शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

दोन समाजांमध्ये द्वेष आणि अफवा पसरवणाऱ्यांची माहिती द्या अन् मिळवा १० हजार रुपये

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2020 09:28 IST

Delhi Violence News: दिल्ली विधानसभा अध्यक्षा सौरभ भारद्वाज यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या बैठकीत अनेक निर्णय घेण्यात आले

ठळक मुद्देसोशल मीडियाचा गैरवापर करणाऱ्यांवर कारवाई करणार अफवा पसरवणाऱ्यांना ३ वर्ष जेलची हवा खावी लागणार दिल्ली हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर सरकारने घेतला निर्णय

नवी दिल्ली - आजच्या आधुनिक युगात इंटरनेटच्या माध्यमातून संपूर्ण जग जवळ आलं आहे. सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. गेल्या १० वर्षात सोशल मीडियाच्या युगात अनेक क्रांती घडली, सर्वसामान्यांपासून अतिश्रीमंतापर्यंत प्रत्येक जण सोशल मीडियाचा वापर करु लागला. फेसबुक, ट्विटर या माध्यमांतून लोक एकमेकांच्या जवळ आली. 

सोशल मीडियाचा जसा चांगला वापर केल्याच्या घटना आपण पाहतो, तसा दुरुपयोग करणारेही अनेकजण या माध्यमाचा वापर करतात. अनेकदा आपत्कालीन परिस्थितीत इंटरनेट बंद करण्यात येते. इंटरनेट बंद झाल्याने लोकांना सोशल संवाद तुटतो. अलीकडेच दिल्लीत सोशल मीडियात पसरलेल्या अफवांमुळे हिंसाचार पेटला. लोकांमध्ये भडकाऊ विधानं जाऊ लागली. त्याचा परिणाम म्हणून घरं जळाली, गाड्या पेटवल्या. दुकानं लुटली. ४० पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला. 

सोशल मीडियाचा गैरवापर करुन अफवा पसरवणाऱ्यांविरोधात दिल्ली सरकारने तात्पुरता तोडगा काढला आहे. यामध्ये चुकीच्या बातम्या आणि अफवा पसरवणाऱ्यांना कडक कारवाई करत ३ वर्ष जेलमध्ये टाकण्याची शिक्षा मिळणार आहे. दिल्ली विधानसभा शांती आणि सद्भावना समितीने पहिल्या बैठकीत हा निर्णय घेतला आहे. यामध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून दोन समुदायांमध्ये द्वेष आणि तिरस्कार पसरवणाऱ्यांना ३ वर्षाची शिक्षा देण्यात येणार आहे. दिल्ली हिंसाचार रोखण्यासाठी सरकारने हे पाऊल उचललं आहे. 

दिल्ली विधानसभा अध्यक्षा सौरभ भारद्वाज यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या बैठकीत अनेक निर्णय घेण्यात आले. यात सोशल मीडियावर नजर ठेवण्यासाठी एका एजेंसीची मदत घेण्यात येणार आहे. ही एजेंसी चुकीच्या बातम्यांची सत्यता पडताळणी करेल. त्यानंतर दोषी आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात येईल. तसेच सोशल मीडियावर चुकीच्या बातम्या पसरवणाऱ्यांची माहिती देणाऱ्यांना १० हजार रोख रक्कम बक्षिस म्हणून देण्यात येणार आहे. 

याबाबत सौरभ भारद्वाज यांनी सांगितले की, दोन समुदायांमध्ये द्वेष पसरवणे, शत्रुता निर्माण करणे, चुकीच्या बातम्या फॉरवर्ड करणे, अथवा रिट्विट करणे, फेसबुक शेअर करणे अशा दोषी व्यक्तींना ३ वर्षाची शिक्षा होईल. जो कोणी व्यक्ती आपल्या फेसबुकवर अथवा व्हॉट्सअपवर अशाप्रकारे मॅसेज पाहिल त्याने स्क्रीनशॉट्स काढून समितीकडे पाठवावे, ते लॉ इनफोर्समेंट एजेंसीकडे पाठवण्यात येईल. यासाठी न्याय सल्लागार समितीचीही नेमणूक करण्यात आली आहे असं त्यांनी सांगितले. याबाबत दिल्ली सरकार निवृत्त पोलीस अधिकाऱ्यांची मदत घेणार आहे. तसेच लवकरच एक मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी जाहीर करण्यात येईल, त्यावर तक्रारकर्ते व्हायरल मॅसेज अथवा चुकीच्या व्यक्तींबद्दल माहिती देऊ शकतील. 

 

टॅग्स :Social Mediaसोशल मीडियाdelhi violenceदिल्ली