय याचिकाकर्त्याने असेही म्हटले आहे की, मंदिराचे बांधकाम अद्याप पूर्ण झाले नाही, त्यामुळे तिथे श्रीराम विराजमान होऊ शकत नाही. 

'फायद्यासाठी भाजपचे प्रयत्न'भोला दास यांनी आपल्या याचिकेत शंकराचार्यांचाही उल्लेख केला आहे. ते म्हणाले की, शंकराचार्यांनीही प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमावर आक्षेप घेतला आहे. अपूर्ण असलेल्या मंदिरातील मूर्तीचा अभिषेक करण्याबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. अशा परिस्थितीत हा उपक्रम तूर्तास थांबवावा. एवढेच नाही तर भोला दास यांनी याचिकेत भाजपवर आरोप केले आहेत. भाजप राम मंदिरावर राजकारण करत असल्याचे आणि आगामी लोकसभा निवडणुकीत राजकीय फायद्यासाठी हा सोहळा आयोजित केल्याचा आरोप केला आहे. 

विरोधी पक्षची या मुद्द्यावरुन टीकायाच मुद्द्यावरुन विरोधी पक्ष सुरुवातीपासूनच भाजपवर हल्लाबोल करत आहेत. लोकसभा निवडणुकीत फायदा मिळवण्यासाठी भाजप राम मंदिराचा वापर करत असल्याचे काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, समाजवादी पक्षासह सर्व पक्षांचे म्हणणे आहे. तर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी तर भाजपने प्रभू रामाचे अपहरण केल्याचे म्हटले आहे. 

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्याHigh Courtउच्च न्यायालयUttar Pradeshउत्तर प्रदेशNarendra Modiनरेंद्र मोदी