शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

Delhi Violence: दिल्ली हिंसाचाराच्या जलद सुनावणीसाठी वकिलांचे मंडळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2020 00:52 IST

उत्तर-पूर्व पोलीस हिंसाचार, तोडफोड आणि लुटपाटीच्या वेळी झालेली मारहाण या घटनांचा तपास करीत आहे, तर गुन्हे शाखेच्या सर्व तुकड्या खुनाच्या प्रकरणांचा तपास करीत आहे.

नवी दिल्ली : फेब्रुवारीत ईशान्य दिल्लीत झालेल्या हिंसाचाराशी संबंधित सर्व प्रकरणांची वेगाने सुनावणी होण्यासाठी दिल्ली पोलिसांनी २० वकिलांचे एक मंडळ नियुक्त करण्याचा निर्णय घेतलेला आहे. या मंडळावर हिंसाचाराशी संबंधित ७०० प्रकरणांची जबाबदारी असणार आहे. तसेच या खटल्यांच्या सुनावणीसाठी विशेष न्यायालयाचीही मागणी करण्यात येणार आहे.

दिल्लीचे पोलीस आयुक्त एस.एन. श्रीवास्तव यांनी गुन्हे शाखेतील अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येते. आता यासंदर्भात नायब राज्यपाल अनिल बैजल यांना परवानगीसाठी पत्र लिहिण्यात येणार आहे. हिंसाचाराशी संबंधित सर्व प्रकरणांची सद्य:स्थिती जाणून घेण्यासाठी पोलीस आयुक्तांनी अलीकडेच बैठक आयोजित केली होती. यात आतापर्यंत ८०० आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती आयुक्तांना देण्यात आली. लॉकडाऊनच्या कालावधीत तपासाचा वेग मंदावता कामा नये, अशा स्पष्ट सूचना केंद्रीय गृहमंत्रालयाकडून असल्यामुळे गेल्या एक महिन्यातही अनेकांना पोलिसांनी अटक केली आहे.

उत्तर-पूर्व पोलीस हिंसाचार, तोडफोड आणि लुटपाटीच्या वेळी झालेली मारहाण या घटनांचा तपास करीत आहे, तर गुन्हे शाखेच्या सर्व तुकड्या खुनाच्या प्रकरणांचा तपास करीत आहे....तरच जलदगतीने सुनावणी होईलहिंसाचाराशी संबंधित खटल्यांच्या सुनावणीसाठी पटियाला हाऊस कोर्ट किंवा राऊज अव्हेन्यू कोर्टात विशेष न्यायालय स्थापन होणे महत्त्वाचे आहे, अशी अपेक्षा वकिलांच्या मंडळाने व्यक्त केली आहे. यासंदर्भात दिल्ली उच्च न्यायालयाला विनंती करण्यात येईल, असे दिल्ली पोलिसांनी म्हटले आहे.

टॅग्स :delhi violenceदिल्ली