शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
3
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
4
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
5
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
8
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
9
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
10
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
11
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
12
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
13
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
14
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
15
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
16
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
17
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
18
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
19
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
20
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
Daily Top 2Weekly Top 5

Delhi Violence: शरीरावर चाकूचे शेकडो वार करून अंकित शर्माला संपवले, पोस्टमार्टेममधून झाले उघड

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2020 12:29 IST

Delhi Violence News : अंकित शर्मा यांच्या पोस्टमार्टेम अहवालामधून धक्कादायक बाब समोर आली आहे.

नवी दिल्ली - दिल्लीत उसळलेल्या जातीय दंगलीदरम्यान झालेल्या क्रौर्याची एकेक कहाणी आता समोर येऊ लागली आहे. सीएए-एनआरसीला विरोध करणारे आणि समर्थन देणारे यांच्यात उसळलेल्या या दंगलीत इंटेलिजेंस ब्युरोचे कर्मचारी अंकित शर्मा यांचा हकनाक बळी गेला होता. आता अंकित शर्मा यांच्या पोस्टमार्टेम अहवालामधून धक्कादायक बाब समोर आली आहे. चाकूने शेकडोवेळा भोसकून अंकित शर्मा यांचा जीव घेण्यात आल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. त्यांची छाती आणि पोटावर चाकूचे असंख्य वार दिसून आले आहेत.

आयबीचे कर्मचारी असलेल्या अंकित शर्मा यांची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आल्याचे पोस्टमार्टेम अहवालातून समोर आले आहे. अंकित शर्मा यांच्या शरीरावर चाकूने वार केल्याचा अनेक खुणा आहेत. त्यात पोट आणि छातीवर सर्वाधिक वार करण्यात आले. दरम्यान, अंकित शर्मा यांच्या वडिलांनी एफआयआर दाखल करण्यात आली आहे. त्यानंतर या प्रकरणी भादंवि कलम ३०२, २०१, ३६५, ३४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एफआयआरमध्ये नमूक केल्याप्रमाणे अंकित हा त्यांचा छोटा मुलगा होता. भजनपुरा येथून करावलनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर सीएएविरोधात अनेक दिवासांपासून आंदोलन सुरू होते. यादरम्यान, जमावाकडून दगडफेक, जाळपोळ  आणि गोळीबारासारख्या घटनाही झाल्या होत्या.

 अंकित शर्मा यांच्या वडिलांनी दाखल केलेल्या एफआयआरमध्ये आम  आदमी पक्षाचे निलंबित नगरसेवक ताहीर हुसेन यांचे नावही आहे. ताहीर हुसेन यांनी आपल्या घरात गुंडांना आश्रय दिला होता. तसेच त्यांच्या कार्यालयावरून गोळीबार केला गेला. पेट्रोल बॉम्ब फेकले गेले.  २५ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी अंकित सामान आणण्यासाठी घराबाहेर गेला होता. बराच वेळ तो परत आला नाही. त्यामुळे त्याचा शोध घेतला. मात्र तो सापडला नाही. असे अंकित यांच्या वडिलांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे.

संबंधित बातम्या 

Delhi Violence: बंदूक रोखणारा 'तो' दंगलखोर गेला कुठे? दिल्ली पोलिसांची खळबळजनक माहिती

Delhi Violence: भयंकर...गटारं, नाल्यात सापडत आहेत मृतदेह; दिल्लीतील वेदनादायी दृश्य

Delhi Violence: 'देशाची राजधानी दिल्ली जळत असताना गृहमंत्री अमित शहा कुठे होते?'

दरम्यान, ईशान्य दिल्लीत गुरुवारी पूर्ण शांतता होती. कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. मात्र तिथे तणाव असून, दुकाने, बाजारपेठा, शाळा, बँका बंदच आहेत. लोक घराबाहेर पडायला घाबरत आहेत. मृतांचा आकडा ३८ वर गेला असून, जखमींची संख्याही वाढून २५० वर गेली आहे. गटारे व नाल्यांत तसेच ढिगाऱ्यांखाली मृतदेह सापडत आहेत. मात्र गोळीबारात किती जण मरण पावले आणि हिंसाचारात किती जणांचा मृत्यू झाला, हे स्पष्ट झालेले नाही. आम्ही अजिबात गोळीबार केलेला नाही, असा दावा पोलिसांनी केला आहे.

  

टॅग्स :delhi violenceदिल्लीCrime Newsगुन्हेगारी