शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
2
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
3
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
4
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
5
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
6
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
7
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
8
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
9
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
10
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
11
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
12
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
13
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
14
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
15
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
16
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
17
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
18
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
19
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
20
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

Delhi Violence: कामगार, भाडेकरूंनी कुटुंबे पाठविली गावी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2020 02:32 IST

अनेक लोकांनी स्थलांतरास केली सुरुवात; ईशान्य दिल्लीतील लोकांमध्ये अद्यापही भीतीचे वातावरण

नवी दिल्ली : ईशान्य दिल्लीतील हिंसाचाराची आग शमली असली तरी स्थानिक तसेच भाडेतत्त्वावर राहणाऱ्या रहिवाशांमध्ये अद्याप भीतीचे वातावरण आहे. मागील तीन दिवसांत चांदबाग, मुंगानगर, करावलनगर, घोंडा व गोकुलपुरीमध्ये घडलेल्या हिंसाचारापासून अनेक लोकांनी स्थलांतर करण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये प्रामुख्याने कामासाठी, व्यवसायासाठी या भागात रहिवासी असलेल्या लोकांचा समावेश अधिक आहे.अनेकजण आपल्या कुंटुबियांना खासकरून ज्येष्ठ महिला व मुलांना पाहुण्यांकडे, तसेच आपल्या मूळगावी परत पाठवत आहेत. दुसºया राज्यातून नोकरीसाठी आलेल्या लोकांनीशहरातील दुसºया परिसरात घराचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.आता वातावरण शांत झाले असले तरी अचानक कधीही जमाव एकत्र येऊ शकतो. गोळीबार, घोषणाबाजी सुरू होऊ शकते. घरातील लहान मुले घाबरून सतत काय चाललेय, हे विचारायची. त्यामुळे मुले व पत्नीला लखनऊ येथील नातेवाईकांकडे पाठवून दिले, अशी माहिती चांदनगर येथील रहिवासी आरीफ यांनी दिली आहे.घरे रिकामी करण्यास सुरुवातघोंडा परिसरात जे लोक भाडेतत्त्वावर राहत होते, त्यांनीही घरे रिकामी करण्यास सुरुवात केली आहे. वेगवेगळ्या फॅक्टरीमध्ये काम करणारे कामगारही आपल्या गावी जात असल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे.मौजपूर परिसरातील अनेक दुकाने आगीच्या भक्ष्यस्थानी पडली आहेत. त्यामुळे तिथे काम करणाºया कामगारांना आपल्या गावी परत जाण्याशिवाय पर्याय नसल्याची माहिती रफि क मोहम्मद यांनी दिली आहे.कुटुंबातील सदस्यांना सुरक्षित ठिकाणी पाठवल्यानंतर किमान पुरुषांना निर्धास्तपणे कामाचा शोधही घेता येईल, असेही मत अनेकांनी व्यक्त केले.

टॅग्स :delhi violenceदिल्ली