शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'
2
१ फोटो, १ मतदारसंघ अन् १०० मते...; राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'नं निवडणूक आयोगाची उडाली झोप
3
UPI की Net Banking? पर्सनल लोनचा EMI भरण्यासाठी सर्वात प्रभावी पर्याय कोणता? जाणून घ्या फायदे आणि तोटे
4
Rahul Gandhi : कधी सीमा, कधी स्वीटी, कधी सरस्वती... हरियाणात एका तरुणीची २२ मतं, राहुल गांधींचा मोठा दावा
5
“मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर अनेकांची वक्रदृष्टी, पंचांग काढून राहु-केतु...”; ठाकरेंचा टोला
6
थंडीच्या दिवसांत घरातील फ्रीजचं तापमान नेमकं किती ठेवावं? एका चुकीमुळे भरमसाठ वाढू शकतं बिल!
7
ट्रम्प, थोडा आवाज वाढवा, ज्या न्यूयॉर्क शहराने तुम्हाला जन्माला घातले...; ममदानींचा राष्ट्राध्यक्षांना थेट इशारा
8
Devendra Fadnavis: "विकास सोडून फक्त विधानेच!" उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर फडणवीसांची तिखट प्रतिक्रिया
9
BSNL Recharge Plan: ५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीचा रिचार्ज प्लान आहेत बेस्ट; मिळणार जबरदस्त बेनिफिट्स, जाणून घ्या
10
Bilaspur Train Accident : सीटमध्ये पाय अडकलेला, डोळ्यांसमोर मृतदेहांचा खच...; बिलासपूर अपघाताचं भीषण दृश्य!
11
शरद पवारांची यादी मान्य! कोकणवासीयांना मोठा दिलासा; ‘या’ २ ठिकाणी ८ सुपरफास्ट ट्रेनना थांबा
12
एसटी चालक, वाहकाचे प्रसंगावधान; एमएसईबीच्या माजी अधिकाऱ्याची तब्येत बिघडली, वेगाने नातेपुते गाठत वाचविले...
13
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये सलमान खानची एन्ट्री, 'या' भूमिकेत दिसणार भाईजान
14
Monorail Accident: ट्रॅक सोडला, मधोमध अडकली! मोनोरेलचा वडाळ्याजवळ अपघात, ट्रायल रनवेळी घडली घटना
15
Shocking! संतापलेल्या पतीने पत्नीचे नाक कापले, ब्लेडने बोटांवरही वार केले; त्यानंतर जे घडलं...
16
'आम्हालाही दिलासा द्या..,' Vi ला मिळालेल्या दिलास्यानंतर Airtel नं का म्हटलं असं? सरकारकडे जाणार कंपनी
17
वयाच्या तिशीत ‘हे’ ५ आर्थिक नियम शिका! तुम्हाला श्रीमंत होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही
18
Swapna Shastra: स्वप्नात स्वतःचा मृत्यू पाहणे हे शुभ की अशुभ लक्षण? स्वप्नशास्त्र काय सांगते पाहू
19
"लाडली, लक्ष्मी, बहीण..."; निवडणूक वर्षात महिलांसाठी रोख रकमेचा महापूर; सरकारं घाट्यात! आरबीआयनं आधीच दिलाय मोठा इशारा
20
मिर्झापूरजवळ भीषण अपघात; रेल्वे रुळ ओलांडताना 'कालका मेल'खाली चिरडून ६ भाविकांचा मृत्यू

श्रीराम मंदिर सोहळ्यावर बंदी घालण्याची मागणी; अलाहाबाद हायकोर्टात याचिका दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2024 15:27 IST

एकीकडे 22 जानेवारी रोजी रामललाची प्राणप्रतिष्ठा होत आहे, तर दुसरीकडे यावरुन राजकारणही तापले आहे.

Ram Mandir: श्रीराम जन्मभूमी अयोध्येत होणाऱ्या रामललाच्या प्रतिष्ठापणा सोहळ्यासाठी अवघा देश उत्सुक आहे. रामभक्त ऐतिहासिक अनेक दशकांपासून आतुरतेने वाट पाहत होते. एकीकडे 22 जानेवारी रोजी अयोध्येत हा भव्यदिव्य सोहळा पार पडत आहे, दुसरीकडे या मुद्द्यावरुन बरेच राजकारणही सुरू आहे. दरम्यान, आता या सोहळ्याविरोधात अलादाबाद हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे.

वृत्तसंस्थ एएनआयनुसार, राम मंदिराच्या उद्घाटनापूर्वी हे प्रकरण आता न्यायालयात पोहोचले आहे. उत्तर प्रदेशच्या अलाहाबाद उच्च न्यायालयात जनहित याचिका (पीआयएल) दाखल करण्यात आली आहे. या याचिकेत 22 जानेवारीला श्रीराम मंदिरात होणाऱ्या रामललाच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यावर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथील रहिवासी भोला दास यांनी ही याचिका दाखल केली आहे.

‘पौष महिन्यात धार्मिक कार्यक्रम होत नाहीत’याचिकाकर्ते भोला दास यांचे म्हणणे आहे की, सध्या पौष महिना सुरू असून हिंदू दिनदर्शिकेनुसार पौष महिन्यात कोणताही धार्मिक कार्यक्रम आयोजित केला जात नाही. अशा स्थितीत रामललाच्या मूर्तीच्या अभिषेकाचा कार्यक्रम आयोजित करू नये, न्यायालयाने यावर बंदी घालावी. याशिवाय याचिकाकर्त्याने असेही म्हटले आहे की, मंदिराचे बांधकाम अद्याप पूर्ण झाले नाही, त्यामुळे तिथे श्रीराम विराजमान होऊ शकत नाही. 

'फायद्यासाठी भाजपचे प्रयत्न'भोला दास यांनी आपल्या याचिकेत शंकराचार्यांचाही उल्लेख केला आहे. ते म्हणाले की, शंकराचार्यांनीही प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमावर आक्षेप घेतला आहे. अपूर्ण असलेल्या मंदिरातील मूर्तीचा अभिषेक करण्याबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. अशा परिस्थितीत हा उपक्रम तूर्तास थांबवावा. एवढेच नाही तर भोला दास यांनी याचिकेत भाजपवर आरोप केले आहेत. भाजप राम मंदिरावर राजकारण करत असल्याचे आणि आगामी लोकसभा निवडणुकीत राजकीय फायद्यासाठी हा सोहळा आयोजित केल्याचा आरोप केला आहे. 

विरोधी पक्षची या मुद्द्यावरुन टीकायाच मुद्द्यावरुन विरोधी पक्ष सुरुवातीपासूनच भाजपवर हल्लाबोल करत आहेत. लोकसभा निवडणुकीत फायदा मिळवण्यासाठी भाजप राम मंदिराचा वापर करत असल्याचे काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, समाजवादी पक्षासह सर्व पक्षांचे म्हणणे आहे. तर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी तर भाजपने प्रभू रामाचे अपहरण केल्याचे म्हटले आहे. 

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्याHigh Courtउच्च न्यायालयUttar Pradeshउत्तर प्रदेशNarendra Modiनरेंद्र मोदी