शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

Delhi Violence: आंदोलन अशांत! हिंसाचारानंतर आंदोलकांमध्ये फूट; 'त्या' दिवशी नेमकं घडलं काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2021 02:29 IST

लाल किल्ल्यावर पोहोचले आंदोलक,बहुतांश शेतकरी परतीच्या मार्गावर! सीमेवरच राहू; संयुक्त माेर्चा ठाम

विकास झाडे

नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनी आंदोलक शेतकऱ्यांनी काढलेली रॅली थेट दिल्लीत घुसली आणि त्यानंतर दिल्लीत अभूतपूर्व असा हिंसाचार झाला. हा हिंसाचार घडवणारे आणि लाल किल्ल्यावर झेंडा फडकावणारे आंदोलक नव्हते, असा दावा शेतकरी संघटना करीत आहेत. दुसरीकडे हिंसाचारानंतर आता बहुतांश शेतकरी हे त्यांच्या गावाकडे परतीच्या मार्गावर आहेत. संयुक्त किसान मोर्चाच्या नेत्यांनी मात्र सरकार तिन्ही कायदे मागे घेत नाही तोपर्यंत सीमेवरच राहू, असे सांगितले आहे. सरकारने चर्चेची कवाडे खुली आहेत, असा पवित्रा कायम ठेवला आहे. 

नेमके काय घडले?

  • गेल्या दोन महिन्यांपासून दिल्लीच्या सीमांवर कृषी कायदे मागे घेणे आणि एमएसपी कायदा तयार करणे यासाठी दोन लाखांवर शेतकरी तळ ठोकून होते. त्यात ७५ पेक्षा अधिक शेतकऱ्यांचा मृत्यू झाला.
  • सरकारसोबत १२ बैठका झाल्यानंतर कोणताही तोडगा निघू शकला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी २६ जानेवारीला दिल्लीत रॅली काढण्याची घोषणा केली होती. 
  • पोलीस प्रशासन आणि शेतकरी नेत्यांमध्ये रॅलीची नियोजित वेळ शेतकऱ्यांनी पाळली नसल्याने गाझीपूर सीमेवर गोंधळ उडाला. 
  • पोलीस आणि शेतकऱ्यांमध्ये चकमकी झाल्यात. काही ठिकाणी शेतकऱ्यांनी पोलिसांवर दगडफेक केली तर काही ठिकाणी पोलिसांनी लाठीचार्ज, अश्रुधूर आणि शेतकऱ्यांच्या वाहनांची नासधूस करतानाचे चित्र होते.

 

शेतकऱ्यांचा आरोप...भाजप प्रणीत नेत्यांनी जमावाला चिथावलेट्रॅक्टर रॅली सुरू करण्यापूर्वीच संयुक्त किसान मोर्चात घुसलेल्या काही भाजप प्रणीत नेत्यांनी जमावाला चिथावले. त्यामुळे रॅलीला हिंसात्मक वळण मिळाले, अशी प्रतिक्रिया संयुक्त किसान मोर्चाचे समन्वयक संदीप गिड्डे-पाटील यांनी दिली. सिंघू, गाझीपूर आणि टिकरी सीमेवरील शेकडो आंदोलक दिशाभूल झाल्याने अक्षरधामसमोर पोहोचले. पोलिसांचे सुरक्षाकडे तोडत ते आयटीओच्या दिशेने निघाले. दिल्लीची माहिती नसल्याने हजारो आंदोलक पोलीस मुख्यालयापर्यंत पोहोचल्याचेही ते म्हणाले.

शेतकरी संघटना तोडण्याचा प्रयत्नचिल्ला सीमेवर शेतकऱ्यांच्या भानु गटाचे आंदोलन सुरू होते. या गटाचे नेते भानु प्रताप सिंह यांनी आज ते आवरते घेतले. परंतु या संघटनेचा संयुक्त किसान मोर्चाशी संबंध नव्हता. त्यांना आधीच काढून टाकण्यात आले होते.

चौकशी कराट्रॅक्टर मोर्चामध्ये झालेल्या हिंसाचाराची निवृत्त न्यायाधीशांच्या समितीतर्फे चौकशी करण्यात यावी, अशी विनंती करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात बुधवारी दाखल करण्यात आली आहे. 

गृहमंत्र्यांनी घेतला आढावादिल्लीतील हिंसाचारानंतर तेथील कायदा-सुव्यवस्थेच्या स्थितीचा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बुधवारी एका बैठकीत आढावा घेतला. 

टॅग्स :delhiदिल्लीFarmerशेतकरी