शहरं
Join us  
Trending Stories
1
शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
2
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, आज 'या' राशीतील लोकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक
3
आता मोबाइल ॲपद्वारे कुठूनही करता येणार मतदान; कोणत्या मतदारांना मिळणार अधिकार?
4
Shefali Jariwala: शेफाली जरीवालाच्या शेवटच्या एक्स पोस्टमध्ये 'या' व्यक्तीच्या नावाचा उल्लेख!
5
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?
6
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
7
तरुण जोडप्यांना मुलांची आस, पण तरीही का घसरतोय देशाचा प्रजनन दर?
8
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
9
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
10
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
11
विशेष लेख: इंदिरा गांधी यांच्या जागी दुसरे कुणी असते तरीही...
12
जुलैमध्ये १३ दिवस बँका राहणार बंद; राज्यनिहाय वेगळ्या सुट्ट्या, महाराष्ट्रात किती दिवस राहणार बंद?
13
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
14
अग्रलेख: अंतराळात भारतीय शुभकिरण! भारताचे स्वप्न पूर्ण होण्याचा क्षण
15
लेख: तुमच्या घरातला एसी आता ‘फार’ थंड नाही होणार!
16
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
17
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
18
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
19
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
20
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!

Delhi Voilence: पती आल्यानंतरच जेवण करणार; हिंसाचारात मृत्यू झालेल्या पोलीस पत्नीचा हट्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2020 13:42 IST

Delhi Voilence News: रतनलाल यांच्या आईला अद्याप आपला मुलगा गेलाय याची कल्पनाही नाही

ठळक मुद्देरतनलाल यांना शहीद दर्जा देण्यात यावा, नातेवाईकांची मागणी दिल्ली हिंसाचारात पोलीस हेड कॉन्स्टेबल रतनलाल यांचा मृत्यू २२ फेब्रुवारीलाच रतनलाल यांनी पत्नी पूनमसह साजरा केला होता लग्नाचा वाढदिवस

नवी दिल्ली - सीएएविरोधातील आंदोलनाला दिल्लीत हिंसक वळण लागलं आहे. सीएए समर्थक आणि विरोधक एकमेकांना भिडल्याने दगडफेक, जाळपोळ सुरु झाली. या हिंसाचारात आतापर्यंत २० जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये पोलीस शिपाई रतनलाल यांचाही मृत्यू झाला. मात्र या घटनेनंतर रतनलाल यांच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. 

रतनलाल यांच्या आईला अद्याप आपला मुलगा गेलाय याची कल्पनाही नाही. गावात शांतता पसरली आहे. रतनलाल यांचे नातेवाईक डॉ. हेमबारी म्हणाले की, दिल्लीवरुन रतनलाल यांचा मृतदेह रवाना झाला आहे. त्यांच्यावर पैतुक येथील तिहावली गावात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. अलीकडेच २२ फेब्रुवारीला रतनलाल यांनी पत्नीसह लग्नाचा वाढदिवस साजरा केला. मात्र या घटनेमुळे त्यांची पत्नी पूनम सुन्न झाली आहे. पती परतल्यानंतरच मी जेवण करणार असा हट्ट तिने धरला आहे. 

रतनलाल यांना शहीद दर्जा देण्यात यावा, तसेत पूनम यांना नोकरी, ३ मुलांना केंद्रीय विद्यालयात मोफत शिक्षण, २ कोटी आर्थिक मदत द्यावी, तसेच आरोपींना फाशी देण्याची मागणी गावकऱ्यांकडून करण्यात येते. वडिलांच्या मृत्यूनंतर रतनलाल यांच्यावर कुटुंबाची जबाबदारी आली. कुटुंबात २ लहान भाऊ, एक बहिण आहे. 

रतनलाल यांनी २२ फेब्रुवारीला कुटुंबासह दिल्लीत लग्नाचा वाढदिवस साजरा केला होता. दिल्लीत रतनलाल यांच्या मृत्यूनंतर पत्नी पूनमला धक्का बसला आहे. याबाबत लहान भाऊ दिनेश यांनी सांगितले की, सध्या तीन मुलांचा सांभाळ शेजारचे करत आहेत. मोठी मुलगी रिद्धी हिला वडिलांच्या निधनाची माहिती नाही. रतनलाल सोमवारी उपवास ठेवायचे, घटनेच्या दिवशी सोमवार असल्याने त्यांचे व्रत होते. सकाळी घरातून ११ वाजता ते निघाले ते परतलेच नाही.

दरम्यान, दिल्लीत सुरू असलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी मंगळवारी रात्री उशिरा उत्तर-पूर्व दिल्लीत घटनास्थळावर जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर सीलमपूरमध्ये उत्तर-पूर्वचे डीसीपी वेद प्रकाश सुर्या यांच्या कार्यालयाबैठक घेतली. दिल्लीतील परिस्थितीवर डोवाल लक्ष ठेवून आहेत. डोवाल आणि अन्य अधिकाऱ्यांनी मौजपूर, जाफराबाद, गोकुलपुरी येथे जाऊन प्रत्यक्ष परिस्थितीचा आढावा घेतला. दिल्लीतील आंदोलनाने हिंसक वळण घेतल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.  

टॅग्स :delhi violenceदिल्लीPoliceपोलिसcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयक