शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

Delhi Violence: अरे भाऊ, कोणीतरी हॉस्पिटलला सोडा नाहीतर हा मरेल; दिल्ली हिंसाचारातील विदारक चित्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2020 08:40 IST

Delhi Violence News: सीलमपूर भागातही हीच परिस्थिती होती. सहसा या भागात इतकी वाहतूक कोंडी असते त्यातून बाहेर पडण्यासाठी १५-२० मिनिटे लागतात

ठळक मुद्देदूरदूरपर्यंत कोणीही दिसत नव्हते, दुकानं बंद होती. अनेक घरं जाळली गेली, गाड्या जाळल्या, संपूर्ण बाजारपेठ जळाली हिंसाचारानंतर ग्राऊंड रिपोर्टमधून धक्कादायक वास्तव समोर

नवी दिल्ली - सीएए कायद्यावरुन दिल्लीतील मौजपूर, जाफराबाद भागात समर्थक आणि विरोधक भिडल्याने हिंसक आंदोलन पेटलं, जाळपोळ, दगडफेकीच्या घटनेने अनेकांचं जनजीवन विस्कळीत झालं. गाड्या जाळल्या, घरं जळाली, दुकानं लुटली, संपूर्ण बाजारपेठ जाळण्यात आली. अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. काहींना घरं सोडावी लागली. 

या दिल्लीतल्या दहशतीच्या वातावरणात तेथील लोक जगत आहेत. हळूहळू या हिंसक आंदोलनानंतर नवभारत टाइम्सने केलेल्या ग्राऊंड रिपोर्टवरुन भयानक वास्तव समोर येत आहे. दयालपूर भागात एका १८-१९ वर्षीय मुलगा त्याच्याच वयाच्या मुलाला खांद्यावर घेऊन रस्त्याने धावत होता. अरे भाऊ, कोणीतरी हॉस्पिटलला सोडा, खूप रक्त सांडलंय, कपडे रक्ताने भरलेत. तो मरेल कोणीतरी मदत करा हे शब्द त्या घटनेची विदारक स्थिती समोर आणणारे होतं. रात्रीचे ११ वाजले होते. रस्त्यावर पोलीस आणि रॅपिड एक्शन फोर्सशिवाय कोणीही नजरेला येत नव्हतं. दयालपूर भागात अनेक घरं जाळली गेली, गाड्या जाळल्या, संपूर्ण बाजारपेठ जळाली होती. 

रात्रीच्या वेळेला या हिंदी दैनिकाचे पत्रकार ८ किमी चालले, यावेळी संतप्त लोकांनी अनेकदा त्यांचे आयडी कार्ड तपासली. सीलमपूर भागातही हीच परिस्थिती होती. सहसा या भागात इतकी वाहतूक कोंडी असते त्यातून बाहेर पडण्यासाठी १५-२० मिनिटे लागतात, पण आता या मार्गावर बॅरिकेट्समुळे एक रस्ता बंद आहे. पोलीस तैनात आहे. त्याठिकाणाहून पुढे जाफराबादच्या दिशेने जाताना पोलीस वाहनांचे सायरन्स मोठ्याने ऐकू येत होते. दूरदूरपर्यंत कोणीही दिसत नव्हते, दुकानं बंद होती. जाफराबादमध्ये आंदोलन सुरु होतं. महिला आंदोलनस्थळी बसलेल्या, मात्र सगळं शांत होतं. सीएएविरोधात या महिल्या आंदोलन करत होत्या. याठिकाणी आंदोलक महिला स्वत: सुरक्षा रक्षक बनल्या होत्या. चेक केल्यानंतर महिलांना प्रवेश दिला जात होता. पोलीस याठिकाणी नव्हती. जेथे पोलीस जात आहे त्याठिकाणी हिंसा वाढतेय, याठिकाणी पोलीस नाही ते बरं आहे असं तेथीर रियाज अहमद यांनी सांगितले. 

आंदोलक महिला फरहाना म्हणाली की, आम्हाला भीती वाटत नाही, म्हणूनच आम्ही बसलो आहोत. आम्ही गोळी खायला बसलो आहोत. आम्हाला मारुन टाका, पोलीस याठिकाणी आली आम्हाला आंदोलन गुंडाळा असं सांगितले. पण आम्ही म्हटलं की इथे ४१ दिवसांपासून बसलो आहे. आता तेव्हाच उठू जेव्हा सीएए मागे घ्याल. हे जे घडलं ते कपिल मिश्राने घडवलं आहे. आम्ही 23 फेब्रुवारीला मेणबत्ती मोर्चात गेलो होतो. तेथे भीमा आर्मीही होती, पण कपिल मिश्रा यांनी लोकांना भडकवून आमच्या विरुद्ध रस्त्यावर बसवले. आमची लढाई कायद्याची आहे. लोकांची नाही. आम्ही आमच्या मुलांसाठी दहशत आणि अन्यायापासून स्वातंत्र्य मागतोय. पण आम्ही देशद्रोही असल्यासारखं दाखवलं जात आहे. याठिकाणी बाईकवरुन काही जण येतात, शिवीगाळ करतात, धमकी देतात असंही तिने सांगितले.  

टॅग्स :delhi violenceदिल्लीPoliceपोलिसcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयक