शहरं
Join us  
Trending Stories
1
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
2
आजचे राशीभविष्य, २७ ऑक्टोबर २०२५: धनलाभ योग, ठरवलेली कामे होतील; यशाचा-प्रसन्न दिवस
3
Video - अग्निकल्लोळ! रेस्टॉरंटमध्ये भीषण आग; एकामागून एक ४ सिलिंडरचा स्फोट, महिलेचा मृत्यू
4
राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा फेरा, हातातोंडाशी आलेल्या पिकांवर मारा; जोर वाढण्याची शक्यता, चार-पाच दिवस सावट
5
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
6
रशियावरच्या निर्बंधाने भारतीय तेल कंपन्या अडचणीत; फटका बसू नये म्हणून ONGC जाणार न्यायालयात
7
पश्चिम उपनगरातील वाहतूककोंडी सुटण्यास आणखी ३ वर्षे; गोरगाव ते ओशिवरा केबल-स्टेड पूल उभारणार
8
गृहनिर्माण सोसायट्यांना पुनर्विकासास पूर्ण मुभा; कोर्टाच्या निर्णयामुळे संभ्रम दूर, जुने परिपत्रक मागे घेण्याचे आदेश
9
११३९ कोटी कधी मिळणार? १६ लाख शेतकरी अजून बँकांच्या केवायसीत अडकलेले
10
पाऊस पुन्हा मुक्कामी, मुसळधारेमुळे महामुंबईत धावपळ; ३० ऑक्टोबरपर्यंत मुंबईसह कोकणात मुसळधार
11
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
12
देशभरातील आठ हजार शाळा ‘रिकाम्या’; २० हजार शिक्षक घेताहेत फुकटचा पगार
13
एमबीबीएस प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा उडाला गोंधळ; निकालापूर्वीच बीएएमएस, बीएचएमएस प्रवेश फेरी सुरू
14
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
15
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
16
सलग दुसऱ्या दिवशीही प्रसूतिगृहाचा काेंडवाडा; सहा महिला वेटिंगवर, दाटीवाटीने लावले बेड
17
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
18
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
19
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
20
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा

उत्तम समन्वयासाठी एनडीएमध्ये निमंत्रक नेमण्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2019 01:55 IST

घटक पक्षांत चिंतेचे वातावरण; मतभेदांचे निवारण करण्याचा हेतू

नवी दिल्ली : मतभेदांचे निवारण करण्यासाठी एनडीएमध्ये निमंत्रक नेमावा किंवा समन्वय समिती स्थापना करावी, अशी मागणी या आघाडीतील घटक पक्षांनी केली आहे. भाजपशी झालेल्या तीव्र मतभेदांनंतर शिवसेना एनडीएमधून बाहेर पडली. त्या वादंगाचे सावट एनडीएच्या रविवारी झालेल्या बैठकीवर पडले होते.या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, एनडीएमधील घटक पक्ष भलेही वेगवेगळ््या विचारसरणींचे असतील पण आपण एखाद्या मोठ्या कुटुंबासारखे आहोत. लहानसहान गोष्टींवरून आपापसात मतभेद होणे योग्य नाही.या बैठकीनंतर मोदींनी एका टिष्ट्वटमध्ये म्हटले आहे की, भारतातील विविधतेचे दर्शन एनडीएमध्ये घडते. देशातील शेतकरी, युवक, महिला, गरीबातील गरीब मनुष्य यांच्या कल्याणासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू. संसदेचे हिवाळी अधिवेशन उद्या, सोमवारपासून सुरू होत असून त्या पार्श्वभूमीवर एनडीएची बैठक झाली.लोक जनशक्ती पार्टीचे नवनिर्वाचित अध्यक्ष चिराग पासवान यांनी म्हटले आहे की, एनडीएमधील सर्वात जुन्या घटक पक्षांपैकी एक असलेल्या शिवसेनेची अनुपस्थिती मला विशेषत्वाने जाणवली. सर्वात आधी तेलुगू देसमने एनडीएला रामराम केला. त्यानंतर राष्ट्रीय लोक समता पार्टीनेही तोच मार्ग पत्करला.या सर्व गोष्टींची मला चिंता वाटते. एनडीएमधील घटक पक्षांमध्ये उत्तम समन्वय असता तर महाराष्ट्रात भाजप व शिवसेनेमधील वादंग टाळता आले असते. यापुढे असे प्रसंग टाळण्यासाठी एनडीएमध्ये निमंत्रक नेमावा किंवा समन्वय समितीची स्थापना करावी असेही पासवान म्हणाले. अशीच मागणी लोक जनशक्ती पार्टीप्रमाणेच अपना दल, जनता दल (यू) व ईशान्य भारतातील काही घटक पक्षांनीही एनडीएच्या बैठकीत केल्याचे सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीShiv SenaशिवसेनाBJPभाजपा