शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
2
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
3
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
4
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
5
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता
6
माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली...
7
Nag Panchami 2025: नागपंचमी का साजरी केली जाते, यामागील पौराणिक कथा वाचलीत का?
8
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
9
चीनचा भारताला मोठा 'धक्का'! 'रेअर अर्थ' बंदीमुळे 'या' ५ क्षेत्रांवर थेट परिणाम, SBI चा गंभीर इशारा!
10
"TCS मधील कपात तर सुरुवात आहे, अजून अनेक कंपन्यांमध्ये AI चा फटका बसणारे"
11
Jharkhand: झारखंडमध्ये भीषण अपघात, कावडियांची बस ट्रकवर आदळली; १९ जणांचा मृत्यू
12
२५ वर्षीय CA तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; 'हेलियम गॅस' शरीरात घेत आयुष्याचा शेवट केला, कारण...
13
Stock Market Today: सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात विक्रीचा सपाटा, Sensex २७१ अंकांनी घसरला; IT-मेटल स्टॉक्स कमकुवत
14
"सलमानने चाकू माझ्या गळ्यावर धरला आणि जोरात...", अशोक सराफ यांनी सांगितला भाईजानचा तो प्रसंग
15
भीषण! गाझामध्ये उपासमारीने १४७ लोकांचा मृत्यू, ४० हजार लहान मुलांचा जीव धोक्यात
16
FD-RD झाली जुनी, आता ‘या’ ५ स्कीम्सची चर्चा; वर्षभरात तगडा नफा हवा असेल तर ही डिटेल्स तपासा
17
'सैयारा'साठी 'या' रिअल लाईफ जोडीला होती ऑफर, मोहित सूरींनी बदलला निर्णय; कारण...
18
Nimisha Priya : केरळमधील नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा रद्द; भारताच्या मुत्सद्देगिरीला अखेर यश
19
"तुझे ओठ सेक्सी आहेत, किस करू?", असित मोदींवर TMKOC फेम अभिनेत्रीचे गंभीर आरोप
20
"तो मला टॉर्चर करतोय"; पत्नीच्या पोलीस तक्रारीनंतर पती घरातून पळाला, पण त्यानंतर जे घडलं...

Delhi violence: द्वेष आणि हिंसाचारामुळे भारताचे नुकसान - राहुल गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2020 19:30 IST

Rahul Gandhi : सर्वांना मिळून या ठिकाणी प्रेमाने काम करावे लागेल, असे आवाहन राहुल गांधी यांनी केले.

ठळक मुद्देहिंसाचारामुळे नुकसान झालेल्या भागात सध्या मदतकार्य सुरूराहुल गांधी यांनी हिंसाचारावेळी आंदोलकांनी पेटवून दिलेल्या शाळेला भेट दिली'हिंसा व द्वेष विकासाचे शत्रू आहेत'

नवी दिल्ली : नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून गेल्या काही दिवसांपूर्वी राजधानी दिल्लीत हिंसाचार उसळला होता. मात्र, सध्या दिल्लीत शांतता आहे. या हिंसाचारामुळे नुकसान झालेल्या भागात सध्या मदतकार्य सुरू असून येथील जनजीवन आता पूर्ववत होत आहे. दरम्यान, काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यासह बुधवारी काँग्रेसच्या एका प्रतिनिधीमंडळाने दिल्लीतील हिंसाचार उसळलेल्या भागांना भेट दिली. 

बुधवारी राहुल गांधी काँग्रेस नेत्यांबरोबर ईशान्य दिल्लीतील बृजपुरी भागात दाखल झाले. या भागात राहुल गांधी यांनी हिंसाचारावेळी आंदोलकांनी पेटवून दिलेल्या शाळेला भेट दिली. या शाळेला भेट दिल्यानंतर राहुल गांधी यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. 

यावेळी ते म्हणाले, "ही शाळा आहे, हे भारताचे भविष्य आहे. तिला द्वेष व हिंसाचाराने जाळले आहे. यामुळे कोणाचाच फायदा झाला नाही. हिंसा व द्वेष विकासाचे शत्रू आहेत. भारताला जे विभाजन केले जात आहे आणि जाळले जात आहे, यामुळे भारताला काहीच फायदा नाही आहे."

 

याचबरोबर, सर्वांना मिळून या ठिकाणी प्रेमाने काम करावे लागेल, असे आवाहन राहुल गांधी यांनी करत सांगितले की, "भारताला जोडूनच पुढे जाता येऊ शकते. जगात भारताची जी प्रतिमा आहे, तिला धक्का बसला आहे. बंधुभाव आणि एकता आपली ताकद होती, तिला या ठिकाणी जाळण्यात आले. यामुळे भारताचे नुकसान होत आहे."

राहुल गांधी यांच्यासोबत काँग्रेसचे नेते मुकुल वासनिक, कुमारी शैलजा, अधीर रंजन चौधरी, केसी वेणुगोपाल, रणदीप सुरजेवाला, के सुरेश, गौरव गोगोई आणि ब्रह्म मोहिंद्रा उपस्थित होते. दरम्यान, दिल्लीत 24 फेब्रुवारीला उसळलेला हिंसाचार तीन दिवस सुरु होता. या हिंसाचारात आतापर्यंत 46 जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीdelhi violenceदिल्ली