शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

Delhi Violence: बंदूक रोखणारा 'तो' दंगलखोर गेला कुठे? दिल्ली पोलिसांची खळबळजनक माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2020 12:14 IST

Delhi Violence News: दिल्ली हिंसाचारात गोळीबार करणाऱ्या शाहरुखचा कोणताही ठावठिकाणा न लागल्याने पोलिसांवरही प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे

ठळक मुद्देव्हिडिओ, फोटो व्हायरल होऊनही पोलिसांना काहीच माहिती मिळत नाही.शाहरुखच्या अटकेची बातमी अफवा, पोलिसांचं स्पष्टीकरण दिल्ली पोलिसांच्या कार्यप्रणालीवर संशय उपस्थित

नवी दिल्ली - सीएए कायद्यावरुन दिल्लीतील मौजपूर, जाफराबाद भागात समर्थक आणि विरोधक भिडल्याने हिंसक आंदोलन पेटलं, जाळपोळ, दगडफेकीच्या घटनेने अनेकांचं जनजीवन विस्कळीत झालं. गाड्या जाळल्या, घरं जळाली, दुकानं लुटली, संपूर्ण बाजारपेठ जाळण्यात आली. अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. काहींना घरं सोडावी लागली. या हिंसाचारात दगडफेक आणि जाळपोळ मोठ्या प्रमाणात झाली. आतापर्यंत ३८ जणांचा मृत्यू झाला आहे. 

ईशान्य दिल्लीत झालेल्या हिंसाचारात एका तरुणाने पोलीस आणि जमावावर ८ राऊंड गोळीबार केला होता. इतकचं नाही तर त्या तरुणाने पोलिसाच्या अंगावर बंदूक रोखली होती. हा फोटो सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर या तरुणाची ओळख पटली, सुरुवातीच्या बातमीनुसार शाहरुख नावाच्या तरुणाला पोलिसांनी अटक केल्याची माहिती होती. 

मात्र दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनंतर शाहरुख अद्याप फरार आहे हे स्पष्ट झालं आहे. शाहरुखबद्दल कोणताही माहिती पोलिसांना मिळाली नाही, त्यामुळे शाहरुख अखेर गेला कुठे हा प्रश्न निर्माण झाला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार शाहरुख दिल्लीतील उस्मापूर परिसरात अरविंद नगर गल्ली नंबर ५ मध्ये राहतो. सध्या त्याच्या घराबाहेर टाळे लावण्यात आलं आहे. आतापर्यंत शाहरुखचा सुगावा लागला नाही. त्याच्या कुटुंबाबाबतही कोणती माहिती नाही. त्याच्या कुटुंबात एक मोठा भाऊ आणि आई-वडील राहतात. सध्या संपूर्ण कुटुंब फरार आहे, त्यांच्याबद्दल कोणालाच काही माहिती नाही. 

दिल्ली हिंसाचारात गोळीबार करणाऱ्या शाहरुखचा कोणताही ठावठिकाणा न लागल्याने पोलिसांवरही प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. या घटनेचा व्हिडिओ, फोटो व्हायरल होऊनही पोलिसांना काहीच माहिती मिळत नाही. काही दिवसांपूर्वी शाहरुखच्या अटकेची बातमी समोर येत होती. मात्र ही अफवा असल्याचं पोलिसांनी सांगितले. इतक्या दिवसानंतर पोलीस स्पष्टीकरण का देत आहे? हा प्रश्नही उपस्थित होतो. हिंसाचारामुळे दिल्लीतील सुरक्षा वाढवण्यात आली आहे. त्यानंतरही शाहरुख फरार असणे दिल्ली पोलिसांच्या कार्यप्रणालीवर शंका उपस्थित करणारे आहे. 

शाहरुखच्या वडिलांचे नाव शावर पठाण आहे. त्यांचे कुटुंब १९८५ पासून दिल्लीत राहतं. ड्रग्स प्रकरणात दोनदा शाहरुखच्या वडिलांना जेलमध्ये जावं लागलं. अलीकडेच जेलमधून त्यांची सुटका झाली. शावर पठाण पहिल्यांदा सरदार होता असंही म्हटलं जात असे. यानंतर एका महिलेशी लग्न करुन त्याने धर्मांतर केल्याचं बोललं जातं. 

टॅग्स :delhi violenceदिल्लीPoliceपोलिसcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयक