शहरं
Join us  
Trending Stories
1
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
2
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
3
छगन भुजबळांना कोर्टाचा दणका, बेनामी मालमत्तेचा खटला पुन्हा चालविण्याचे आदेश
4
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तीन टप्प्यांत? जाणून घ्या सविस्तर
5
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
6
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर
7
रेसकोर्सवरील थीम पार्कवर पुन्हा ‘इव्हेंट’; काम सुरू होईपर्यंत कार्यक्रमांसाठी देणार भाड्याने
8
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
9
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
10
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
11
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
12
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
13
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
14
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
15
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
16
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
17
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
18
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
19
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
20
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल

Delhi Violence: कामगार, भाडेकरूंनी कुटुंबे पाठविली गावी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2020 02:32 IST

अनेक लोकांनी स्थलांतरास केली सुरुवात; ईशान्य दिल्लीतील लोकांमध्ये अद्यापही भीतीचे वातावरण

नवी दिल्ली : ईशान्य दिल्लीतील हिंसाचाराची आग शमली असली तरी स्थानिक तसेच भाडेतत्त्वावर राहणाऱ्या रहिवाशांमध्ये अद्याप भीतीचे वातावरण आहे. मागील तीन दिवसांत चांदबाग, मुंगानगर, करावलनगर, घोंडा व गोकुलपुरीमध्ये घडलेल्या हिंसाचारापासून अनेक लोकांनी स्थलांतर करण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये प्रामुख्याने कामासाठी, व्यवसायासाठी या भागात रहिवासी असलेल्या लोकांचा समावेश अधिक आहे.अनेकजण आपल्या कुंटुबियांना खासकरून ज्येष्ठ महिला व मुलांना पाहुण्यांकडे, तसेच आपल्या मूळगावी परत पाठवत आहेत. दुसºया राज्यातून नोकरीसाठी आलेल्या लोकांनीशहरातील दुसºया परिसरात घराचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.आता वातावरण शांत झाले असले तरी अचानक कधीही जमाव एकत्र येऊ शकतो. गोळीबार, घोषणाबाजी सुरू होऊ शकते. घरातील लहान मुले घाबरून सतत काय चाललेय, हे विचारायची. त्यामुळे मुले व पत्नीला लखनऊ येथील नातेवाईकांकडे पाठवून दिले, अशी माहिती चांदनगर येथील रहिवासी आरीफ यांनी दिली आहे.घरे रिकामी करण्यास सुरुवातघोंडा परिसरात जे लोक भाडेतत्त्वावर राहत होते, त्यांनीही घरे रिकामी करण्यास सुरुवात केली आहे. वेगवेगळ्या फॅक्टरीमध्ये काम करणारे कामगारही आपल्या गावी जात असल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे.मौजपूर परिसरातील अनेक दुकाने आगीच्या भक्ष्यस्थानी पडली आहेत. त्यामुळे तिथे काम करणाºया कामगारांना आपल्या गावी परत जाण्याशिवाय पर्याय नसल्याची माहिती रफि क मोहम्मद यांनी दिली आहे.कुटुंबातील सदस्यांना सुरक्षित ठिकाणी पाठवल्यानंतर किमान पुरुषांना निर्धास्तपणे कामाचा शोधही घेता येईल, असेही मत अनेकांनी व्यक्त केले.

टॅग्स :delhi violenceदिल्ली