शहरं
Join us  
Trending Stories
1
'मिस्टर राज!' लाव रे तो व्हिडीओवर राज ठाकरेंना सुषमा अंधारेंचे प्रत्यूत्तर; किनी हत्याकांड, कोहिनूर मिलची केली आठवण
2
जागरूक हो मतदारराजा; महाराष्ट्रासह १० राज्यांतील ९६ जागांसाठी आज होणार मतदान
3
आजचे राशीभविष्य - १३ मे २०२४; एखाद दुसरी सोडली, तर सर्वच राशींना फायद्याचा, आनंदाचा दिवस
4
बाळासाहेबांवर अन्याय करणाऱ्यांना सोबत कसे घेतले? राज ठाकरे, ठाण्यातील लोंढ्यांबाबत चिंता
5
पंतप्रधानांची निवड तुम्ही संगीत खुर्चीतून करणार का? उपमुख्यमंत्री फडणवीसांचा विरोधकांना सवाल
6
लोकशाही न मानणाऱ्या नरेंद्र मोदींची पावले हुकूमशाहीकडे; शरद पवारांची टीका
7
मूल दुसऱ्याचे पण आपल्याला हवे, यांना सगळे रेडीमेड पाहिजे; उद्धव ठाकरेंची भाजपवर कडाडून टीका
8
ही लोकसभेची निवडणूक भाजप विरुद्ध जनता अशी झालेली आहे: प्रकाश आंबेडकर
9
“यापुढे विधानसभा, लोकसभेची निवडणूक लढविणार नाही, राजकीय संन्यास…”: एकनाथ खडसे
10
भाजपाने उद्योग, नोकऱ्या गुजरातला पळविल्या, उद्या मंत्रालयही पाठवले जाईल: आदित्य ठाकरे
11
सत्तेच्या लालसेपोटी उद्धव ठाकरे रामाला विरोध करणाऱ्यांबरोबर; पुष्करसिंह धामी यांची टीका
12
४ जूनला भाजपा जाऊन इंडिया आघाडीचे सरकार येईल: शशी थरूर, देशभरात हवा बदलल्याचा दावा
13
मुंबईत प्रचाराचा सुपरसंडे! मतदानाआधीचा शेवटचा रविवार; सभांमुळे वातावरण तापले
14
चौथ्या टप्प्यातही नात्यांची कसोटी; विखे, गावित, खडसे, मुंडे यांची प्रतिष्ठा पणाला
15
पोट भरण्याचे अन् विजेचे वांदे; महागाईविरोधात ‘पीओके’ पेटले
16
पाटण्यात 'मोदी वादळ', पंतप्रधानांच्या रोड शोला 3.5 किलोमीटरपर्यंत प्रचंड गर्दी
17
RCB ने प्ले ऑफच्या आशा कायम राखल्या, DC च्या अडचणी वाढल्या; विराट-अनुष्का खूश 
18
"...तर इस्रायल दुसऱ्याच दिवशी गाझावरील हल्ले थांबवेल"! पण हमासला बायडेन यांची एवढी एक गोष्ट ऐकावी लागेल
19
चिखलीत व्यावसायिक स्पर्धेतून गोळीबार, एक जण गंभीर जखमी 
20
पुण्यात रवींद्र धंगेकराचं पोलीस ठाण्यातच ठिय्या आंदोलन; वाचा नेमकं काय घडलं?

Delhi violence: द्वेष आणि हिंसाचारामुळे भारताचे नुकसान - राहुल गांधी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 04, 2020 7:12 PM

Rahul Gandhi : सर्वांना मिळून या ठिकाणी प्रेमाने काम करावे लागेल, असे आवाहन राहुल गांधी यांनी केले.

ठळक मुद्देहिंसाचारामुळे नुकसान झालेल्या भागात सध्या मदतकार्य सुरूराहुल गांधी यांनी हिंसाचारावेळी आंदोलकांनी पेटवून दिलेल्या शाळेला भेट दिली'हिंसा व द्वेष विकासाचे शत्रू आहेत'

नवी दिल्ली : नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून गेल्या काही दिवसांपूर्वी राजधानी दिल्लीत हिंसाचार उसळला होता. मात्र, सध्या दिल्लीत शांतता आहे. या हिंसाचारामुळे नुकसान झालेल्या भागात सध्या मदतकार्य सुरू असून येथील जनजीवन आता पूर्ववत होत आहे. दरम्यान, काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यासह बुधवारी काँग्रेसच्या एका प्रतिनिधीमंडळाने दिल्लीतील हिंसाचार उसळलेल्या भागांना भेट दिली. 

बुधवारी राहुल गांधी काँग्रेस नेत्यांबरोबर ईशान्य दिल्लीतील बृजपुरी भागात दाखल झाले. या भागात राहुल गांधी यांनी हिंसाचारावेळी आंदोलकांनी पेटवून दिलेल्या शाळेला भेट दिली. या शाळेला भेट दिल्यानंतर राहुल गांधी यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. 

यावेळी ते म्हणाले, "ही शाळा आहे, हे भारताचे भविष्य आहे. तिला द्वेष व हिंसाचाराने जाळले आहे. यामुळे कोणाचाच फायदा झाला नाही. हिंसा व द्वेष विकासाचे शत्रू आहेत. भारताला जे विभाजन केले जात आहे आणि जाळले जात आहे, यामुळे भारताला काहीच फायदा नाही आहे."

 

याचबरोबर, सर्वांना मिळून या ठिकाणी प्रेमाने काम करावे लागेल, असे आवाहन राहुल गांधी यांनी करत सांगितले की, "भारताला जोडूनच पुढे जाता येऊ शकते. जगात भारताची जी प्रतिमा आहे, तिला धक्का बसला आहे. बंधुभाव आणि एकता आपली ताकद होती, तिला या ठिकाणी जाळण्यात आले. यामुळे भारताचे नुकसान होत आहे."

राहुल गांधी यांच्यासोबत काँग्रेसचे नेते मुकुल वासनिक, कुमारी शैलजा, अधीर रंजन चौधरी, केसी वेणुगोपाल, रणदीप सुरजेवाला, के सुरेश, गौरव गोगोई आणि ब्रह्म मोहिंद्रा उपस्थित होते. दरम्यान, दिल्लीत 24 फेब्रुवारीला उसळलेला हिंसाचार तीन दिवस सुरु होता. या हिंसाचारात आतापर्यंत 46 जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीdelhi violenceदिल्ली