शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
3
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
8
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
9
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
10
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
11
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
12
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
13
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
14
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
15
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
16
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
17
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
18
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
19
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
20
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?

Delhi Violence : सीबीएसईने दहावी, बारावीचे पेपर केले रद्द; देशभरात परिणाम?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2020 18:29 IST

हिंसाचारामुळे दिल्लीतील मुलांच्या सुरक्षेला धोका आहे. यामुळे दहावी, बारावी बोर्डाच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

ठळक मुद्दे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी बोर्डाने हे पाऊल उचलले आहे. उत्तर पूर्व दिल्लीमध्ये गेल्या ४ दिवसांपासून दंगली होत आहेत. या हिंसाचारामध्ये 34 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.

नवी दिल्ली : सीएए कायद्याविरोधातील दिल्लीतील हिंसाचाराची झळ आता देशभरात बसू लागली असून सीबीएसई बोर्डाला 10 वी आणि 12 वीच्या परीक्षा रद्द कराव्या लागल्या आहेत. 28 आणि 29 फेब्रुवारीला होणारे पेपर बोर्डाने रद्द केले आहेत.

 सीबीएसईकडून मिळालेल्या माहितीनुसार, हिंसाचारामुळे दिल्लीतील मुलांच्या सुरक्षेला धोका आहे. यामुळे दहावी, बारावी बोर्डाच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी बोर्डाने हे पाऊल उचलले आहे. उत्तर पूर्व दिल्लीमध्ये गेल्या ४ दिवसांपासून दंगली होत आहेत. मोठ्या प्रमाणावर जाळपोळ, गोळीबार आणि हत्यांचे सत्र सुरू आहे. आज कोणतीही अनुचित घटना घडलेली नसली तरीही आरपीएफच्या 45 तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. 

या हिंसाचारामध्ये 34 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. परिस्थिती नियंत्रणात असल्याचा दावा पोलिसांनी केला असून वातावरण निवळत आहे. मात्र, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी 28 फेब्रुवारी आणि 29 फेब्रुवारीला होणारे पेपर पुढे ढकलण्यात आले आहेत. हे बदल केवळ हिंसाचारग्रस्त दिल्लीच्या भागातच करण्यात आल्याचे पत्रामध्ये स्पष्ट करण्यात आले आहेत. यामुळे या बदलाचा परिणाम देशभरात होणार नाही. 

बुधवारी सीबीएसईच्या 10 वीचा इंग्रजी विषयाचा पेपर झाला होता. परीक्षेला सोडण्यासाठी पालक शाळेमध्ये आले होते. तसेच पेपर संपेपर्यंत शाळेबाहेरच थांबून होते. यामुळे पालकांमध्ये हिंसाचाराची भीती पसरली होती. अशा परिस्थितीत विद्यार्थी परीक्षा देऊ शकत नसल्याचे पालकांनी सांगितले होते. 

Delhi Voilence : 'दुसऱ्यांना वाचवण्याच्या नादात माझ्या मुलाने जीव गमावला'

'दंगली होतच राहतात, त्या जगण्याचा एक भागच'; हरियाणाचे मंत्री बरळले

टॅग्स :CBSE Examसीबीएसई परीक्षाdelhi violenceदिल्ली