शहरं
Join us  
Trending Stories
1
भोग भोगावे लागतील, शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय करून घ्यावी; भाजपा नेते पाशा पटेलांचा अजब सल्ला
2
नोटांचा ढीग, 12 कोटी कॅश, किलोमध्ये सोनं-चांदी, मर्सिडीज कार अन्...! ईडीच्या छाप्यात सापडलं घबाड; काँग्रेसच्या आमदाराला अटक
3
काळजी घ्या! व्हॉट्सअ‍ॅपवर लग्नपत्रिका मिळाली, त्यावर क्लिक केले, बँक खात्यातून २ लाख रुपये उडाले
4
पोस्ट ऑफिसचा मोठा निर्णय, अमेरिकेत जाणाऱ्या पार्सलवर बंदी! फक्त 'या' गोष्टींना सूट मिळणार
5
भारताचे समर्थन करणारे माजी सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांच्या घरावर एफबीआयची धाड, प्रकरण काय?
6
मैत्रिणीसोबत थांबला होता फ्लॅटमध्ये, तरुणाने अचानक ३२व्या मजल्यावरून मारली उडी
7
"तुम मराठी लोग भंगार हो..." नाशिकमध्ये परप्रांतीयानं दाखवला माज; नेमकं काय घडली घटना?
8
सरप्राइज मिळालं अन् मनातली ती भीती दूर झाली! वादळी शतकी खेळीनंतर रिंकू सिंहनं शेअर केली खास गोष्ट
9
"ट्रम्प असे आहेत जे सकाळी मोदींशी हात मिळवतील, रात्री पाठीत खंजीर खुपसतील," कोणी केली इतकी मोठी टीका?
10
अंधेरीतल्या परप्रांतीय युवकाची राज ठाकरेंना शिवीगाळ; व्हिडिओ व्हायरल, मनसे कार्यकर्ते संतापले
11
मुंबईत सरकारलाच मराठा आंदोलनात दंगल घडवायची आहे; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप
12
Pune Dog Attack Video: एकटं फिरायचं की नाही! अचानक 6-7 कुत्र्यांचा हल्ला; पिंपरीत कसा वाचला तरुण?
13
आशिया कप स्पर्धेवरुन संजय राऊतांनी पीएम मोदींना लिहिले पत्र; भारत- पाकिस्तान सामन्यावर विचारले प्रश्न
14
AC कोचच्या टॉयलेटमध्ये आढळला ५ वर्षीय मुलीचा मृतदेह; मुंबई-कुशीनगर एक्सप्रेसमधील खळबळजनक घटना
15
Ganesh Chaturthi 2025: गणेश चतुर्थीला 'या' पाच चुका प्रत्येक गणेश भक्ताने टाळल्याच पाहिजेत!
16
कोकणवासीयांना गणपती पावला! मुंबई-गोवा वंदे भारत एक्स्प्रेस आता १६ कोचने धावणार, मागणी पूर्ण
17
पाकिस्तानविरुद्ध कारवाई सुरूच, भारतीय हवाई हद्दीत कोणतेही विमान उड्डाण करू शकणार नाही; बंदी २४ सप्टेंबरपर्यंत वाढवली
18
अमेरिकन लोकांनाच फसवताहेत ट्रम्प! नियम बनवून आपलाच खजिना भरताहेत, ६ महिन्यांत केली ८६० कोटींची गुंतवणूक
19
मुंबईच्या रस्त्यावर नव्या लॅम्बोर्गिनीत दिसला रोहित शर्मा, किती आहे या Luxurious कारची किंमत? जाणून थक्क व्हाल!
20
Viral Video: 'ताल से ताल मिला' गाण्यावर शाळेतील सरांचा जबरदस्त डान्स, पाहून महिलाही झाल्या चकीत!

Delhi Violence: प्रचंड राडा! शेतकरी दिल्लीत घुसले; लाल किल्ल्यावर फडकवला धर्मध्वज

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2021 06:38 IST

एक महिन्यापूर्वीच शेतकऱ्यांनी  गणतंत्र दिनी ट्रॅक्टर रॅली काढण्याची घोषणा केली होती. ही रॅली कशी नियोजनबद्ध असेल याबाबत संयुक्त किसान मोर्चाने तयारी केली होती.

विकास झाडे नवी दिल्ली :  शिस्तीने ट्रॅक्टर रॅली काढू, असे आश्वासन दिलेल्या शेतकऱ्यांचा  संयम सुटला आणि दोन महिने अगदी शांततेत असलेल्या या आंदोलनाचा त्रिफळा उडाला. सर्वच सीमांवर बॅरिकेड्स तोडत शेतकऱ्यांनी  दिल्लीकडे कूच केले. पोलिसांना अश्रुधूर, लाठीचार्ज आदींचा वापर करावा लागला, परंतु बलाढ्य संख्या असलेल्या शेतकऱ्यांपुढे  तेही हतबल होते. लाल किल्ल्यावर शेतकऱ्यांनी झेंडा फडकवला.

दिल्लीतील घटनेनंतर हरयाणा सरकारने आपल्या राज्यात हाय अलर्ट जारी केला आणि कायदा हातात  घेणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा इशारा दिला. दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी उच्चस्तरीय बैठकीत दिल्लीतील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला. आंदोलनकर्त्यांविरुद्ध पोलिसांनी चार एफआयआर दाखल केले आहेत. यंदाचा  प्रजासत्ताक दिन तणावाच्या सावटाखाली साजरा झाला.  दिल्ली येथे राजपथावर एकीकडे प्रजासत्ताक दिनाचा सोहळा साजरा होत असताना  दुसरीकडे सुरक्षा दल आणि शेतकरी आमने-सामने उभे ठाकले होते. राजपथावर ७२ व्या गणतंत्र दिनाचा मुख्य कार्यक्रम सुरू असतानाच सिंघू, टिकरी आणि गाझीपूर सीमेवरील शेतकऱ्यांनी  सकाळीच बॅरिकेड्स तोडत पूर्वनियोजित सूचनांना फाटा दिला. 

एक महिन्यापूर्वीच शेतकऱ्यांनी  गणतंत्र दिनी ट्रॅक्टर रॅली काढण्याची घोषणा केली होती. ही रॅली कशी नियोजनबद्ध असेल याबाबत संयुक्त किसान मोर्चाने तयारी केली होती.  तीन सीमांवरून ही रॅली काढण्याची परवानगी देण्यात आली असली तरी, शेतकरी आणि पोलीस यांच्यात अटी व नियम ठरले. त्यानुसार राजपथावरील शासकीय कार्यक्रम आटोपल्यानंतर शेतकऱ्यांच्या  रॅलीला सुरुवात होणार होती. दुपारी १२ वाजता रॅलीला सुरुवात करा, असे पोलिसांंनी शेतकऱ्यांना  बजावले होते. परंतु तीन तास आधीच शेतकऱ्यांनी  ट्रॅक्टरद्वारा पोलिसांचे बॅरिकेड्स तोडले.  त्यामुळे पोलीस आणि शेतकरी आमने-सामने आलेत. अनेक ठिकाणी दगडफेक झाली. पोलिसांनी लाठीचार्ज केला, काही ठिकाणी अश्रुधूर सोडावा लागला. सैराट वागणाऱ्या  काही शेतकऱ्यांच्या  हातात तलवारी आणि लाठ्याही दिसल्यात, परंतु ज्यांच्या हातात तलवारी, लाठ्या होत्या ते शेतकरी नव्हते, आंदोलनाला बदनाम करण्यासाठी कोणीतरी घुसवण्यात आले, असा आरोप शेतकरी नेत्यांनी केला. 

टॅग्स :delhiदिल्लीFarmer strikeशेतकरी संप