शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
2
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
3
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
4
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
5
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
6
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
7
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
8
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
9
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
10
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
11
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
12
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
13
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
14
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
15
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
16
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
17
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
18
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
19
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
20
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?

Delhi Violence: अरे भाऊ, कोणीतरी हॉस्पिटलला सोडा नाहीतर हा मरेल; दिल्ली हिंसाचारातील विदारक चित्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2020 08:40 IST

Delhi Violence News: सीलमपूर भागातही हीच परिस्थिती होती. सहसा या भागात इतकी वाहतूक कोंडी असते त्यातून बाहेर पडण्यासाठी १५-२० मिनिटे लागतात

ठळक मुद्देदूरदूरपर्यंत कोणीही दिसत नव्हते, दुकानं बंद होती. अनेक घरं जाळली गेली, गाड्या जाळल्या, संपूर्ण बाजारपेठ जळाली हिंसाचारानंतर ग्राऊंड रिपोर्टमधून धक्कादायक वास्तव समोर

नवी दिल्ली - सीएए कायद्यावरुन दिल्लीतील मौजपूर, जाफराबाद भागात समर्थक आणि विरोधक भिडल्याने हिंसक आंदोलन पेटलं, जाळपोळ, दगडफेकीच्या घटनेने अनेकांचं जनजीवन विस्कळीत झालं. गाड्या जाळल्या, घरं जळाली, दुकानं लुटली, संपूर्ण बाजारपेठ जाळण्यात आली. अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. काहींना घरं सोडावी लागली. 

या दिल्लीतल्या दहशतीच्या वातावरणात तेथील लोक जगत आहेत. हळूहळू या हिंसक आंदोलनानंतर नवभारत टाइम्सने केलेल्या ग्राऊंड रिपोर्टवरुन भयानक वास्तव समोर येत आहे. दयालपूर भागात एका १८-१९ वर्षीय मुलगा त्याच्याच वयाच्या मुलाला खांद्यावर घेऊन रस्त्याने धावत होता. अरे भाऊ, कोणीतरी हॉस्पिटलला सोडा, खूप रक्त सांडलंय, कपडे रक्ताने भरलेत. तो मरेल कोणीतरी मदत करा हे शब्द त्या घटनेची विदारक स्थिती समोर आणणारे होतं. रात्रीचे ११ वाजले होते. रस्त्यावर पोलीस आणि रॅपिड एक्शन फोर्सशिवाय कोणीही नजरेला येत नव्हतं. दयालपूर भागात अनेक घरं जाळली गेली, गाड्या जाळल्या, संपूर्ण बाजारपेठ जळाली होती. 

रात्रीच्या वेळेला या हिंदी दैनिकाचे पत्रकार ८ किमी चालले, यावेळी संतप्त लोकांनी अनेकदा त्यांचे आयडी कार्ड तपासली. सीलमपूर भागातही हीच परिस्थिती होती. सहसा या भागात इतकी वाहतूक कोंडी असते त्यातून बाहेर पडण्यासाठी १५-२० मिनिटे लागतात, पण आता या मार्गावर बॅरिकेट्समुळे एक रस्ता बंद आहे. पोलीस तैनात आहे. त्याठिकाणाहून पुढे जाफराबादच्या दिशेने जाताना पोलीस वाहनांचे सायरन्स मोठ्याने ऐकू येत होते. दूरदूरपर्यंत कोणीही दिसत नव्हते, दुकानं बंद होती. जाफराबादमध्ये आंदोलन सुरु होतं. महिला आंदोलनस्थळी बसलेल्या, मात्र सगळं शांत होतं. सीएएविरोधात या महिल्या आंदोलन करत होत्या. याठिकाणी आंदोलक महिला स्वत: सुरक्षा रक्षक बनल्या होत्या. चेक केल्यानंतर महिलांना प्रवेश दिला जात होता. पोलीस याठिकाणी नव्हती. जेथे पोलीस जात आहे त्याठिकाणी हिंसा वाढतेय, याठिकाणी पोलीस नाही ते बरं आहे असं तेथीर रियाज अहमद यांनी सांगितले. 

आंदोलक महिला फरहाना म्हणाली की, आम्हाला भीती वाटत नाही, म्हणूनच आम्ही बसलो आहोत. आम्ही गोळी खायला बसलो आहोत. आम्हाला मारुन टाका, पोलीस याठिकाणी आली आम्हाला आंदोलन गुंडाळा असं सांगितले. पण आम्ही म्हटलं की इथे ४१ दिवसांपासून बसलो आहे. आता तेव्हाच उठू जेव्हा सीएए मागे घ्याल. हे जे घडलं ते कपिल मिश्राने घडवलं आहे. आम्ही 23 फेब्रुवारीला मेणबत्ती मोर्चात गेलो होतो. तेथे भीमा आर्मीही होती, पण कपिल मिश्रा यांनी लोकांना भडकवून आमच्या विरुद्ध रस्त्यावर बसवले. आमची लढाई कायद्याची आहे. लोकांची नाही. आम्ही आमच्या मुलांसाठी दहशत आणि अन्यायापासून स्वातंत्र्य मागतोय. पण आम्ही देशद्रोही असल्यासारखं दाखवलं जात आहे. याठिकाणी बाईकवरुन काही जण येतात, शिवीगाळ करतात, धमकी देतात असंही तिने सांगितले.  

टॅग्स :delhi violenceदिल्लीPoliceपोलिसcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयक