शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

Delhi Violence: प्रचंड राडा! शेतकरी दिल्लीत घुसले; लाल किल्ल्यावर फडकवला धर्मध्वज

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2021 06:38 IST

एक महिन्यापूर्वीच शेतकऱ्यांनी  गणतंत्र दिनी ट्रॅक्टर रॅली काढण्याची घोषणा केली होती. ही रॅली कशी नियोजनबद्ध असेल याबाबत संयुक्त किसान मोर्चाने तयारी केली होती.

विकास झाडे नवी दिल्ली :  शिस्तीने ट्रॅक्टर रॅली काढू, असे आश्वासन दिलेल्या शेतकऱ्यांचा  संयम सुटला आणि दोन महिने अगदी शांततेत असलेल्या या आंदोलनाचा त्रिफळा उडाला. सर्वच सीमांवर बॅरिकेड्स तोडत शेतकऱ्यांनी  दिल्लीकडे कूच केले. पोलिसांना अश्रुधूर, लाठीचार्ज आदींचा वापर करावा लागला, परंतु बलाढ्य संख्या असलेल्या शेतकऱ्यांपुढे  तेही हतबल होते. लाल किल्ल्यावर शेतकऱ्यांनी झेंडा फडकवला.

दिल्लीतील घटनेनंतर हरयाणा सरकारने आपल्या राज्यात हाय अलर्ट जारी केला आणि कायदा हातात  घेणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा इशारा दिला. दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी उच्चस्तरीय बैठकीत दिल्लीतील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला. आंदोलनकर्त्यांविरुद्ध पोलिसांनी चार एफआयआर दाखल केले आहेत. यंदाचा  प्रजासत्ताक दिन तणावाच्या सावटाखाली साजरा झाला.  दिल्ली येथे राजपथावर एकीकडे प्रजासत्ताक दिनाचा सोहळा साजरा होत असताना  दुसरीकडे सुरक्षा दल आणि शेतकरी आमने-सामने उभे ठाकले होते. राजपथावर ७२ व्या गणतंत्र दिनाचा मुख्य कार्यक्रम सुरू असतानाच सिंघू, टिकरी आणि गाझीपूर सीमेवरील शेतकऱ्यांनी  सकाळीच बॅरिकेड्स तोडत पूर्वनियोजित सूचनांना फाटा दिला. 

एक महिन्यापूर्वीच शेतकऱ्यांनी  गणतंत्र दिनी ट्रॅक्टर रॅली काढण्याची घोषणा केली होती. ही रॅली कशी नियोजनबद्ध असेल याबाबत संयुक्त किसान मोर्चाने तयारी केली होती.  तीन सीमांवरून ही रॅली काढण्याची परवानगी देण्यात आली असली तरी, शेतकरी आणि पोलीस यांच्यात अटी व नियम ठरले. त्यानुसार राजपथावरील शासकीय कार्यक्रम आटोपल्यानंतर शेतकऱ्यांच्या  रॅलीला सुरुवात होणार होती. दुपारी १२ वाजता रॅलीला सुरुवात करा, असे पोलिसांंनी शेतकऱ्यांना  बजावले होते. परंतु तीन तास आधीच शेतकऱ्यांनी  ट्रॅक्टरद्वारा पोलिसांचे बॅरिकेड्स तोडले.  त्यामुळे पोलीस आणि शेतकरी आमने-सामने आलेत. अनेक ठिकाणी दगडफेक झाली. पोलिसांनी लाठीचार्ज केला, काही ठिकाणी अश्रुधूर सोडावा लागला. सैराट वागणाऱ्या  काही शेतकऱ्यांच्या  हातात तलवारी आणि लाठ्याही दिसल्यात, परंतु ज्यांच्या हातात तलवारी, लाठ्या होत्या ते शेतकरी नव्हते, आंदोलनाला बदनाम करण्यासाठी कोणीतरी घुसवण्यात आले, असा आरोप शेतकरी नेत्यांनी केला. 

टॅग्स :delhiदिल्लीFarmer strikeशेतकरी संप