शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
4
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
5
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
6
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
7
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
8
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
9
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
10
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
11
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
12
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
13
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
14
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
15
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
16
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
17
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
18
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
19
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
20
Gold Mortgage Loan : सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या

Delhi Violence: शरीरावर चाकूचे शेकडो वार करून अंकित शर्माला संपवले, पोस्टमार्टेममधून झाले उघड

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2020 12:29 IST

Delhi Violence News : अंकित शर्मा यांच्या पोस्टमार्टेम अहवालामधून धक्कादायक बाब समोर आली आहे.

नवी दिल्ली - दिल्लीत उसळलेल्या जातीय दंगलीदरम्यान झालेल्या क्रौर्याची एकेक कहाणी आता समोर येऊ लागली आहे. सीएए-एनआरसीला विरोध करणारे आणि समर्थन देणारे यांच्यात उसळलेल्या या दंगलीत इंटेलिजेंस ब्युरोचे कर्मचारी अंकित शर्मा यांचा हकनाक बळी गेला होता. आता अंकित शर्मा यांच्या पोस्टमार्टेम अहवालामधून धक्कादायक बाब समोर आली आहे. चाकूने शेकडोवेळा भोसकून अंकित शर्मा यांचा जीव घेण्यात आल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. त्यांची छाती आणि पोटावर चाकूचे असंख्य वार दिसून आले आहेत.

आयबीचे कर्मचारी असलेल्या अंकित शर्मा यांची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आल्याचे पोस्टमार्टेम अहवालातून समोर आले आहे. अंकित शर्मा यांच्या शरीरावर चाकूने वार केल्याचा अनेक खुणा आहेत. त्यात पोट आणि छातीवर सर्वाधिक वार करण्यात आले. दरम्यान, अंकित शर्मा यांच्या वडिलांनी एफआयआर दाखल करण्यात आली आहे. त्यानंतर या प्रकरणी भादंवि कलम ३०२, २०१, ३६५, ३४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एफआयआरमध्ये नमूक केल्याप्रमाणे अंकित हा त्यांचा छोटा मुलगा होता. भजनपुरा येथून करावलनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर सीएएविरोधात अनेक दिवासांपासून आंदोलन सुरू होते. यादरम्यान, जमावाकडून दगडफेक, जाळपोळ  आणि गोळीबारासारख्या घटनाही झाल्या होत्या.

 अंकित शर्मा यांच्या वडिलांनी दाखल केलेल्या एफआयआरमध्ये आम  आदमी पक्षाचे निलंबित नगरसेवक ताहीर हुसेन यांचे नावही आहे. ताहीर हुसेन यांनी आपल्या घरात गुंडांना आश्रय दिला होता. तसेच त्यांच्या कार्यालयावरून गोळीबार केला गेला. पेट्रोल बॉम्ब फेकले गेले.  २५ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी अंकित सामान आणण्यासाठी घराबाहेर गेला होता. बराच वेळ तो परत आला नाही. त्यामुळे त्याचा शोध घेतला. मात्र तो सापडला नाही. असे अंकित यांच्या वडिलांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे.

संबंधित बातम्या 

Delhi Violence: बंदूक रोखणारा 'तो' दंगलखोर गेला कुठे? दिल्ली पोलिसांची खळबळजनक माहिती

Delhi Violence: भयंकर...गटारं, नाल्यात सापडत आहेत मृतदेह; दिल्लीतील वेदनादायी दृश्य

Delhi Violence: 'देशाची राजधानी दिल्ली जळत असताना गृहमंत्री अमित शहा कुठे होते?'

दरम्यान, ईशान्य दिल्लीत गुरुवारी पूर्ण शांतता होती. कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. मात्र तिथे तणाव असून, दुकाने, बाजारपेठा, शाळा, बँका बंदच आहेत. लोक घराबाहेर पडायला घाबरत आहेत. मृतांचा आकडा ३८ वर गेला असून, जखमींची संख्याही वाढून २५० वर गेली आहे. गटारे व नाल्यांत तसेच ढिगाऱ्यांखाली मृतदेह सापडत आहेत. मात्र गोळीबारात किती जण मरण पावले आणि हिंसाचारात किती जणांचा मृत्यू झाला, हे स्पष्ट झालेले नाही. आम्ही अजिबात गोळीबार केलेला नाही, असा दावा पोलिसांनी केला आहे.

  

टॅग्स :delhi violenceदिल्लीCrime Newsगुन्हेगारी